शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भिवंडी, मुंबई, अकोल्याचा प्रयोग अचलपूर, अमरावतीत - सुरेश खोपडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 12:27 IST

अमरावतीनंतर अचलपुरात जातीय तेढ पुन्हा होऊ नये, यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सोमवारी माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांचा भिवंडी प्रयोग, मोहल्ला कमिटी या माध्यमातून राबविण्यासंदर्भात सांगितले.

ठळक मुद्देपोलिसांची जातीय दंगल रोखण्याची पद्धत फायर ब्रिगेडसारखी - सुरेश खोपडे

नरेंद्र जावरे

परतवाडा (अमरावती) : पोलिसांची पद्धत फायर ब्रिगेडसारखी आहे. आग लागू नये, त्याचा विचार करणे गरजेचे आहे. फिक्स पॉइंट, वायरलेस यंत्रणा, गाड्यांचा ताफा, लाठीमार अटक, चार्जशीट दाखल, पुन्हा दंगलीची प्रतीक्षा हे सर्व बदलण्यासाठी झालेला भिवंडी प्रयोग अचलपूर, अमरावती शहरातही कसा राबविता येईल, यासाठी आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. येत्या काही दिवसांत ते अचलपूर येथे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आयोजित केलेल्या विशेष बैठकीला येणार आहेत.

अमरावतीनंतर अचलपुरात जातीय तेढ पुन्हा होऊ नये, यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सोमवारी माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांचा भिवंडी प्रयोग, मोहल्ला कमिटी या माध्यमातून राबविण्यासंदर्भात सांगितले. हिंदू-मुस्लीम दंगली हा देशातील फार जुना प्रश्न आहे. दंगलीत आग लागल्यानंतर गोळीबार व लाठीमार करायचा. त्यापेक्षा अगोदरपासूनच सातत्याने प्रयत्न पोलिसांनी केले आणि बाहेरच्या शक्तीने कितीही पेटवलं तरी दंगल होऊ शकत नाही. स्फोटके आधीच ओली केली तर कितीही पेटवले तरी पेटतच नाहीत, त्याकरिता पोलिसांचा दृष्टिकोनही बदलण्याची गरज आहे. त्यामुळे जातीय सलोखा कायम राहावा आणि त्या पद्धतीने हा भिवंडी प्रयोग राहील, असे सुरेश खोपडे म्हणाले.

रामलाल, अब्दुल्ला एकाच व्यासपीठावर

भिवंडी शहरात जवळपास ७० मोहल्ला कमिटी तयार करण्यात आल्या. सर्वच समाजाच्या लोकांना यात प्रतिनिधित्व देण्यात आले. प्रत्येकी पाच महिलांचा समावेश असलेल्या शिपायांच्या हाताखाली त्या समित्यांचे कामकाज सुरू करण्यात आले. दर १५ दिवसांनी त्याच परिसरात बैठक घेत हिंदू-मुस्लीम दोघेही एकाच व्यासपीठावर येऊ लागले. सर्व आपसी भाईचारा वाढला. पोलीस मोहल्ल्यात जाऊ लागल्याने अनेक गुन्ह्यांचा निपटारा या ठिकाणी होऊ लागला.

यशोमती ठाकूर, बच्चू कडूंनी प्रयोग करावा

अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, राज्यमंत्री बच्चू कडू दोघांनी हा प्रयोग राबवावा. आपल्याला बच्चू कडू यांनी निमंत्रण दिले आहे. कशा पद्धतीने अचलपुरात हा प्रयोग करता येईल, त्यासाठी आराखडा तयार करून जिल्ह्याच्या रचनेनुसार अचलपूर, अमरावती येथील हा प्रयोग यशस्वी करता येईल. सातत्याने त्यामध्ये लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे व एक चांगले मॉडेल त्यातून देता येईल, असेही सुरेश खोपडे सांगितले.

काय आहे भिवंडी प्रयोग?

१९८४ मध्ये भिवंडी येथे झालेल्या जातीय दंगलीत दोनशेपेक्षा अधिक नागरिकांचा नाहक जीव गेला होता. या काळात राज्यातील जातीय दंगली, कामगार, शेतकरी प्रश्नांचा आयपीएस सुरेश खोपडे यांनी अभ्यास केला. अग्निशमन दलाचे कर्मचारी पाणी बघून आग लागण्याची जशी वाट बघतात. तशाच प्रकारची पद्धत त्यांची आहे. मात्र, आग लागूच नये, याचा विचार करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे पोलिसांचे आहे. कागदपत्रांची खानापूर्ती होऊ नये, असा भिवंडी प्रयोग आहे.

टॅग्स :SocialसामाजिकVidarbhaविदर्भ