शहरं
Join us  
Trending Stories
1
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
2
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
3
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
4
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
5
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
6
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
7
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
8
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
9
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
10
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
11
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
12
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
13
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
14
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
15
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
16
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
17
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
18
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
19
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
20
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी

खबरदार ! बालविवाह लावाल तर खडी फोडायला जाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 14:39 IST

जिल्हाधिकारी सौरभ कटियार : अक्षय्य तृतीया मुहूर्तावर करडी नजर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ आणि महाराष्ट्र बालविवाह प्रतिबंध अधिनियम संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे. १० मे रोजी साजऱ्या होणाऱ्या अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात बालविवाह होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह करणाऱ्यावर अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी सूचना जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केली.

बालविवाह प्रतिबंध अधिनियम नागरिक, २००६ नुसार अक्षय्य तृतीया या दिवशी फोटोग्राफर होणारे बालविवाह लावण्यास आदींवर प्रोत्साहन देणाऱ्या व बालविवाह कारवाई लावणाऱ्यांवर बालविवाह प्रतिबंध जिल्हाधिकारी अधिनियमानुसार कारवाई केली जाते. 

मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण व मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तसे नसल्यास विवाह लावून देणाऱ्या व्यक्ती, विवाहाला उपस्थित सर्व कॅटरर्स, मंडप डेकोरेशन, , लग्नविधी करणारे, कायद्यानुसार दंडात्मक करण्याचे आदेश कटियार यांनी संबंधितांना दिले.

अधिनियमानुसार दोन वर्षे कारावास व एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा केल्या जातील. गत सहा वर्षांत तब्बल ३ हजार ९५४ बालविवाह प्रशासकीय यंत्रणेमार्फत रोखले आहेत. मागील वर्षभरात २४ बालविवाह महिला व बालविकास विभागामार्फत जिल्हा बाल संरक्षण कक्षाद्वारे थांबवण्यात आले आहेत. 

बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ मधील कलम १६ (१) नुसार नियुक्त बालविवाह प्रतिबंध अधिकारी (ग्रामीण क्षेत्रासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी) यांना बालविवाह घटना रोखण्यासाठी राष्ट्रीय बालक हक्क संरक्षण आयोग यांच्या निर्देशाप्रमाणे दक्ष राहून बालविवाह रोखण्याच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या आहेत. बालविवाहाला प्रतिबंध घालण्यासाठी बालविवाह प्रतिबंध अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात जनजागृती कार्यक्रम, रॅली, माहितीपत्रके अशा विविध माध्यमातून बालविवाहसारख्या अनिष्ट प्रथेविरुद्ध जनजागृती करावी. आपापल्या परिसरात बालविवाह होत असल्यास, त्याची माहिती आश्रमशाळेतील अधीक्षक, शिक्षक, पोलिस स्टेशन, पोलिस पाटील, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, शहरी व ग्रामीण अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, माध्यमिक व प्राथमिक मुख्याध्यापक व शिक्षकांना देण्यात यावी. तसेच चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०९८ व ११२ किंवा ९०२१३५८८१६ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले. 

टॅग्स :Amravatiअमरावतीmarriageलग्न