शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

शेतक-यांच्या उन्नतीसाठी कृषी विद्यापीठाची निर्मिती ही भाऊसाहेबांचीच संकल्पना - पांडुरंग फुंडकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 19:54 IST

 अमरावती -  देशातील शेतक-यांची उन्नती व्हावी. तो जगाच्या बरोबरीने चालला पाहिजे,  त्याला सन्मानाने जगता आले पाहिजे. यासाठी  डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे केंद्रीय कृषि मंत्री झाल्यानंतर त्यांनी राज्यात कृषी विद्यापीठ स्थापन करण्याची संकल्पना मांडली. आज राज्यात चार कृषी विद्यापीठे असून अनेक  कृषी महाविद्यालये आहेत. त्याकाळात भाऊसाहेबांनी शेतकºयांसाठी केलेले कार्य ...

 अमरावती -  देशातील शेतक-यांची उन्नती व्हावी. तो जगाच्या बरोबरीने चालला पाहिजे,  त्याला सन्मानाने जगता आले पाहिजे. यासाठी  डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे केंद्रीय कृषि मंत्री झाल्यानंतर त्यांनी राज्यात कृषी विद्यापीठ स्थापन करण्याची संकल्पना मांडली. आज राज्यात चार कृषी विद्यापीठे असून अनेक  कृषी महाविद्यालये आहेत. त्याकाळात भाऊसाहेबांनी शेतकºयांसाठी केलेले कार्य अनमोल असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले. ते दर्यापूर येथील आदर्श हायस्कूल तथा कनिष्ट महाविद्यालयात शाळेच्या अमृत महोत्सवानिमित्त नवीन इमारतीचे उद्घाटन व शिक्षण महर्षी भाऊसाहेब देशमुख यांच्या ११९ व्या जयंत्युत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, नगराध्यक्षा  नलिनी भारसाकळे, संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र शेळके, नरेशचंद्र ठाकरे,  कोषाध्यक्ष दिलीपबाबु  इंगोले, कार्यकारी सदस्य हेमंत काळमेघ, केशवराव गावंडे, केशवराव मेतकर, अशोकराव ठुसे, प्राचार्य रामेश्वर भिसे, बापूसाहेब कोरपे, मधुकर तराळ, पी.डी. बाबनेकर, दीपक हिरूळकर आदी उपस्थित होते.भाऊसाहेबांनी त्या काळात कृषी विद्यापीठाची संकल्पना मांडून शेतकºयांना नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी नवीन बियाणे उत्पादित केली पाहिजे. नवीन बियांणाचे संशोधन व्हावे. कमी खर्चात शेतकºयांना अधिक उत्पादन देणारे बियाणे निर्माण करता यावी. तसेच कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून तयार झालेल्या शेतीचे यांत्रिकीकरण झाले पाहिजे या विचारांतून ही संकल्पना मांडली व साकारलीसुद्धा. त्यामुळेच त्या आज शेतकºयांना बळ मिळाल्याचे ना. फुंडकर म्हणाले. संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनीही भाऊसाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी खा. आनंदराव अडसूळ, आ. रमेश बुंदिले यांनी मनोगत व्यक्त केले. भाऊसाहेबांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरूवात झाली. विद्यार्थ्यांनी आसाममधील लोकनृत्य व योगाचे प्रात्यक्षिके लेझीम नृत्याचे सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. प्रास्ताविक प्रचार्य विजय खोरगडे  यांनी, तर संचालन डी.बी. ठाकरे, व ज्योती टेवरे यांनी केले. आभार उत्सवप्रमुख सुरेश घोगरे यांनी मानले. यावेळी सर्व आजीवन सदस्य, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.  

 शेतक-यांना आठ हजार नवीन ट्रॅक्टर देणार    शेतकरी शेती अवजारे व ट्रॅक्टर घेतील, त्यावरील सबसिडी त्वरित देऊन  मंजुर असलेला अर्ज दारांनी कुठल्याही कंपनीचे ट्रॅक्टर व राटाव्हेटर व पेरणीयंत्र  खरेदी करावे. त्यांना त्यामध्ये सबसीडी देऊन ट्रक्टर देण्यात येईल. आतापर्यंत राज्यात चार हजार शेतक-यांना शासनाने ट्रॅक्टरचे वाटप केले असून मार्चपर्यंत आठ हजार नवीन ट्रॅक्टर शासन शेतक-यांना देणार असल्याचे यावेळी कृषिमंत्री फुंडकर यांनी सांगितले. भाऊसाहेबांच्या जन्मगावी पापळ येथे कृषी महाविद्यालय देण्यात येणार असल्याचेही यावेळी घोषणा केली.

टॅग्स :Pandurang Phundkarपांडुरंग फुंडकर