शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
3
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
5
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
6
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
7
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
9
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
10
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
11
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
12
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
13
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
14
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
15
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
16
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
17
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
18
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
19
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
20
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित

सावधान! रविवारपर्यंत उष्णतेची लाट

By admin | Updated: May 18, 2016 00:07 IST

येत्या रविवारपर्यंत जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. कोरड्या हवामानामुळे तापमानात प्रचंड वाढ झाली आहे.

अमरावती : येत्या रविवारपर्यंत जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. कोरड्या हवामानामुळे तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. अंगाची काहिली करणाऱ्या उन्हामुळे विविध आजार जडण्याची शक्यता आहे. परंतु दक्षता घेतल्यास उष्माघातापासून बचाव करता येतो. उष्माघातामुळे होणारे मृत्यूदेखील टाळता येऊ शकतात. यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी केले आहे. काय करावे - उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टी.व्ही. किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा जणेकरुन आज उष्णतामान किती आहे, याची माहिती मिळेल.भरपूर पाणी प्यावे, हलक्या पातळ व सछिद्र कपड्यांचा वापर करावा. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री किंवा हॅट, बुट किंवा चप्पलचा वापर करावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी. उन्हात काम करीत असताना हॅट किंवा छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान, चेहरा झाकण्याचा प्रयत्न करावा.शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविलेल लस्सी, लिंबू-पाणी, ताक इत्यादी पेय नियमित प्यावे. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत घाम येणे ही उष्माघाताची लक्षणे आहेत. चक्कर येत असेल तर त२त्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गुरांना छावणीत ठेवावे तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे, ओल्या कपड्यांचा वापर करावा थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. कामाच्या ठिकाणी थंड पाण्याची व्यवस्था करावी. कामगारांनी सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळावा. अधिकाधिक कामे सकाळीच करुन घ्यावेत. गरोदर महिलांनी अधिक काळजी घ्यावी. काय करु नयेलहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद ठिकाणी किंवा पार्क केलेल्या वाहनात कधीच ठेऊ नये. दुपारी १२ ते ३ या वेळेत बाहेर उन्हात जाण्याचे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. दुपारी १२ ते ३ या वेळेत तसेच बाहेर तापमान अधिक असल्यास श्रमाची कामे करण्याचे टाळावे. उन्हात स्वयंपाक करणे टाळावे तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघड्या ठेवाव्यात. चहा, कॉफी, मद्य व काबोर्नेटेड थंडपेय यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे या गोष्टी पिण्याचे टाळावे. शिळे अन्न खाऊ नये आणि उच्चप्रथिने असलेले अन्न टाळावे. उष्णतेची लाट शरीराला फार हानिकारक आहे. उपरोक्त उपाययोजनांमुळे उष्माघातापासून बचाव करता येऊ शकतो.