शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
3
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
4
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
5
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
6
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
7
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
8
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
9
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
10
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
11
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
12
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
13
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
14
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
15
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
16
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
17
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
18
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
19
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
20
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

बॉयोमेट्रिक मशिन बंद हजेरीपत्रकावर नोंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:00 IST

ग्रामीण भागातील जनतेला जिल्हा परिषद, पंचायत समितीस्तरावर प्रशासकीय सेवा सुलभ व योग्य वेळेत मिळावी याकरिता शासन विविध उपाययोजना करीत आहे. शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजित वेळेत कार्यालयात पोहोचणे व कार्यालयीन कामकाम संपल्यानंतर घरी परतण्याची नोंद दैनंदिन केली जात आहे.

ठळक मुद्देप्रशासनाला जाग येणार का? बंद यंत्रणा कधी होणार कार्यान्वित?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासह सामान्य प्रशासन व अन्य विभागातील कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची व जाण्याची वेळ नोंदविण्यासाठी मागील काही वर्षांपूर्वी बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वीत केली आहे. परंतु ही बॉयोमेट्रिक यंत्रणा तीन महिन्यांपासून बंद आहे. परिणामी विविध विभागातील कर्मचारी आपली उपस्थिती हजेरीपत्रकांवर नोंदवित आहेत. त्यामुळे अनियमितता होत असून, ही बंद यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करण्याची सवड केव्हा मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.ग्रामीण भागातील जनतेला जिल्हा परिषद, पंचायत समितीस्तरावर प्रशासकीय सेवा सुलभ व योग्य वेळेत मिळावी याकरिता शासन विविध उपाययोजना करीत आहे. शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजित वेळेत कार्यालयात पोहोचणे व कार्यालयीन कामकाम संपल्यानंतर घरी परतण्याची नोंद दैनंदिन केली जात आहे. यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने बहुतांश विभागात लाखो रुपये खर्चून बॉयोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित केली. परंतु सुरुवातीच्या काही महिन्यांचा अपवाद वगळता पुन्हा जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील ही यंत्रणा नादुरूस्त झाली. ती बायोमेट्रिक मशीन काढून दुरूस्तीला पाठविल्याचे कर्मचाºयांचे म्हणणे आहे. परंतु अजूनही ती यंत्रणा कार्यान्वीत केल्या गेली नाही. परिणामी जिल्हा परिषदेतील सर्वच विभागांतील यंत्रणा बंद असल्याने कर्मचारी नियोजित वेळत कार्यालयात येतात की नाही, हे अस्पष्ट असले तरी कर्मचारी हजेरी पत्रकावर येण्या जाण्याच्या नोंदी करीत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील बंद पडलेली बॉयोमेट्रिक यंत्रणा सुरू होणार की नाही, याकडे लक्ष लागले आहे.मुख्यालयी राहणे बंधनकारकशासकीय कर्मचाऱ्याना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. झेडपीच्या अखत्यारितील विविध विभागांत कार्यरत बरेच कर्मचारी मुख्यालयी न राहता अपडाऊन करतात. त्यामुळे कार्यालयात दांडी मारली असली तरी दुसऱ्या दिवशी हजेरी नोंदवून काम भागवितात. त्यावर उपाययोजना म्हणून बॉयोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित केली. परंतु तीसुद्धा बंद पडलेली आहे.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास