शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वाघांच्या जीवावर उठल्या बावरिया टोळ्या; विदर्भात सक्रिय; आसाम, हरयाणा, तेलंगणा ते पंजाबपर्यंत कनेक्शन

By गणेश वासनिक | Updated: July 29, 2023 05:48 IST

राज्यात सर्वाधिक वाघ असलेल्या विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांवर आंतरराज्यीय तस्करांची नजर आहे.

अमरावती : राज्यात सर्वाधिक वाघ असलेल्या विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांवर आंतरराज्यीय तस्करांची नजर आहे. नजीकच्या गावांतील स्थानिकांना हाताशी धरून बावरिया टोळ्या शिकारी करत असल्याचे उघड झाले आहे. दिल्ली येथील वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोच्या अलर्टनुसार देशासह विदर्भातील मेळघाट, ताडोबा-अंधारी, पेंच, बोर, टिपेश्वर, नवेगाव- नागझिरा या अभयारण्यात वाघ तस्करीचे संकेत दिले आहेत. 

ब्युरोच्या निर्देशानुसार मेळघाट आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर व गडचिरोली आणि गडचिरोलीजवळच्या आंबेशिवणी येथे काही ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या मदतीने धाडसत्र राबविले. त्यात शिकारीच्या साहित्यासह संशयित सहा पुरुष, पाच महिला, पाच लहान मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र, आता आसाम, हरयाणा, तेलंगणा ते पंजाब राज्यातील बावरिया टोळीने वाघ तस्करीचे जाळे पसरले आहे. 

व्याघ्र प्रकल्पातील गावांचे पुनर्वसन आवश्यक

 व्याघ्र प्रकल्पातील गावांचे पुनर्वसन रखडल्याने वाघांचे संवर्धन, संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  मेळघाट व्याघ्र प्रकल्पात अद्यापही १० गावांचे पुनर्वसन झाले नसून ५५ कोटी निधीची गरज आहे. पेंचमध्ये ११० लोकसंख्येच्या फुलझरी या गावचे पुनर्वसन रखडले आहे. 

 ५७ जणांचा पुनर्वसनाला नकार आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील २४४ कुटुंबे संख्या असलेल्या रानतडोदी या गावचे पुनर्वसन थांबले आहे.

पुनर्वसनास निधीची कमतरता नाही

व्याघ्र प्रकल्पातील गावांच्या पुनर्वसनासाठी निधीची कमतरता नाही. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आतापर्यंत पाच गावांचे पुनर्वसन झाले आहे. एकमात्र रानतडोदी हे गाव राहिले असून, पावसाअभावी ते थांबले आहे.     - जितेंद्र रामगावकर, क्षेत्र संचालक, ताडोबा-अधारी     व्याघ्र प्रकल्प

टॅग्स :TigerवाघAmravatiअमरावती