शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्ज वाटपाच्या प्रारंभालाच बँकांचा असहकार

By admin | Updated: April 14, 2017 00:10 IST

साधारणपणे एप्रिल महिन्यापासून खरीप कर्जाचे वाटप जिल्ह्यात सुरू होते. नंतरच्या महिन्यामध्ये वाटपाचा टक्का वाढतो.

गतवर्षीची कर्जवसुलीच नाही : शेतकऱ्यांना शासनाच्या तोडग्याची प्रतीक्षाअमरावती : साधारणपणे एप्रिल महिन्यापासून खरीप कर्जाचे वाटप जिल्ह्यात सुरू होते. नंतरच्या महिन्यामध्ये वाटपाचा टक्का वाढतो. गतवर्षीच्या कर्जाची वसुली ही फक्त १० ते १५ टक्क्यांच्या दरम्यान असल्याने बँकांनी वाढीव लक्ष्यांक घेण्यास व किंबहुना यंदाचे कर्ज वाटपास प्रारंभाला प्रशासनाला व पर्यायाने शेतकऱ्यांना असहकार केला आहे. यंदाच्या खरीप व रबी हंगामासाठी जिल्हा सहकारी बँकेला ६३० कोटी, राष्ट्रीयीकृत बँकांना १,१५१ कोटी व ग्रामीण बँकांना १५९ कोटी रुपये असे एकूण १,९४१ कोटींचे लक्ष्यांक आहे. गतवर्षीच्या तुलनेत किमान १० टक्के वाढीव लक्ष्यांक आहे. गतवर्षीच्या तुलनेत किमान १० टक्के वाढीव लक्ष्यांक असावयास हवा होता. मात्र गतवर्षीच्या कर्जाची वसुलीच झाली नसल्याने बँकांची आर्थिक स्थिती डबघाईस आली व वाढीव लक्ष्यांक घेण्यास बँकांनी नकार दिल्याने प्रशासनाला २०४ कोटी ६८ लाखांनी लक्ष्यांक कमी करण्याची नामुष्की आली. राज्य शासनाने यापूर्वी पत्रक काढून सर्व बँकांनी शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी कर्जवाटपाचे निर्देश दिलेत, तर दोन दिवसांपूर्वी राज्यमंत्री दर्जा असणाऱ्या शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी येथे बैठक आयोजित करून ३१ मे पूर्वी खरीप कर्जवाटपाचे निर्देश सर्व बँकांना दिले आहेत. प्रत्यक्षात बँकांनी अद्याप खरिप हंगामाच्या कर्ज वाटपास सुरुवातच केली नसल्यामुळे बँका शासनाला किती जुमानतात, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)जिल्हा बँकेची ३१ मार्चअखेर स्थितीजिल्हा बँकेकडे अल्पमुदती कर्जाची ३१ मार्च अखेर ३१२.७७ कोटी थकीत व ३९१.७१ कोटी चालू अशी एकूण ७०४.४९ कोटी कर्ज मागणी आहे. यामध्ये १६७.७९ लाख थकीत व ९५.१८ चालू अशी एकूण १११.९८ कोटी वसुली झाली. ही १६ टक्केवारी आहे.मध्यम मुदती शेती कर्जामध्ये १११.१२ लाख थकीत व ६२.५३ लाख चालू अशी एकूण १७३.६४ लाखांची कर्ज मागणी आहे. त्या तुलनेत ४९७.५७ लाख थकीत व ७४६.३५ लाख चालू अशी एकूण १२४३.९२ लाख रुपयांची वसुली झाली. ही ७ टक्केवारी आहे. शेती कर्जाची वसुली १४ टक्केजिल्हा बँकेकडे ४२४.०६ लाख थकित ४५४.३० लाख चालू असे एकूण ८७८.३६ लाखांची कर्ज मागणी आहे. या तुलनेत ३१ मार्च अखेर २१७७.६६ लाख थकीत व १०२.६४ कोटी असे एकूण १२४.४२ कोटी रुपयांची वसुली झाली. ही १४ टक्केवारी आहे.