शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

टरबूज, टोमॅटोचे कोट्यवधींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 05:00 IST

दोन्ही गावांतील शेतकऱ्यांनी ५० ते ६० एकर शेतात टरबूज, खरबूज, आणि टमाटरची लागवड केली होती. यामधून सुमारे २५ ते ३० टन उत्पादनाची अपेक्षा होती. एकरी दोन लाख रुपये या उत्पादनातून मिळणार होते. परंतु, संपूर्ण बाजारपेठ सध्या बंद आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था असलेला शेतकरी १० रुपये किलोपेक्षा कमी दराने आपला शेतमाल जेवढा शक्य होईल तेवढा विकत आहे.

ठळक मुद्देएक ट्रक टोमॅटो रस्त्यावर फेकले : टरबुजाची मातीमोल भावाने विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कवाढोणा रामनाथ : येथून जवळच असलेल्या खेड आणि पिंप्री गावांमध्ये परिसरात गेल्या तीन महिन्यांपूर्वी टमाटर, टरबूज, खरबूज याची लागवड शेतकऱ्यांनी केली. पीक आता तोडणीला आले असताना, कोरोनाच्या उद्रेकाने बाजारपेठ बंद झाली. त्यामुळे या दोन्ही गावांत ओलिताची शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांचे या पिकापोटी सुमारे एक कोटी रू पयाचे नुकसान झाले आहे.दोन्ही गावांतील शेतकऱ्यांनी ५० ते ६० एकर शेतात टरबूज, खरबूज, आणि टमाटरची लागवड केली होती. यामधून सुमारे २५ ते ३० टन उत्पादनाची अपेक्षा होती. एकरी दोन लाख रुपये या उत्पादनातून मिळणार होते. परंतु, संपूर्ण बाजारपेठ सध्या बंद आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था असलेला शेतकरी १० रुपये किलोपेक्षा कमी दराने आपला शेतमाल जेवढा शक्य होईल तेवढा विकत आहे.शेतकरी गजानन बोखडे यांनी टरबुजाकरिता एकरी ५० हजार रुपये खर्च केले. परंतु, दोन रुपये किलो दराने फळ जात असल्याने लागवडीचा खर्चसुद्धा निघाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दिल्ली, मुंबई, कोलकाता, भोपाल, नागपूर, पुणे आदी बाजारपेठेत त्यांचा माल दरवर्षी जातो. परंतु, तेथील संपूर्ण बाजारपेठ बंद असल्याने शेतमालाला उठाव नाही. मागणी असली तरी संपूर्ण ग्राहकांपर्यंत शेतकरी पोहोचू शकत नाहीत. लॉकडाऊनने त्यांना हवालदिल केले आहे. संपूर्ण वर्षभराचे आर्थिक बजट कोसळले आहे. शेतावर काम करणारे शेकडो मजूर आज बेरोजगार झाले आहेत. शासन धान्य देते; पण किराणा कोण देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.खेड येथील सधन शेतकरी नितीन ठाकरे यांनी तीन एकरात टमाटरची लागवड केली. पिकाची काळजी घेतल्याने सुमारे चार हजार कॅरेट टमाटरचे उत्पादनाचा हिशेब त्यांनी लावला. प्रतिकॅरेट ९०० रुपये दराने चार लाखांचे उत्पन्न त्यांना अपेक्षित होते. परंतु, लॉकडाऊनचा फटका बहारलेल्या टमाटरला बसला. बाजारपेठ बंद असल्याने झाडालाच टमाटर सुकले. दोन ट्रक टमाटर रस्त्यावर फेकून दिल्याचे त्यांनी सांगितले. तीन एकरात शिमला मिरची आहे. व्यापारी येतात, पाहतात आणि निघून जातात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. नीलेश बोदडे, आशिष बोदडे, सुनील साठे या शेतकऱ्यांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी