शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

...तर राज्यसभेसाठी शेवटच्या पाच मिनिटात मतदान करू, बच्चू कडूंचा ठाकरे सरकारला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2022 17:01 IST

शेतकऱ्यांना मिळणाऱ्या धान आणि हरभऱ्याच्या अनुदानाच्या मुद्द्यावरून बच्चू कडू यांनी ठाकरे सरकारला कोंडीत पकडले आहे.

अमरावती : राज्य शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनी राज्यसभेच्या निवडणुकीवरुन वक्तव्य करत खळबळ उडवून दिली आहे. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या धान आणि हरभऱ्याच्या अनुदानाच्या मुद्द्यावरून ते आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून धान खरेदी सुरू करावी. अन्यथा आम्ही राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाबाबतचा निर्णय शेवटच्या पाच मिनिटांमध्ये घेऊ, अशा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. 

येत्या १० जून रोजी राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. सहाव्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेने या जागेसाठी संजय पवार यांना उतरवले असून भाजपकडून धनंजय महाडिक हे रिंगणात आहेत. ही जागा निवडून आणण्यात अपक्ष आमदारांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. मात्र, अशातच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या धान आणि हरभऱ्याच्या अनुदानाच्या मुद्द्यावरून बच्चू कडू यांनी ठाकरे सरकारला कोंडीत पकडले आहे.

राज्यात हरभरा उत्पादकांची संख्या एक लाख व धान उत्पादकांची संख्या चार ते पाच लाख इतकी आहे. परंतु, आता केंद्र सरकार माल खरेदी करण्यासाठी तयार नसल्याचे सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारने धान खरेदी केली नाही तर एका हेक्टरला चार हजार रूपये मदत हरभरा आणि धान उत्पादकांना द्यायला हवा. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने हालचाली कराव्यात, असे बच्चू कडू म्हणाले. पण जर या मागणीकेड दुर्लक्ष केलं तर राज्यसभेचे मतदान हे शेवटच्या पाच मिनिटात करू असा इशाराही बच्चू कडू यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. 

आशिष जयस्वाल यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

शिवसेना समर्थक आमदार आशिष जयस्वाल यांनी राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्री अपक्ष आमदारांना निधी देताना टक्केवारी मागतात. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत दगाफटका होण्याची शक्यता नसली तरी भविष्यात राज्य सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात, असे आशिष जयस्वाल यांनी म्हटले. त्यानंतर आता बच्चू कडूंनी देखील सरकारला इशारा दिला आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणBacchu Kaduबच्चू कडूMahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेRajya Sabhaराज्यसभा