शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! रविवारपर्यंत उष्णतेची लाट

By admin | Updated: May 18, 2016 00:07 IST

येत्या रविवारपर्यंत जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. कोरड्या हवामानामुळे तापमानात प्रचंड वाढ झाली आहे.

अमरावती : येत्या रविवारपर्यंत जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. कोरड्या हवामानामुळे तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. अंगाची काहिली करणाऱ्या उन्हामुळे विविध आजार जडण्याची शक्यता आहे. परंतु दक्षता घेतल्यास उष्माघातापासून बचाव करता येतो. उष्माघातामुळे होणारे मृत्यूदेखील टाळता येऊ शकतात. यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी केले आहे. काय करावे - उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टी.व्ही. किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा जणेकरुन आज उष्णतामान किती आहे, याची माहिती मिळेल.भरपूर पाणी प्यावे, हलक्या पातळ व सछिद्र कपड्यांचा वापर करावा. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री किंवा हॅट, बुट किंवा चप्पलचा वापर करावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी. उन्हात काम करीत असताना हॅट किंवा छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान, चेहरा झाकण्याचा प्रयत्न करावा.शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविलेल लस्सी, लिंबू-पाणी, ताक इत्यादी पेय नियमित प्यावे. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत घाम येणे ही उष्माघाताची लक्षणे आहेत. चक्कर येत असेल तर त२त्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गुरांना छावणीत ठेवावे तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे, ओल्या कपड्यांचा वापर करावा थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. कामाच्या ठिकाणी थंड पाण्याची व्यवस्था करावी. कामगारांनी सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळावा. अधिकाधिक कामे सकाळीच करुन घ्यावेत. गरोदर महिलांनी अधिक काळजी घ्यावी. काय करु नयेलहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद ठिकाणी किंवा पार्क केलेल्या वाहनात कधीच ठेऊ नये. दुपारी १२ ते ३ या वेळेत बाहेर उन्हात जाण्याचे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. दुपारी १२ ते ३ या वेळेत तसेच बाहेर तापमान अधिक असल्यास श्रमाची कामे करण्याचे टाळावे. उन्हात स्वयंपाक करणे टाळावे तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघड्या ठेवाव्यात. चहा, कॉफी, मद्य व काबोर्नेटेड थंडपेय यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे या गोष्टी पिण्याचे टाळावे. शिळे अन्न खाऊ नये आणि उच्चप्रथिने असलेले अन्न टाळावे. उष्णतेची लाट शरीराला फार हानिकारक आहे. उपरोक्त उपाययोजनांमुळे उष्माघातापासून बचाव करता येऊ शकतो.