शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांनीच केले चार कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे नियोजन

By admin | Updated: December 11, 2015 00:28 IST

जिल्हा नियोजन समितीने आदिवासी उपयोजनेअंतर्गत जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाला योजनेसाठी मंजूर ....

सदस्य आक्रमक : चुकीचे धोरणाविरुद्ध न्यायालयात मागणार दादअमरावती : जिल्हा नियोजन समितीने आदिवासी उपयोजनेअंतर्गत जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाला योजनेसाठी मंजूर केलेल्या सुमारे ४ कोटी रूपयांचे नियोजन सभागृहाची मान्यता न घेताच अधिकाऱ्यांनी परस्पर केले आहे. त्यामुळे जि.प.सदस्य महेंद्रसिंग गैलवार यांनी आक्षेप घेत न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे.जिल्हा नियोजन समितीने जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाला सुमारे ४ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या उपलब्ध निधीतून पाणीपुरवठा विभागाला करावयाचे नियोजन हे जि.प.च्या सर्वसाधारण सभेत करणे अनिवार्य आहे. मात्र पाणीपुरवठा विभागाने याला बगल देत स्वत:च्या अधिकारातच पाणीपुरवठा योजनेचे नियोजन केले आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी खरोखरच पाणी पुरवठ्याची व पाणीटंचाईची समस्या आहे, अशा गावांना डावलून नियोजन केले असल्याची तक्रार सदस्य महेंद्रसिंग गैलवार यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे या नियोजनात मेळघाटातील अनेक गावांत पाणी पुरवठ्याच्या उपयायोजना करणे आवश्यक असतानाही अशा गावांचा पाणी पुरवठयाच्या नियोजनातून डावलण्यात आल्याने हा विषय आता ऐरणीवर आला आहे. नव्याने नियोजन करण्याची मागणीअमरावती : नियमानुसार जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या ४ कोटींचे पाणी पुरवठा योजनेचे नियोजन सर्वसाधारण सभेतच होणे अपेक्षित आहे. मात्र पाणी पुरवठा विभागाने सभागृहाचा अधिकार बाजूला ठेवत ४ कोटी रूपयांचे नियोजन केले आहे. यामुळे चिखलदरा तालुक्यातील कामापूर या गावात अद्यापही पाण्याची टाकी नसल्याने येथील आदिवासी बांधवांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या नियोजनात अशा गरजवंत गावांना पाणीपुरवठा योजनेच्या कामात प्राधान्य देणे आवश्यक आहे. परंतु यामध्ये गरजवंत गावांना डावलण्यात आल्याने पाणीपुरवठा योजनेचे नियोजन नव्याने करावे, अन्यथा याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा इशारा सदस्य महेंद्रसिंग गैलवार यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)