शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

माफीनंतरही बँकांची व्याज वसुली

By admin | Updated: August 9, 2015 23:55 IST

गतवर्षीच्या टंचाईग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रूपांतरीत पीककर्जाच्या पहिल्या वर्षाचे व्याज शासन भरणा करणार आहे.

पहिल्या वर्षाचे व्याज शासन भरणार : पुढील चार वर्षांच्या सहा टक्के व्याजाचाही शासन करणार भरणालोकमत विशेषगजानन मोहोड अमरावतीगतवर्षीच्या टंचाईग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रूपांतरीत पीककर्जाच्या पहिल्या वर्षाचे व्याज शासन भरणा करणार आहे. पुढील ४ वर्षांच्या १२ टक्क्यापैकी ६ टक्क्याच्या व्याजाचा भरणा देखील शासन करणार आहे. या संदर्भात शासनादेश असूनही बहुतेक बँका शेतकऱ्यांजवळून मात्र ११ टक्के व्याजाचा भरणा करून घेत आहेत. शेतकरी शासन निर्णयापासून अनभिज्ञ असल्यामुळे बँकांना बळी पडत आहेत. याविषयी जागृती होणे महत्त्वाचे आहे. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात नैसर्गिक आपत्तीग्रस्त जिल्ह्यात कर्जाचे रूपांतरण करून प्रथम हप्ता भरणाऱ्या शेतकऱ्यांचे पहिल्या वर्षाचे संपूर्ण ७ टक्के व्याजाचा भरणा शासन करणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील ४५ हजार ८४६ शेतकऱ्यांना ४०४ कोटी २३ लाखाच्या पिक कर्जाचे रूपांतरण/ पुनर्गठन झालेल्या पहिल्या वर्षाच्या व्याजापासून दिलासा मिळाला आहे. या शासन निर्णयामुळे वाढत्या व्याजदराच्या जोखडातून शेतकरी मुक्त होणार आहे. शेतकऱ्यांनी बँकांंकडून पीककर्ज घेऊन केलेली पेरणी पावसाच्या दडीमुळे धोक्यात आली आहे. शेतकरी आर्थिक संकटात असताना २९ जुलै रोजीच्या शासन निर्णयामुळे शेतकऱ्यांना अंशत: दिलासा मिळाला आहे. दरवर्षी वाढत्या कर्जाच्या डोंगरामुळे शेतकरी जेरीस आला असताना काही बँका मात्र शेतकऱ्यांकडून पीककर्ज व्याजाची वसुली करीत आहे. जिल्ह्यात ४०४ कोटींचे कर्ज रुपांतरणगतवर्षी २०१४-१५ या हंगामात जिल्ह्यात १ लाख २० हजार ५६० शेतकऱ्यांनी ११२० कोटी ३६ लाख रुपयांचे पीककर्ज घेतले होते. यापैकी ४५ हजार ८४६ शेतकऱ्यांचे ४०४ कोटी २३ लाखांचे कर्ज रुपांतरणास पात्र होते. यापैकी ३९ हजार ९४७ शेतकरी खातेदारांचे २४ आॅगस्टपर्यंत ३४६ कोटी ३० लाख रुपयांच्या कर्जाचे पाच वर्षांसाठी पुनर्गठन करण्यात आले आहे.