शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
3
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
4
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
5
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
6
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
7
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
8
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
9
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
10
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
11
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
12
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
13
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
14
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
15
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
16
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
17
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
18
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
19
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
20
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या तापमानाचा केळीच्या बागांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 01:30 IST

वाढत्या तापमानाने पाणीपातळीत कमालीची घट झाली आहे. तद्वतच केळी बागांवर मोठा दुष्परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. झाडे उन्मळून पडण्याच्या स्थितीत आले असून तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे.

ठळक मुद्देअंजनगाव तालुक्यात महत्तम नुकसान : उपाययोजना निकामी

चेतन घोगरे।लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : वाढत्या तापमानाने पाणीपातळीत कमालीची घट झाली आहे. तद्वतच केळी बागांवर मोठा दुष्परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. झाडे उन्मळून पडण्याच्या स्थितीत आले असून तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे.तालुक्यातील खानापूर पांढरी, देवगाव, धाडी, दहिगाव रेचा, भंडारज, हंतोडा व इतर गावांतील शिवारात केळीची लागवड झाली आहे. सध्या वाढत्या तापमानामुळे केळीबागांना मोठा फटका बसत आहे. अनेक उपाययोजना करूनही उष्ण तापमानामुळे केळीचे नुकसान थांबता थांबेनासे झाले आहे. मागील आठवडाभरापासून पारा ४५ अंशाच्यावर आहे. या तापमानात कितीही पाणी दिले तरी केळीची पाने करपत आहेत. रात्रीच्या वेळी या केळीच्या बागांना पाणी देणे गरजेचे असताना विजेच्या लंपडावामुळे केळीला पाणी देणे शक्य होत नाही.अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेतकरी प्रवीण नेमाडे, नितीन पटेल यांनी पाच ते सहा हजार केळीची झाडे लावली आहेत. परंतु, उन्हाच्या तीव्रतेमुळे ही झाडे अर्ध्यातूनच उन्मळून पडत आहेत. यामुळे उत्पादनक्षमता कमी होत असून लाखो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उष्ण वाºयापासून सरंक्षण व्हावे, जमिनीत ओलावा टिकून राहावा, यासाठी शेडनेट करावे, केळीबागांच्या चारही बाजूला सावरा जातीची झाडे व इतर गवत लावून काही प्रमाणात तरी संरक्षण होईल, यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्ला कृषी तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे; परंतु, उन्हाच्या तीव्रतेमुळे या उपाययोजनाही निष्फळ ठरत असल्याचे दिसून येत आहे.दररोज दहा घडांचे नुकसानअंजनगाव सुर्जी तालुक्यात पाणी नसल्याने उत्पादनात घट होत असतानाच दुसरीकडे मात्र वाढत्या तापमानाचा मोठा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. उष्ण वातावरण व हवेमुळे केळीबागेतील दररोज पाच ते दहा घड उन्मळून पडत आहेत. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे दिवसाकाठी अडीच हजार रुपयांचे नुकसान होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :weatherहवामान