शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 
2
अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
3
१०० कोटींची उलाढाल, आलिशान कोठडी अन् सीक्रेट खोली; छांगुर बाबाकडे सापडल्या शक्तिवर्धक गोळ्या
4
EMI वर वस्तू खरेदी करणं किती योग्य? हल्ली अनेकजण करतात हे काम; ईएमआयचं सत्य काय?
5
Maharashtra Politics : ठाकरे बंधू महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
6
गुगलमध्ये १.६ कोटी पगार, तरीही 'ती' म्हणते न्यूयॉर्कमध्ये खर्च भागवणं कठीण! भारतीय तरुणीची पोस्ट व्हायरल
7
'चला हवा...'मध्ये अभिनेत्यांनी स्त्री भूमिका केल्या, आता नव्या पर्वात काय? गौरव मोरे म्हणाला, "मी आधीच..."
8
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण
9
२६ वर्षांचे आहात, ५० पर्यंत २ कोटी हवेत? आजपासून कितीची मंथली SIP केल्यास मिळू शकते इतकी रक्कम?
10
PM मोदींचा २७ देशांकडून सन्मान, ८ मुस्लिम देशांचाही समावेश; २०२५ मध्ये विक्रमी कामगिरी...
11
'एक कप और'ची सवय पडेल महागात; गरमागरम चहाच्या नादात माराव्या लागतील हॉस्पिटलच्या चकरा
12
Guru Purnima 2025: आजच्या काळात 'या' गुरूंनाही आहे मोठा मान; तुम्ही कोणाला फॉलो करता?
13
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; वरिष्ठ नेत्यांना भेटणार, राजकीय चर्चांना उधाण
14
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...
15
अजब मध्यप्रदेशातील गजब पूल! भोपाळपेक्षा दोन पावले पुढे इंदूर, झेड आकाराचा बांधलाय पूल
16
ट्रम्प यांचा भारतासह ब्रिक्स देशांना 'अल्टिमेटम'! २१ देशांवर टॅरिफचा बॉम्ब, मित्राच्या देशावरच लादला सर्वाधिक कर
17
"ट्रम्प घरासमोर सनबाथ घेत असताना एक ड्रोन येईल आणि…’’ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इराणची उघड धमकी
18
"माझं आडनाव कोणालाच...", अमृता सुभाषने सांगितलं वडिलांचं नाव लावण्यामागचं कारण
19
ललित प्रभाकरसोबत झळकणार 'ही' हिंदी अभिनेत्री, शुभमन गिलशी अफेअरच्या रंगल्या चर्चा
20
Aastha Poonia : आकाशाला गवसणी! नौदलाची पहिली महिला फायटर पायलट; 'विंग्स ऑफ गोल्ड'ने सन्मान

पथदिव्यांचे थकीत वीज बिल ग्रामपंचायतींच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 22:06 IST

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रस्त्यांवरील दिव्यांचे थकीत वीज बिल शासनाने ग्रामपंचायतींच्या माथी मारले आहे. ही रक्कम ग्रामपंचायतींनी स्वनिधीतून, चौदाव्या वित्त आयोगातून किंवा इतर निधीतून भागवावी, असे पत्र ग्रामविकास विभागाने काढले आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेला पत्र: जिल्ह्यातील थकबाकी ६६ कोटींवर

आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रस्त्यांवरील दिव्यांचे थकीत वीज बिल शासनाने ग्रामपंचायतींच्या माथी मारले आहे. ही रक्कम ग्रामपंचायतींनी स्वनिधीतून, चौदाव्या वित्त आयोगातून किंवा इतर निधीतून भागवावी, असे पत्र ग्रामविकास विभागाने काढले आहे. हे पत्र सर्व जिल्हा परिषदांना अतितात्काळ म्हणून पाठविले आहे.ग्रामपंचायतींच्या हद्दीतील पथदिव्यांचे बिल शासनस्तरावरून भरले जाते. हे वीज बिल ग्रामपंचायतीकडून भरले जात नव्हते. मध्यंतरी या पथदिव्यांच्या थकीत वीज बिलामुळे महावितरणने अनेक ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांची वीज तोडली होती. मध्यंतरी राज्यभरातील हा प्रश्न काही जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्याच्या निदर्शनास आणून दिला. त्यावेळी मुख्यमंत्र्यानी ‘प्रकाशगड’शी संपर्क साधून पथदिव्याच्या जोडणीचे आदेश दिले होते. पथदिव्याच्या थकीत बिलाचा प्रश्न राज्यभर आहे.राज्यभरातील ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्याची सुमारे ३०० कोटीची वीज बिले शासनस्तरावर थकीत असल्याची माहिती आहे. यामध्ये जिल्ह्यातील ग्रामपंचायतीकडे ६६ कोटींपेक्षा जास्त वीज बिले थकीत आहेत. दरम्यान, ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेला पत्र पाठवून वीज बिले भरण्याच्या सूचना केल्या. यानुसार राज्यासह जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावरील दिव्यांची बरीचशी वीज बिले थकीत असल्याचे निदर्शनास आले आहे.जिल्ह्यात अशी आहे थकबाकीग्रामपंचायतींच्या हद्दीतील १हजार ८०९ ग्राहकांकडे पथदिव्याची वीज बिलाची थकबाकी आहे. याची रक्कम ६६ कोटींहून अधिक आहे. महावितरणच्या चार विभागांपैकी अचलपूर विभागातील ७३७ ग्राहकांकडे १३ कोटी ९७ लाख १६ हजार ३२९, मोर्शी ३५४ ग्राहकांकडे ८ कोटी ५६ लाख १३ हजार ८५१, अमरावती शहर विभागात ३ ग्राहकांकडे ७२ हजार ७२३, अमरावती ग्रामीण ७१५ ग्राहकांकडे ४४ कोटी १३ लाख २५ हजार ३०७ रुपये थकबाकी असल्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, थकबाकीदार ग्रामपंचायतींनी थकीत रक्कम भरून अडचणीत असलेल्या महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.आतापर्यंत पथदिव्यांची वीज देयके शासनास्तरावरू न भरली जात होती. आता थकीत रक्कम भरण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने काढून ग्रामपंचायतींवर आर्थिक बोजा टाकला आहे. शासनानेच थकीत रक्कम भरावी.- नितीन गोंडाणेअध्यक्ष, जिल्हा परिषद