शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

बच्चू कडू यांचा मुख्यमंत्र्यांना 'लेटरबॉम्ब'; 'या' ८ मुद्द्यांवर बैठक घेण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2022 12:12 IST

केरळच्या धर्तीवर अराजपत्रित पदभरती करा, ७२०० पोलीस भरतीची जाहिरात काढा, बच्चू कडूंची मागणी

अमरावती : केरळ राज्याच्या धर्तीवर एमपीएससीच्या कक्षाबाहेरील वर्ग २ अराजपत्रित आणि वर्ग ३, ४ ची पदे एमपीएससीच्या माध्यमातून भरण्यात यावी. सन २०१८ मध्ये एमपीएससी मुख्यालय बांधकामाबाबत निर्णय झालेला आहे. तथापि, काही तांत्रिक अडचणीमुळे रखडलेली प्रक्रिया पूर्ण करून मुख्यालयाच्या बांधकामाची प्रक्रिया सुरू करावी. एमपीएससीचे रिक्त दोन सदस्य भरण्यात यावे, या आशयाचे पत्र गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माजी राज्यमंत्री तथा आमदार बच्चू कडू यांनी दिले.

आमदार कडू यांनी गत आठवड्यात अधिवेशनात शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्टकऱ्यांच्या हिताचे प्रश्न, समस्या मांडताना तडाखेबाज भाषण केले. आमदार बच्चू कडू हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे समर्थक आहेत. मात्र, त्यांनी सामान्य माणसाच्या प्रश्नांना प्राधान्य देत सरकारची विकेट घेण्याचा प्रयत्न केला, हे विशेष.

आमदार कडू यांचा सभागृहातील ‘प्रहार’ शमत नाही तोच गुरुवारी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना ८ विषयांवर मागण्यांसाठी पत्र दिले आहे. एवढेच नव्हे तर यासंदर्भात बैठकीबाबत अवगत केले आहे. त्यामुळे आमदार बच्चू कडू हे सरकारमध्ये असो वा विरोधात ‘अपना भिडू, बच्चू कडू’ या म्हणीनुसार सामान्य व्यक्तीची बाजू मांडण्यासाठी ते कोणतीही संधी सोडत नाहीत.

मुख्यमंत्र्यांच्या पत्रात हे आहेत आठ मुद्दे

  • केरळ राज्याच्या धर्तीवर एमपीएससीच्या कक्षाबाहेरील वर्ग २ अराजपत्रित आणि वर्ग ३, ४ ची पदे एमपीएससीच्या माध्यमातून भरण्यात यावी.
  • राज्य शासनाने ७२०० पोलीस भरतीची घोषणा केली, आता जाहिरात प्रसिद्ध करावी.
  • जिल्हा परिषद, एमआयडीसी, पशुसंवर्धन, सार्वजनिक आरोग्य सेवकांची २०१९ ची रखडलेली पदभरती करावी.
  • भूमी अभिलेख विभागाच्या गट क पदांच्या १०१३ जागांच्या परीक्षा तत्काळ घ्याव्यात.
  • सहायक आयुक्त (अन्न), अन्न सुरक्षा अधिकारी गट ब संदर्भात एमपीएससी परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करावी.
  • कोरोना काळात एक वेळची विशेष बाब म्हणून परीक्षांचा कालावधी वाढवून देण्याविषयी शासनादेश निर्गमित करावा.
  • दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा २०१६ नुसार सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये दिव्यांगांचा विचार करावा.
  • महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा २०१९ मधील पात्र ११४५ उमेदवारांची चारित्र पडताळणी, वैद्यकीय तपासणी अधीन नेमणुका देण्यात याव्यात.

 

आमदार, मंत्रिपद हे लोकसेवेसाठी आहे. ते काही मिरवण्याचे साधन नाही. त्यामुळे लोकांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी मी समाजसेवा त्यानंतर राजकारणात आलो आहे. पद असो किंवा नसो. माझा पिंड हा लोकांना न्याय देण्याची भूमिका आहे आणि ते शेवटपर्यंत मांडणारच. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन बैठक घेण्याचे कळविले आहे.

- बच्चू कडू, आमदार

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूGovernmentसरकारEknath Shindeएकनाथ शिंदे