शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

खबरदार ! बालविवाह लावाल तर खडी फोडायला जाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 14:39 IST

जिल्हाधिकारी सौरभ कटियार : अक्षय्य तृतीया मुहूर्तावर करडी नजर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ आणि महाराष्ट्र बालविवाह प्रतिबंध अधिनियम संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे. १० मे रोजी साजऱ्या होणाऱ्या अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात बालविवाह होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह करणाऱ्यावर अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी सूचना जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केली.

बालविवाह प्रतिबंध अधिनियम नागरिक, २००६ नुसार अक्षय्य तृतीया या दिवशी फोटोग्राफर होणारे बालविवाह लावण्यास आदींवर प्रोत्साहन देणाऱ्या व बालविवाह कारवाई लावणाऱ्यांवर बालविवाह प्रतिबंध जिल्हाधिकारी अधिनियमानुसार कारवाई केली जाते. 

मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण व मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तसे नसल्यास विवाह लावून देणाऱ्या व्यक्ती, विवाहाला उपस्थित सर्व कॅटरर्स, मंडप डेकोरेशन, , लग्नविधी करणारे, कायद्यानुसार दंडात्मक करण्याचे आदेश कटियार यांनी संबंधितांना दिले.

अधिनियमानुसार दोन वर्षे कारावास व एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा केल्या जातील. गत सहा वर्षांत तब्बल ३ हजार ९५४ बालविवाह प्रशासकीय यंत्रणेमार्फत रोखले आहेत. मागील वर्षभरात २४ बालविवाह महिला व बालविकास विभागामार्फत जिल्हा बाल संरक्षण कक्षाद्वारे थांबवण्यात आले आहेत. 

बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ मधील कलम १६ (१) नुसार नियुक्त बालविवाह प्रतिबंध अधिकारी (ग्रामीण क्षेत्रासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी) यांना बालविवाह घटना रोखण्यासाठी राष्ट्रीय बालक हक्क संरक्षण आयोग यांच्या निर्देशाप्रमाणे दक्ष राहून बालविवाह रोखण्याच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या आहेत. बालविवाहाला प्रतिबंध घालण्यासाठी बालविवाह प्रतिबंध अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात जनजागृती कार्यक्रम, रॅली, माहितीपत्रके अशा विविध माध्यमातून बालविवाहसारख्या अनिष्ट प्रथेविरुद्ध जनजागृती करावी. आपापल्या परिसरात बालविवाह होत असल्यास, त्याची माहिती आश्रमशाळेतील अधीक्षक, शिक्षक, पोलिस स्टेशन, पोलिस पाटील, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, शहरी व ग्रामीण अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, माध्यमिक व प्राथमिक मुख्याध्यापक व शिक्षकांना देण्यात यावी. तसेच चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०९८ व ११२ किंवा ९०२१३५८८१६ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले. 

टॅग्स :Amravatiअमरावतीmarriageलग्न