शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
2
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
3
"संतोष देशमुखांच्या हत्येला मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार"; मनोज जरांगे पाटील यांचा आरोप
4
विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा
5
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक
6
रेपो दरात कपात, ५० आणि २० लाखांच्या लोनवर किती कमी होणार EMI? जाणून घ्या
7
परिस्थिती गंभीर! कोरोनापेक्षाही जीवघेणा 'हा' आजार; हृदयावरच आघात, दरवर्षी १८ मिलियन मृत्यू
8
९५ वर्षांचे आजोबा, ७० वर्ष राहत होते लिव्हइनमध्ये, आता झाली लग्न करायची इच्छा अन्...  
9
'स्पिरीट'नंतर दीपिका पादुकोण 'या' बिग बजेट सिनेमातूनही बाहेर? अभिनेत्रीच्या अटींमुळे मेकर्स विचारात
10
खळबळजनक! WhatsApp वर देवाचा फोटो DP; हनीट्रॅप, हेरगिरीसाठी पाकिस्तानचं 'देसी' प्लॅनिंग
11
Vijay Mallya : "हवं तर फरार म्हणा पण चोर म्हणू नका..," विजय माल्ल्यानं 'यांची'ही मागितली माफी
12
"लग्न झालं की लाइफ सेट असंच वाटायचं, पण...", लग्नाबद्दल स्पष्टच बोलली मधुराणी, म्हणाली...
13
Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक
14
देशातील निष्पाप नागरिकांवर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांना पोसत होते, काश्मीरमधील 'त्या' ४ जणांना होणार शिक्षा!
15
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
16
महाराष्ट्राची 'समृद्धी': देशातील सर्वांत रुंद बोगद्यातून इगतपुरी-कसारा अंतर ८ मिनिटांत
17
NIrjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कोणते पदार्थ खाऊ नये, याची आजच नोंद करून घ्या!
18
भाजपासह काँग्रेसला खिंडार; माजी खासदार, पदाधिकारी अजित पवार गटात, NCPचे घड्याळ बांधले हाती
19
राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांच्या पत्नी रात्री जेवून झोपल्या, सकाळी उठल्याच नाहीत; सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यू

टरबूज, टोमॅटोचे कोट्यवधींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 05:00 IST

दोन्ही गावांतील शेतकऱ्यांनी ५० ते ६० एकर शेतात टरबूज, खरबूज, आणि टमाटरची लागवड केली होती. यामधून सुमारे २५ ते ३० टन उत्पादनाची अपेक्षा होती. एकरी दोन लाख रुपये या उत्पादनातून मिळणार होते. परंतु, संपूर्ण बाजारपेठ सध्या बंद आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था असलेला शेतकरी १० रुपये किलोपेक्षा कमी दराने आपला शेतमाल जेवढा शक्य होईल तेवढा विकत आहे.

ठळक मुद्देएक ट्रक टोमॅटो रस्त्यावर फेकले : टरबुजाची मातीमोल भावाने विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कवाढोणा रामनाथ : येथून जवळच असलेल्या खेड आणि पिंप्री गावांमध्ये परिसरात गेल्या तीन महिन्यांपूर्वी टमाटर, टरबूज, खरबूज याची लागवड शेतकऱ्यांनी केली. पीक आता तोडणीला आले असताना, कोरोनाच्या उद्रेकाने बाजारपेठ बंद झाली. त्यामुळे या दोन्ही गावांत ओलिताची शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांचे या पिकापोटी सुमारे एक कोटी रू पयाचे नुकसान झाले आहे.दोन्ही गावांतील शेतकऱ्यांनी ५० ते ६० एकर शेतात टरबूज, खरबूज, आणि टमाटरची लागवड केली होती. यामधून सुमारे २५ ते ३० टन उत्पादनाची अपेक्षा होती. एकरी दोन लाख रुपये या उत्पादनातून मिळणार होते. परंतु, संपूर्ण बाजारपेठ सध्या बंद आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था असलेला शेतकरी १० रुपये किलोपेक्षा कमी दराने आपला शेतमाल जेवढा शक्य होईल तेवढा विकत आहे.शेतकरी गजानन बोखडे यांनी टरबुजाकरिता एकरी ५० हजार रुपये खर्च केले. परंतु, दोन रुपये किलो दराने फळ जात असल्याने लागवडीचा खर्चसुद्धा निघाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दिल्ली, मुंबई, कोलकाता, भोपाल, नागपूर, पुणे आदी बाजारपेठेत त्यांचा माल दरवर्षी जातो. परंतु, तेथील संपूर्ण बाजारपेठ बंद असल्याने शेतमालाला उठाव नाही. मागणी असली तरी संपूर्ण ग्राहकांपर्यंत शेतकरी पोहोचू शकत नाहीत. लॉकडाऊनने त्यांना हवालदिल केले आहे. संपूर्ण वर्षभराचे आर्थिक बजट कोसळले आहे. शेतावर काम करणारे शेकडो मजूर आज बेरोजगार झाले आहेत. शासन धान्य देते; पण किराणा कोण देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.खेड येथील सधन शेतकरी नितीन ठाकरे यांनी तीन एकरात टमाटरची लागवड केली. पिकाची काळजी घेतल्याने सुमारे चार हजार कॅरेट टमाटरचे उत्पादनाचा हिशेब त्यांनी लावला. प्रतिकॅरेट ९०० रुपये दराने चार लाखांचे उत्पन्न त्यांना अपेक्षित होते. परंतु, लॉकडाऊनचा फटका बहारलेल्या टमाटरला बसला. बाजारपेठ बंद असल्याने झाडालाच टमाटर सुकले. दोन ट्रक टमाटर रस्त्यावर फेकून दिल्याचे त्यांनी सांगितले. तीन एकरात शिमला मिरची आहे. व्यापारी येतात, पाहतात आणि निघून जातात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. नीलेश बोदडे, आशिष बोदडे, सुनील साठे या शेतकऱ्यांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी