शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात ‘उदई’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 19:06 IST

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हिवसा बु. येथील रहिवासी प्रकाश चव्हाण यांचे ‘उदई’ आत्मकथन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एम.ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे.

अमरावती - नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हिवसा बु. येथील रहिवासी प्रकाश चव्हाण यांचे ‘उदई’ आत्मकथन संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाच्या एम.ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. या आत्मकथनाला विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 

प्रकाश चव्हाण यांचा जन्म झाला, त्या आदिवासी पारधी समाजात अशिक्षण, दारू, चोऱ्यामाऱ्या आणि रूढीपरंपरेची वाळवी लागली आहे. पारधी समाज आजही बहुतांश त्याच मानसिकतेत जगतो आहे. अशा या शापित समाजातील एक बाप आपल्या मुलाच्या शिक्षणाचा ध्यास धरतो. मुलाच्या शिक्षणासाठी सारे कष्ट झेलतो. मुलाला मात्र शिक्षणाचा तिटकारा आहे. रडतखडत मुलगा दहावीपर्यंत पोचतो.

दहावी नापास झाल्यावर बाप मुलाचे नाव टाकतो. येता-जाता साऱ्यांसमोर मुलाला बोल लावतो. बापाचे हेच वागणे मुलात जिद्द निर्माण करते. मुलगा पदवीधर होतो. शिक्षणाचं महत्त्व समजतो आणि समाजातील लोकांनाही शिक्षणासाठी प्रवृत्त करू लागतो. अशिक्षित आणि दुर्लक्षित समाजातल्या मुला-बापातला हा संघर्ष आणि पारधी जीवनाचं भेदक वास्तव या पुस्तकात आहे. या पुस्तकाचा विद्यापीठ अभ्यासक्रमात समावेश झाल्याबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

 

टॅग्स :AmravatiअमरावतीEducationशिक्षणuniversityविद्यापीठ