शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

बा विठ्ठला, सर्वांना पर्यावरण रक्षणाची सद्बुद्धी दे! अमरावतीचे सायकल वारकरी साकडे घालण्यासाठी पंढरीच्या वाटेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 01:25 IST

यावेळी त्यांनी वाटेवरील सर्वांना पर्यावरण रक्षण आणि आरोग्यासाठी सायकल चालवण्याचे महत्त्व पटवून देण्याचा निर्धार केला.

मनीष तसरे -अमरावती : वारकऱ्यांचा श्वास असलेल्या पंढरीच्या वारीची महती शब्दातीत आहे. वारी ही बघण्यापेक्षा अनुभवण्याची गोष्ट. पंढरीला पायी जाणाऱ्या वारकऱ्यांप्रमाणेच अमरावती सायकल असोसिएशनच्या सदस्यांनी अमरावती-पंढरपूर अशा ६०० किमीच्या सायकल वारीला श्री अंबादेवी व श्री एकवीरा देवीचे दर्शन करून बुधवारी सकाळी सुरुवात केली. यावेळी त्यांनी वाटेवरील सर्वांना पर्यावरण रक्षण आणि आरोग्यासाठी सायकल चालवण्याचे महत्त्व पटवून देण्याचा निर्धार केला.

अमरावती सायकल असोसिएशनचे राजीव देशमुख, राजेश धोटे, नरेंद्र भटकर, रामराव उईके, विनोद निशितकर, विजय महल्ले, आनंद वानखडे, सदानंद देशमुख, डॉ. देवेंद्र चौधरी, केशव निकम, ऋषिकेश इंगोले व आशिष बोरकर हे सदस्य बुधवारी सकाळी सहा वाजता निघाले. दररोज १०० किमी व शेवटच्या दिवशी २०० किलोमीटरचा प्रवास करत ते ६ जुलैला पंढरपूर पोहोचणार आहेत. त्यासाठी दररोज आपण ४० ते ५० किलोमीटर सायकल चालविण्याचा सराव केल्याचे त्या सायकलस्वारांनी ‘लोकमत’ला सांगितले.

सायकल रिंगणात सहभागआषाढी वारीनिमित्त महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून वारकरी पायी वारी करतात. सोबतच महाराष्ट्रातील अनेक सायकलस्वार देखील पंढरपुरात दाखल होतात. ७ जुलै राेजी महाराष्ट्रातील सायकलस्वाराचे रिंगण ज्या ठिकाणी होते, त्यात आम्ही देखील सहभागी होणार असल्याचे अमरावती सायकल असोसिएशनचे सदस्य आनंद वानखडे यांनी सांगितले. अमरावती-वाशिम-तूळजापूर, पंढरपूर असा ६०० किलोमीटरचा प्रवास आम्ही चार दिवसांत पूर्ण करणार आहोत, असे राजीव देशमुख यांनी सांगितले.

 

टॅग्स :AmravatiअमरावतीPandharpurपंढरपूर