शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
7
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
8
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
9
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
10
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
11
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
12
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
13
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
14
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
15
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
16
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
17
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
20
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा

सावधान! रविवारपर्यंत उष्णतेची लाट

By admin | Updated: May 18, 2016 00:07 IST

येत्या रविवारपर्यंत जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. कोरड्या हवामानामुळे तापमानात प्रचंड वाढ झाली आहे.

अमरावती : येत्या रविवारपर्यंत जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. कोरड्या हवामानामुळे तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. अंगाची काहिली करणाऱ्या उन्हामुळे विविध आजार जडण्याची शक्यता आहे. परंतु दक्षता घेतल्यास उष्माघातापासून बचाव करता येतो. उष्माघातामुळे होणारे मृत्यूदेखील टाळता येऊ शकतात. यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी केले आहे. काय करावे - उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टी.व्ही. किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा जणेकरुन आज उष्णतामान किती आहे, याची माहिती मिळेल.भरपूर पाणी प्यावे, हलक्या पातळ व सछिद्र कपड्यांचा वापर करावा. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री किंवा हॅट, बुट किंवा चप्पलचा वापर करावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी. उन्हात काम करीत असताना हॅट किंवा छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान, चेहरा झाकण्याचा प्रयत्न करावा.शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविलेल लस्सी, लिंबू-पाणी, ताक इत्यादी पेय नियमित प्यावे. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत घाम येणे ही उष्माघाताची लक्षणे आहेत. चक्कर येत असेल तर त२त्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गुरांना छावणीत ठेवावे तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे, ओल्या कपड्यांचा वापर करावा थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. कामाच्या ठिकाणी थंड पाण्याची व्यवस्था करावी. कामगारांनी सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळावा. अधिकाधिक कामे सकाळीच करुन घ्यावेत. गरोदर महिलांनी अधिक काळजी घ्यावी. काय करु नयेलहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद ठिकाणी किंवा पार्क केलेल्या वाहनात कधीच ठेऊ नये. दुपारी १२ ते ३ या वेळेत बाहेर उन्हात जाण्याचे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. दुपारी १२ ते ३ या वेळेत तसेच बाहेर तापमान अधिक असल्यास श्रमाची कामे करण्याचे टाळावे. उन्हात स्वयंपाक करणे टाळावे तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघड्या ठेवाव्यात. चहा, कॉफी, मद्य व काबोर्नेटेड थंडपेय यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे या गोष्टी पिण्याचे टाळावे. शिळे अन्न खाऊ नये आणि उच्चप्रथिने असलेले अन्न टाळावे. उष्णतेची लाट शरीराला फार हानिकारक आहे. उपरोक्त उपाययोजनांमुळे उष्माघातापासून बचाव करता येऊ शकतो.