शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी, मुंबई, अकोल्याचा प्रयोग अचलपूर, अमरावतीत - सुरेश खोपडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 12:27 IST

अमरावतीनंतर अचलपुरात जातीय तेढ पुन्हा होऊ नये, यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सोमवारी माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांचा भिवंडी प्रयोग, मोहल्ला कमिटी या माध्यमातून राबविण्यासंदर्भात सांगितले.

ठळक मुद्देपोलिसांची जातीय दंगल रोखण्याची पद्धत फायर ब्रिगेडसारखी - सुरेश खोपडे

नरेंद्र जावरे

परतवाडा (अमरावती) : पोलिसांची पद्धत फायर ब्रिगेडसारखी आहे. आग लागू नये, त्याचा विचार करणे गरजेचे आहे. फिक्स पॉइंट, वायरलेस यंत्रणा, गाड्यांचा ताफा, लाठीमार अटक, चार्जशीट दाखल, पुन्हा दंगलीची प्रतीक्षा हे सर्व बदलण्यासाठी झालेला भिवंडी प्रयोग अचलपूर, अमरावती शहरातही कसा राबविता येईल, यासाठी आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. येत्या काही दिवसांत ते अचलपूर येथे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आयोजित केलेल्या विशेष बैठकीला येणार आहेत.

अमरावतीनंतर अचलपुरात जातीय तेढ पुन्हा होऊ नये, यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सोमवारी माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांचा भिवंडी प्रयोग, मोहल्ला कमिटी या माध्यमातून राबविण्यासंदर्भात सांगितले. हिंदू-मुस्लीम दंगली हा देशातील फार जुना प्रश्न आहे. दंगलीत आग लागल्यानंतर गोळीबार व लाठीमार करायचा. त्यापेक्षा अगोदरपासूनच सातत्याने प्रयत्न पोलिसांनी केले आणि बाहेरच्या शक्तीने कितीही पेटवलं तरी दंगल होऊ शकत नाही. स्फोटके आधीच ओली केली तर कितीही पेटवले तरी पेटतच नाहीत, त्याकरिता पोलिसांचा दृष्टिकोनही बदलण्याची गरज आहे. त्यामुळे जातीय सलोखा कायम राहावा आणि त्या पद्धतीने हा भिवंडी प्रयोग राहील, असे सुरेश खोपडे म्हणाले.

रामलाल, अब्दुल्ला एकाच व्यासपीठावर

भिवंडी शहरात जवळपास ७० मोहल्ला कमिटी तयार करण्यात आल्या. सर्वच समाजाच्या लोकांना यात प्रतिनिधित्व देण्यात आले. प्रत्येकी पाच महिलांचा समावेश असलेल्या शिपायांच्या हाताखाली त्या समित्यांचे कामकाज सुरू करण्यात आले. दर १५ दिवसांनी त्याच परिसरात बैठक घेत हिंदू-मुस्लीम दोघेही एकाच व्यासपीठावर येऊ लागले. सर्व आपसी भाईचारा वाढला. पोलीस मोहल्ल्यात जाऊ लागल्याने अनेक गुन्ह्यांचा निपटारा या ठिकाणी होऊ लागला.

यशोमती ठाकूर, बच्चू कडूंनी प्रयोग करावा

अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, राज्यमंत्री बच्चू कडू दोघांनी हा प्रयोग राबवावा. आपल्याला बच्चू कडू यांनी निमंत्रण दिले आहे. कशा पद्धतीने अचलपुरात हा प्रयोग करता येईल, त्यासाठी आराखडा तयार करून जिल्ह्याच्या रचनेनुसार अचलपूर, अमरावती येथील हा प्रयोग यशस्वी करता येईल. सातत्याने त्यामध्ये लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे व एक चांगले मॉडेल त्यातून देता येईल, असेही सुरेश खोपडे सांगितले.

काय आहे भिवंडी प्रयोग?

१९८४ मध्ये भिवंडी येथे झालेल्या जातीय दंगलीत दोनशेपेक्षा अधिक नागरिकांचा नाहक जीव गेला होता. या काळात राज्यातील जातीय दंगली, कामगार, शेतकरी प्रश्नांचा आयपीएस सुरेश खोपडे यांनी अभ्यास केला. अग्निशमन दलाचे कर्मचारी पाणी बघून आग लागण्याची जशी वाट बघतात. तशाच प्रकारची पद्धत त्यांची आहे. मात्र, आग लागूच नये, याचा विचार करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे पोलिसांचे आहे. कागदपत्रांची खानापूर्ती होऊ नये, असा भिवंडी प्रयोग आहे.

टॅग्स :SocialसामाजिकVidarbhaविदर्भ