शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बडनेरा रेल्वेस्थानक असुरक्षितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 00:52 IST

स्थानिक रेल्वेस्थानकावर एका १९ वर्षांच्या मुलाला २५ हजार व्होल्ट ओव्हरहेड विद्युत वाहिनीची सेल्फी काढण्याच्या नादात जबर धक्का बसला. यापूर्वीदेखील अशीच एक घटना घडली. अशा प्रकरणांमुळे बडनेरा रेल्वे स्थानक असुरक्षित असल्याचे प्रवाशांमध्ये बोलले जात आहे.

ठळक मुद्देप्रवासी वाऱ्यावर : आरपीएफ, जीआरपी करतात काय?

श्यामकांत सहस्त्रभोजने ।लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : स्थानिक रेल्वेस्थानकावर एका १९ वर्षांच्या मुलाला २५ हजार व्होल्ट ओव्हरहेड विद्युत वाहिनीची सेल्फी काढण्याच्या नादात जबर धक्का बसला. यापूर्वीदेखील अशीच एक घटना घडली. अशा प्रकरणांमुळे बडनेरा रेल्वे स्थानक असुरक्षित असल्याचे प्रवाशांमध्ये बोलले जात आहे. आरपीएफ, जीआरपी रेलवे स्थानकाच्या व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी करतात तरी काय, असा सवाल भयग्रस्त प्रवासी तसेच शहरसीयांमध्ये विचारला जात आहे.तीन वर्षांपूर्वी बडनेरा रेल्वे स्थानकावर एका विद्यार्थ्यांचा पेट्रोलने भरून असणाºया टॅँकवर मोबाइलमध्ये सेल्फी काढत असताना २५ हजार वोल्ट ओव्हरहेड विद्युत वाहिनीचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. तो पुण्याचा होता. इतर मित्रांसोबत अमरावतीत अभ्यास दौºयासाठी आला होता. तसेच नुकतेच १० डिसेंबर रोजी चांदूर रेल्वे तालुक्यातील कारला येथील १९ वर्षीय युवक अंकुश चव्हाण हा सेल्फी काढण्याच्या नादात ओव्हरहेड विद्युत वाहिनीकडे खेचला गेला. तो खासगी दवाखान्यात उपचार घेत आहे. हादेखील एका ज्वलनशील असणाºया टॅँकरवर चढला होता, असे बोलले जात आहे. अशा दोन घटनांमुळे आरपीएफ, जीआरपीचे रेल्वे स्थानकाच्या व प्रवाशांच्या सुरक्षेकडे लक्ष आहे का, असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे या रेल्वे स्थानकावरील एका कॅन्टीनलादेखील शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. ती आग विझविण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली. नुकताच एका प्रवाशाचा कटून मृत्यू झाला. अशा घटना येथे नित्याच्याच झाल्या आहेत. एकूणच या घटनांमध्ये आरपीएफ व जीआरपीच्या कार्यक्षमतेवर प्रवासी वर्गांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.मोबाईलचोर सक्रियरेल्वे स्थानकावर मोबाईल व पाकीटमारीच्या घटना रोज घडत आहेत. रेल्वे सुरक्षा बलाच्या दुर्लक्षामुळे येथे चोरटे सक्रिय झाले आहे. विभागीय शहराला लागून असल्याने बडनेरा रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्याचाच चोरटे गैरफायदा घेत आहे. प्रवासी तक्रारी देत नसल्याने त्यांचे फावत आहे.स्टॉलधारकांचा माल जातो रुळावरूनस्टॉलधारक सर्रास त्यांचा माल रेल्वे रुळावरुन नेतात. मालगाडी असो की प्रवासी गाडी त्यांना रेल्वेच्या नियमाची कुठलीच भीती वाटत नाही. त्यांच्यावर थातूरमातूर कारवाई केली जाते. त्यांचा माल ब्रिजवरुनच प्लॉटफॉर्मवर यायला पाहिजे. हा सर्व धोकायदायक प्रकार प्रशासनाच्या डोळ्यासमोरच होत असतो.अवैध खाद्य पदार्थ विक्रेत्यांचा भरणाबडनेरा रेल्वे स्थानकावर अवैध खाद्य पदार्थ विक्रेत्यांची दादागिरीच असल्याचे चित्र आहे. मनमानी कारभार येथे सुरू आहे. पोलिसांचा धाकच नसल्याने अवैध खाद्य पदार्थ विक्रेते मोठ्या संख्येत रेल्वे स्थानकात शिरले आहेत. चढ्या भावात विक्री होत आहे. 

टॅग्स :railwayरेल्वे