शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मेळघाटात तीन महिन्यांत ६० बालमृत्यू, आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 19:33 IST

धारणी(अमरावती) : मेळघाटातील धारणी तालुक्यात गत तीन महिन्यांत ६० बालकांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले.

धारणी(अमरावती) : मेळघाटातील धारणी तालुक्यात गत तीन महिन्यांत ६० बालकांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. यामुळे शासन स्तरावरून चालविण्यात येणा-या योजना मेळघाटात कुचकामी ठरल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. एकात्मिक बाल विकास प्रकल्पातून मिळालेल्या माहितीनुसार, मागील तीन महिन्यात शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालमृत्यूचे प्रमाण पाहिल्यावर ते लक्षात येते.सप्टेंबर महिन्यात २२, आॅक्टोबर २८, तर नोव्हेंबरमध्ये १० बालकांचा मृत्यू झाला. मेळघाटात आरोग्य यंत्रणेने चांगले काम करावे, यासाठी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी अनेक दौरे केले. नागरिकांशी संवाद साधला. टेली मेडिसिन सेवा सुरू केली. आरोग्य यंत्रणेने मेळघाटातील प्रत्येक गावात जाऊन सेवा द्याव्यात, असे आदेशही दिले. मात्र, डॉक्टरांची कमतरात, दुर्गम भाग व अज्ञान यामुळे कुपोषणावर तोडगा काढण्यात शासन व प्रशासन अपयशी ठरले आहे. येथे कार्यरत असलेल्या डॉक्टरांच्या व आशा सेविकांच्या कामावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.अंगणवाडी सेविकांची मोठी भूमिकामेळघाटात आरोग्यासंदर्भात जनजागृती करण्यात अंगणवाडी सेविकांचा मोठा वाटा आहे. मेळघाटात काही ठिकाणी बालकांना व गर्भवतींना पोषण आहार पुरविण्याचे काम अंगणवाडी सेविकांकडे आहे. यासोबतच अंगणवाडी सेविका आरोग्यसेवा सुधारण्यात पुढाकार घेतात. २४ दिवस अंगणवाडी सेविकांचा संप सुरू होता. या काळात मेळघाटात आरोग्याविषयी जनजागृती झाली नाही, हे बालमृत्यूच्या प्रमाणावरून दिसते.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बालमृत्यूच्या प्रमाणात घट झाली आहे. मागील महिन्यांची आकडेवारी अद्याप माझ्यापर्यंत पोहोचली नाही. मात्र, याबाबत विचारणा करून पावले उचलू.- शरद जोगी,तालुका आरोग्य अधिकारीअंगणवाडी सेविकांकडे अनेक कामे असतात. आता तर निवडणुकीचे कामही लावले आहे. अंगणवाडी सेविका सामाजिक भान जपून काम करीत असल्याने मेळघाटातील परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात शासनाला यश आले आहे.- बी. के. जाधव,महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी संघ (आयटक)

टॅग्स :Amravatiअमरावती