शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

भिवंडी, मुंबई, अकोल्याचा प्रयोग अचलपूर, अमरावतीत - सुरेश खोपडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 12:27 IST

अमरावतीनंतर अचलपुरात जातीय तेढ पुन्हा होऊ नये, यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सोमवारी माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांचा भिवंडी प्रयोग, मोहल्ला कमिटी या माध्यमातून राबविण्यासंदर्भात सांगितले.

ठळक मुद्देपोलिसांची जातीय दंगल रोखण्याची पद्धत फायर ब्रिगेडसारखी - सुरेश खोपडे

नरेंद्र जावरे

परतवाडा (अमरावती) : पोलिसांची पद्धत फायर ब्रिगेडसारखी आहे. आग लागू नये, त्याचा विचार करणे गरजेचे आहे. फिक्स पॉइंट, वायरलेस यंत्रणा, गाड्यांचा ताफा, लाठीमार अटक, चार्जशीट दाखल, पुन्हा दंगलीची प्रतीक्षा हे सर्व बदलण्यासाठी झालेला भिवंडी प्रयोग अचलपूर, अमरावती शहरातही कसा राबविता येईल, यासाठी आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. येत्या काही दिवसांत ते अचलपूर येथे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आयोजित केलेल्या विशेष बैठकीला येणार आहेत.

अमरावतीनंतर अचलपुरात जातीय तेढ पुन्हा होऊ नये, यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सोमवारी माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांचा भिवंडी प्रयोग, मोहल्ला कमिटी या माध्यमातून राबविण्यासंदर्भात सांगितले. हिंदू-मुस्लीम दंगली हा देशातील फार जुना प्रश्न आहे. दंगलीत आग लागल्यानंतर गोळीबार व लाठीमार करायचा. त्यापेक्षा अगोदरपासूनच सातत्याने प्रयत्न पोलिसांनी केले आणि बाहेरच्या शक्तीने कितीही पेटवलं तरी दंगल होऊ शकत नाही. स्फोटके आधीच ओली केली तर कितीही पेटवले तरी पेटतच नाहीत, त्याकरिता पोलिसांचा दृष्टिकोनही बदलण्याची गरज आहे. त्यामुळे जातीय सलोखा कायम राहावा आणि त्या पद्धतीने हा भिवंडी प्रयोग राहील, असे सुरेश खोपडे म्हणाले.

रामलाल, अब्दुल्ला एकाच व्यासपीठावर

भिवंडी शहरात जवळपास ७० मोहल्ला कमिटी तयार करण्यात आल्या. सर्वच समाजाच्या लोकांना यात प्रतिनिधित्व देण्यात आले. प्रत्येकी पाच महिलांचा समावेश असलेल्या शिपायांच्या हाताखाली त्या समित्यांचे कामकाज सुरू करण्यात आले. दर १५ दिवसांनी त्याच परिसरात बैठक घेत हिंदू-मुस्लीम दोघेही एकाच व्यासपीठावर येऊ लागले. सर्व आपसी भाईचारा वाढला. पोलीस मोहल्ल्यात जाऊ लागल्याने अनेक गुन्ह्यांचा निपटारा या ठिकाणी होऊ लागला.

यशोमती ठाकूर, बच्चू कडूंनी प्रयोग करावा

अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, राज्यमंत्री बच्चू कडू दोघांनी हा प्रयोग राबवावा. आपल्याला बच्चू कडू यांनी निमंत्रण दिले आहे. कशा पद्धतीने अचलपुरात हा प्रयोग करता येईल, त्यासाठी आराखडा तयार करून जिल्ह्याच्या रचनेनुसार अचलपूर, अमरावती येथील हा प्रयोग यशस्वी करता येईल. सातत्याने त्यामध्ये लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे व एक चांगले मॉडेल त्यातून देता येईल, असेही सुरेश खोपडे सांगितले.

काय आहे भिवंडी प्रयोग?

१९८४ मध्ये भिवंडी येथे झालेल्या जातीय दंगलीत दोनशेपेक्षा अधिक नागरिकांचा नाहक जीव गेला होता. या काळात राज्यातील जातीय दंगली, कामगार, शेतकरी प्रश्नांचा आयपीएस सुरेश खोपडे यांनी अभ्यास केला. अग्निशमन दलाचे कर्मचारी पाणी बघून आग लागण्याची जशी वाट बघतात. तशाच प्रकारची पद्धत त्यांची आहे. मात्र, आग लागूच नये, याचा विचार करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे पोलिसांचे आहे. कागदपत्रांची खानापूर्ती होऊ नये, असा भिवंडी प्रयोग आहे.

टॅग्स :SocialसामाजिकVidarbhaविदर्भ