शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

धान्याची आधारभूत किंमत कागदावरच

By admin | Updated: December 15, 2014 22:49 IST

ऊन, वारा, पाऊस, वादळाचा सामना करीत शेतकऱ्यांनी पिकविलेल्या धान्यासाठी शासनाने जाहीर केलेली आधारभूत किंमत केवळ कागदावरच राहिली आहे. खासगी व्यापाऱ्यांना आधारभूत किमतीने धान्य

अमरावती : ऊन, वारा, पाऊस, वादळाचा सामना करीत शेतकऱ्यांनी पिकविलेल्या धान्यासाठी शासनाने जाहीर केलेली आधारभूत किंमत केवळ कागदावरच राहिली आहे. खासगी व्यापाऱ्यांना आधारभूत किमतीने धान्य खरेदी करण्याच्या सूचना असल्या तरीही व्यापाऱ्यांद्वारा या सूचनांना केराची टोपली दाखविण्यात येते व कमी भावात धान्याची खरेदी करण्यात येते. त्यामुळे शासनाने जाहीर केलेली धान्याची आधारभूत किंमत केवळ शेतकऱ्यांच्या समाधानासाठीच आहे काय, असा सवाल संतप्त शेतकऱ्यांचा आहे.शासनाने शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी खरीप व रबी हंगामातील ज्वारी, बाजरी, मका, तूर, उडीद, कापूस, सोयाबीन, मूग, हरभरा व गहू या धान्याची आधारभूत किंमत जाहीर केली. खरीप व रबी हंगामात आधारभूत किमतीमध्ये धान्य खरेदी करण्याच्या सूचना व्यापाऱ्यांना दिल्यात. त्यासाठी सहकारी संस्थांच्या सहायक निबंधकाची मदत घेण्यात आली. परंतु ग्रामीण भागात व तालुक्याच्या ठिकाणी या सूचनेला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाल्याने शासनाने गावपातळीवरील या धान्य खरेदीकडे गांभीर्याने घेऊन शेतकऱ्यांचे धान्य आधारभूत किंमतीमध्येच व्यापाऱ्यांद्वारा खरेदी केल्या गेली पाहिजे याची दक्षता घेणे गरजेचे आहे.