शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बच्चू कडूंची पुन्हा नाराजी, मुख्यमंत्र्यांना स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 20:40 IST

नाराज आमदार बच्चू कडू यांच्याही नावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता, बच्चू कडू यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. 

अमरावती/मुंबई - राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार जानेवारीअखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात होण्याचा अंदाज बांधला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना, विधिमंडळ अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळ विस्तार होईल, असे सांगतिले आहे. त्यामुळे, मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. सांगली जिल्ह्यातील बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्यासह भाजप आमदार सुधीर गाडगीळ, आ. गोपीचंद पडळकर यांची नावे चर्चेत आली आहेत. तर, नाराज आमदार बच्चू कडू यांच्याही नावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता, बच्चू कडू यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. 

राज्यपालांची राजीनामा देण्याची इच्छा, शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती तसेच कसबा आणि पिंपरी चिंचवडची पोटनिडवणूक यांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता मंत्रिमंडळ विस्तारावरूनही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहेत. शिंदे गटातील आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू हेही मंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन स्पष्ट करायला हवं, असे आमदार कडू यांनी म्हटले आहे. 

अमरावतीमध्ये बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर आज पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल अजून काही खरं दिसत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदारांची बैठक घेतली पाहिजे. तसेच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत स्पष्टता झाली पाहिजे. कारण विस्तारावरून बऱ्याच आमदारांमध्ये संभ्रम सुद्धा निर्माण झाला आहे, अशी माहितीही आमदार बच्चू कडू यांनी दिली. 

काय म्हणाले मुख्यमंत्री

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याची माहिती दिली नाही. सध्याच्या मंत्रिमंडळात एकूण २० मंत्री आहेत. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्वाधिक खाती आहेत. ९ शिंदे गटाचे आणि ९ भाजपाचे मंत्री आहेत. शिंदे फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार मागील ४ महिन्यापासून रखडला आहे. 

टॅग्स :AmravatiअमरावतीBachhu Kaduबच्चू कडूministerमंत्रीEknath Shindeएकनाथ शिंदे