शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

माफीनंतरही बँकांची व्याज वसुली

By admin | Updated: August 9, 2015 23:55 IST

गतवर्षीच्या टंचाईग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रूपांतरीत पीककर्जाच्या पहिल्या वर्षाचे व्याज शासन भरणा करणार आहे.

पहिल्या वर्षाचे व्याज शासन भरणार : पुढील चार वर्षांच्या सहा टक्के व्याजाचाही शासन करणार भरणालोकमत विशेषगजानन मोहोड अमरावतीगतवर्षीच्या टंचाईग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रूपांतरीत पीककर्जाच्या पहिल्या वर्षाचे व्याज शासन भरणा करणार आहे. पुढील ४ वर्षांच्या १२ टक्क्यापैकी ६ टक्क्याच्या व्याजाचा भरणा देखील शासन करणार आहे. या संदर्भात शासनादेश असूनही बहुतेक बँका शेतकऱ्यांजवळून मात्र ११ टक्के व्याजाचा भरणा करून घेत आहेत. शेतकरी शासन निर्णयापासून अनभिज्ञ असल्यामुळे बँकांना बळी पडत आहेत. याविषयी जागृती होणे महत्त्वाचे आहे. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात नैसर्गिक आपत्तीग्रस्त जिल्ह्यात कर्जाचे रूपांतरण करून प्रथम हप्ता भरणाऱ्या शेतकऱ्यांचे पहिल्या वर्षाचे संपूर्ण ७ टक्के व्याजाचा भरणा शासन करणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील ४५ हजार ८४६ शेतकऱ्यांना ४०४ कोटी २३ लाखाच्या पिक कर्जाचे रूपांतरण/ पुनर्गठन झालेल्या पहिल्या वर्षाच्या व्याजापासून दिलासा मिळाला आहे. या शासन निर्णयामुळे वाढत्या व्याजदराच्या जोखडातून शेतकरी मुक्त होणार आहे. शेतकऱ्यांनी बँकांंकडून पीककर्ज घेऊन केलेली पेरणी पावसाच्या दडीमुळे धोक्यात आली आहे. शेतकरी आर्थिक संकटात असताना २९ जुलै रोजीच्या शासन निर्णयामुळे शेतकऱ्यांना अंशत: दिलासा मिळाला आहे. दरवर्षी वाढत्या कर्जाच्या डोंगरामुळे शेतकरी जेरीस आला असताना काही बँका मात्र शेतकऱ्यांकडून पीककर्ज व्याजाची वसुली करीत आहे. जिल्ह्यात ४०४ कोटींचे कर्ज रुपांतरणगतवर्षी २०१४-१५ या हंगामात जिल्ह्यात १ लाख २० हजार ५६० शेतकऱ्यांनी ११२० कोटी ३६ लाख रुपयांचे पीककर्ज घेतले होते. यापैकी ४५ हजार ८४६ शेतकऱ्यांचे ४०४ कोटी २३ लाखांचे कर्ज रुपांतरणास पात्र होते. यापैकी ३९ हजार ९४७ शेतकरी खातेदारांचे २४ आॅगस्टपर्यंत ३४६ कोटी ३० लाख रुपयांच्या कर्जाचे पाच वर्षांसाठी पुनर्गठन करण्यात आले आहे.