शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

खबरदार ! बालविवाह लावाल तर खडी फोडायला जाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 14:39 IST

जिल्हाधिकारी सौरभ कटियार : अक्षय्य तृतीया मुहूर्तावर करडी नजर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ आणि महाराष्ट्र बालविवाह प्रतिबंध अधिनियम संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे. १० मे रोजी साजऱ्या होणाऱ्या अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात बालविवाह होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह करणाऱ्यावर अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी सूचना जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केली.

बालविवाह प्रतिबंध अधिनियम नागरिक, २००६ नुसार अक्षय्य तृतीया या दिवशी फोटोग्राफर होणारे बालविवाह लावण्यास आदींवर प्रोत्साहन देणाऱ्या व बालविवाह कारवाई लावणाऱ्यांवर बालविवाह प्रतिबंध जिल्हाधिकारी अधिनियमानुसार कारवाई केली जाते. 

मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण व मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तसे नसल्यास विवाह लावून देणाऱ्या व्यक्ती, विवाहाला उपस्थित सर्व कॅटरर्स, मंडप डेकोरेशन, , लग्नविधी करणारे, कायद्यानुसार दंडात्मक करण्याचे आदेश कटियार यांनी संबंधितांना दिले.

अधिनियमानुसार दोन वर्षे कारावास व एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा केल्या जातील. गत सहा वर्षांत तब्बल ३ हजार ९५४ बालविवाह प्रशासकीय यंत्रणेमार्फत रोखले आहेत. मागील वर्षभरात २४ बालविवाह महिला व बालविकास विभागामार्फत जिल्हा बाल संरक्षण कक्षाद्वारे थांबवण्यात आले आहेत. 

बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ मधील कलम १६ (१) नुसार नियुक्त बालविवाह प्रतिबंध अधिकारी (ग्रामीण क्षेत्रासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी) यांना बालविवाह घटना रोखण्यासाठी राष्ट्रीय बालक हक्क संरक्षण आयोग यांच्या निर्देशाप्रमाणे दक्ष राहून बालविवाह रोखण्याच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या आहेत. बालविवाहाला प्रतिबंध घालण्यासाठी बालविवाह प्रतिबंध अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात जनजागृती कार्यक्रम, रॅली, माहितीपत्रके अशा विविध माध्यमातून बालविवाहसारख्या अनिष्ट प्रथेविरुद्ध जनजागृती करावी. आपापल्या परिसरात बालविवाह होत असल्यास, त्याची माहिती आश्रमशाळेतील अधीक्षक, शिक्षक, पोलिस स्टेशन, पोलिस पाटील, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, शहरी व ग्रामीण अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, माध्यमिक व प्राथमिक मुख्याध्यापक व शिक्षकांना देण्यात यावी. तसेच चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०९८ व ११२ किंवा ९०२१३५८८१६ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले. 

टॅग्स :Amravatiअमरावतीmarriageलग्न