शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
4
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
5
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
6
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
7
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
8
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
9
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
10
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
11
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
12
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
13
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
14
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
15
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
16
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
17
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
18
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
19
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
20
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?

सावधान! रविवारपर्यंत उष्णतेची लाट

By admin | Updated: May 18, 2016 00:07 IST

येत्या रविवारपर्यंत जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. कोरड्या हवामानामुळे तापमानात प्रचंड वाढ झाली आहे.

अमरावती : येत्या रविवारपर्यंत जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. कोरड्या हवामानामुळे तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. अंगाची काहिली करणाऱ्या उन्हामुळे विविध आजार जडण्याची शक्यता आहे. परंतु दक्षता घेतल्यास उष्माघातापासून बचाव करता येतो. उष्माघातामुळे होणारे मृत्यूदेखील टाळता येऊ शकतात. यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी केले आहे. काय करावे - उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टी.व्ही. किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा जणेकरुन आज उष्णतामान किती आहे, याची माहिती मिळेल.भरपूर पाणी प्यावे, हलक्या पातळ व सछिद्र कपड्यांचा वापर करावा. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री किंवा हॅट, बुट किंवा चप्पलचा वापर करावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी. उन्हात काम करीत असताना हॅट किंवा छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान, चेहरा झाकण्याचा प्रयत्न करावा.शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविलेल लस्सी, लिंबू-पाणी, ताक इत्यादी पेय नियमित प्यावे. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत घाम येणे ही उष्माघाताची लक्षणे आहेत. चक्कर येत असेल तर त२त्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गुरांना छावणीत ठेवावे तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे, ओल्या कपड्यांचा वापर करावा थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. कामाच्या ठिकाणी थंड पाण्याची व्यवस्था करावी. कामगारांनी सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळावा. अधिकाधिक कामे सकाळीच करुन घ्यावेत. गरोदर महिलांनी अधिक काळजी घ्यावी. काय करु नयेलहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद ठिकाणी किंवा पार्क केलेल्या वाहनात कधीच ठेऊ नये. दुपारी १२ ते ३ या वेळेत बाहेर उन्हात जाण्याचे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. दुपारी १२ ते ३ या वेळेत तसेच बाहेर तापमान अधिक असल्यास श्रमाची कामे करण्याचे टाळावे. उन्हात स्वयंपाक करणे टाळावे तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघड्या ठेवाव्यात. चहा, कॉफी, मद्य व काबोर्नेटेड थंडपेय यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे या गोष्टी पिण्याचे टाळावे. शिळे अन्न खाऊ नये आणि उच्चप्रथिने असलेले अन्न टाळावे. उष्णतेची लाट शरीराला फार हानिकारक आहे. उपरोक्त उपाययोजनांमुळे उष्माघातापासून बचाव करता येऊ शकतो.