शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पथदिव्यांचे थकीत वीज बिल ग्रामपंचायतींच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 10:06 PM

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रस्त्यांवरील दिव्यांचे थकीत वीज बिल शासनाने ग्रामपंचायतींच्या माथी मारले आहे. ही रक्कम ग्रामपंचायतींनी स्वनिधीतून, चौदाव्या वित्त आयोगातून किंवा इतर निधीतून भागवावी, असे पत्र ग्रामविकास विभागाने काढले आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेला पत्र: जिल्ह्यातील थकबाकी ६६ कोटींवर

आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रस्त्यांवरील दिव्यांचे थकीत वीज बिल शासनाने ग्रामपंचायतींच्या माथी मारले आहे. ही रक्कम ग्रामपंचायतींनी स्वनिधीतून, चौदाव्या वित्त आयोगातून किंवा इतर निधीतून भागवावी, असे पत्र ग्रामविकास विभागाने काढले आहे. हे पत्र सर्व जिल्हा परिषदांना अतितात्काळ म्हणून पाठविले आहे.ग्रामपंचायतींच्या हद्दीतील पथदिव्यांचे बिल शासनस्तरावरून भरले जाते. हे वीज बिल ग्रामपंचायतीकडून भरले जात नव्हते. मध्यंतरी या पथदिव्यांच्या थकीत वीज बिलामुळे महावितरणने अनेक ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांची वीज तोडली होती. मध्यंतरी राज्यभरातील हा प्रश्न काही जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्याच्या निदर्शनास आणून दिला. त्यावेळी मुख्यमंत्र्यानी ‘प्रकाशगड’शी संपर्क साधून पथदिव्याच्या जोडणीचे आदेश दिले होते. पथदिव्याच्या थकीत बिलाचा प्रश्न राज्यभर आहे.राज्यभरातील ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्याची सुमारे ३०० कोटीची वीज बिले शासनस्तरावर थकीत असल्याची माहिती आहे. यामध्ये जिल्ह्यातील ग्रामपंचायतीकडे ६६ कोटींपेक्षा जास्त वीज बिले थकीत आहेत. दरम्यान, ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेला पत्र पाठवून वीज बिले भरण्याच्या सूचना केल्या. यानुसार राज्यासह जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावरील दिव्यांची बरीचशी वीज बिले थकीत असल्याचे निदर्शनास आले आहे.जिल्ह्यात अशी आहे थकबाकीग्रामपंचायतींच्या हद्दीतील १हजार ८०९ ग्राहकांकडे पथदिव्याची वीज बिलाची थकबाकी आहे. याची रक्कम ६६ कोटींहून अधिक आहे. महावितरणच्या चार विभागांपैकी अचलपूर विभागातील ७३७ ग्राहकांकडे १३ कोटी ९७ लाख १६ हजार ३२९, मोर्शी ३५४ ग्राहकांकडे ८ कोटी ५६ लाख १३ हजार ८५१, अमरावती शहर विभागात ३ ग्राहकांकडे ७२ हजार ७२३, अमरावती ग्रामीण ७१५ ग्राहकांकडे ४४ कोटी १३ लाख २५ हजार ३०७ रुपये थकबाकी असल्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, थकबाकीदार ग्रामपंचायतींनी थकीत रक्कम भरून अडचणीत असलेल्या महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.आतापर्यंत पथदिव्यांची वीज देयके शासनास्तरावरू न भरली जात होती. आता थकीत रक्कम भरण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने काढून ग्रामपंचायतींवर आर्थिक बोजा टाकला आहे. शासनानेच थकीत रक्कम भरावी.- नितीन गोंडाणेअध्यक्ष, जिल्हा परिषद