शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

निकड १४ हजार सीट्सची उपलब्धता केवळ १६१२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 21:52 IST

केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे दर पन्नास व्यक्तीमागे एक याप्रमाणे सार्वजनिक स्वच्छतागृह असणे आवश्यक असताना, आठ लाख लोकसंख्येच्या शहरात अवघ्या १५४ ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. त्यात एकूण १६१२ सीट्स आहेत.

ठळक मुद्देमहिला वर्गाची कुचंबणा : शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची वानवा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे दर पन्नास व्यक्तीमागे एक याप्रमाणे सार्वजनिक स्वच्छतागृह असणे आवश्यक असताना, आठ लाख लोकसंख्येच्या शहरात अवघ्या १५४ ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. त्यात एकूण १६१२ सीट्स आहेत. वर्तमान स्थितीतील स्वच्छतागृहांची संख्या पाहता, शहरात अदमासे १४३८८ सीट्सची आवश्यकता आहे. या दृष्टीने शहरात सार्वजिनक स्वच्छतागृहांची वानवा प्रकर्षाने समोर आली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात सार्वजनिक स्वच्छतागृहे नसल्याने महिलांची होणारी कुचंबणा अधोरेखित झाली आहे.सर्व शहरे हगणदरीमुक्त आणि स्वच्छ राहण्याच्या उद्देशाने देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. वैयक्तिक स्वच्छतागृहांसह सार्वजनिक व सामुदायिक स्वच्छतागृहे उभारणीवर भर दिला जात आहे. त्यासाठी अमरावती महापालिकेला गतवर्षी तब्बल १९.३० कोटी रुपये मिळाले. नव्याने सामुदायिक व वैयक्तिक स्वच्छतागृहे बांधण्यात आली. मात्र, सार्वजनिक स्वच्छतागृह उभारणीकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. आजमितीस जयस्तंभ वा गांधी चौक सोडल्यास शहराच्या मध्यवर्ती भागात एकही सार्वजनिक वा पे अँड यूज तत्त्वावर चालविले जाणारे स्वच्छतागृह नाही. बाजारहाट, नोकरी वा अन्य कामासाठी घराबाहेर पडलेल्या महिला वर्गाची कुचंबणा होते. बहुतांश व्यावसायिक संकुलांतही मुत्रीगृह व स्वच्छतागृह नाही. राजकमल, नमूना, चित्रा, बापट, श्याम व लगतच्या अन्य चौकांमध्ये खरेदीसाठी तोबा गर्दी असते. तखतमल इस्टेट व लगतच्या मार्केट महिला खरेदीदारांनी ओसंडून वाहतात. मात्र, त्या परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने अनेक महिला महापालिकेतील सार्वजनिक स्वच्छतागृहांचा आधार घेतात. व्यावसायिक संकुलातील दुकांनामध्ये सेल्सवूमन म्हणून काम करणाऱ्या महिला व तरुणीसुद्धा मोठ्या प्रमाणात महापालिकेत येतात.पे अँड यूजची अवस्था बिकटमहापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरात ठिकाणी ‘पे अँड यूज’ तत्त्वावर चालविले जाणारे १९ स्वच्छतागृहे आहेत. त्यातील जयस्तंभ चौक, गांधी चौक व राजापेठ बसस्थानकामागे असलेले स्वच्छतागृहे वगळता अन्य सार्वजनिक स्वच्छतागृहे नागरी वस्त्यांमध्ये आहेत. पे अँड यूज स्वच्छतागृहातील अस्वच्छता लक्षात घेता, नाक दाबून तेथे जाण्यास कुणीही महिला धजावत नाही. जयस्तंभ आणि गांधी चौकातील स्वच्छतागृहांमध्ये नेहमीच पाण्याचा प्रश्न बिकट असतो. उन्हाळ्यात या ठिकाणच्या बोअर कोरड्या पडल्याने तेथे स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला होता.असे आहेत निकषशहर विस्तारात सार्वजनिक स्वच्छतेसारख्या अत्यावश्यक सेवांवर सातत्याने ताण येत आहे. स्वच्छतागृहांसाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार पन्नास व्यक्तींमागे एक सार्वजनिक स्वच्छतागृह असावे आणि दर अडीच ते तीन किलोमीटर अंतरात रस्त्याच्या दुतर्फा स्वच्छतागृह असावे, हा प्रमुख निकष आहे. मात्र, त्यानुसार स्वच्छतागृहे नसल्याची वस्तुस्थिती आहे.राजकमल वा नमुना भागात कापड खरेदी करण्यास गेले असता, त्या भागात एकही स्वच्छतागृह नाही. महापालिकेने खासकरून महिलांच्या सुविधेसाठी स्वच्छतागृह उभारण्याची नितांत गरज आहे.- साक्षी गवळी, गृहिणी