शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

आश्रमशाळा असुरक्षित

By admin | Updated: July 19, 2016 23:56 IST

आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय विभागामार्फत सुरु असलेल्या जिल्ह्यातील निवासी आश्रमशाळांची परिस्थिती विदारकच आहे.

राजकीय हस्तक्षेप : स्वच्छतेचे तीनतेरा, अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण दुर्लक्षअमरावती : आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय विभागामार्फत सुरु असलेल्या जिल्ह्यातील निवासी आश्रमशाळांची परिस्थिती विदारकच आहे. या सर्व आश्रमशाळांवर राजकीय पुढाऱ्यांची मक्तेदारी आहे. भोजन कंत्राटापासून तर विद्यार्थ्यांना गणवेश पुरवठा करेपर्यत राजकीय हस्तक्षेपामुळे निकृष्ट दर्जा हा आदिवासी विद्यार्थ्यांच्या पाचवीला पुजला आहे. संरक्षण भिंतींचा अभाव, कालबाह्य इमारती, वर्षानुवर्षांपासून इमारतींची रखडलेली डागडुजी, स्वच्छतेचे तिनतेरा, जंगलाशेजारी असलेल्या इमारती, कधी मुख्याध्यापक गायब तर कधी शिक्षकांचा पत्ता नाही, अशा स्थितीत आश्रमशाळा चालविल्या जातात. जिल्ह्यात एकुण ३३ आश्रमशाळा आहेत. शासनाकडून आश्रमशाळांसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असले तरी आदिवासी व अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना फारशा सुविधा मिळत नाहीत. अनुदानित आश्रमशाळा या अपहाराचे कुरण बनल्या आहेत. जिल्ह्यात एक, दोन आश्रमशाळा वगळता अन्य आश्रमशाळांना संरक्षण भिंत नसल्याचे वास्तव आहे. आश्रमशाळांवर राजकीय पुढाऱ्यांचा वरदहस्त असल्याने त्यांना सतत अभय मिळत असल्याची माहिती आहे. बऱ्याच आश्रमशाळांना संरक्षण भिंत नसल्याने विद्यार्थी असुरक्षिततेच्या सावटात शिक्षण घेत आहेत. आश्रमशाळांमध्ये मूलभूत आणि पायाभूत सुविधांची वानवा ही नित्याचीच बाब आहे. (प्रतिनिधी)समाजकल्याणच्या १३ आश्रमशाळासमाजकल्याण विभागाच्या जिल्ह्यात १३ आश्रमशाळा आहेत. यापैकी बहुतांश आश्रमशाळा या राजकीय पुढाऱ्यांच्या आहेत. अनुदान लाटण्यासाठी जणू आश्रमशाळा सुरु असल्याचे चित्र आहे. अचलपूर, मोर्शी, तिवसा, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, चांदूरबाजार तर अमरावतीनजिकच्या बहिलोलपूर येथे आश्रमशाळा सुरु आहे. या सर्व आश्रमशाळा खासगी संस्थेमार्फत चालविल्या जातात. संरक्षण भिंती नसल्याची अनेक आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची ओरड आहे.आदिवासी विकास विभागाच्या २० आश्रमशाळाआदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना नरकयातना सहन करुन शिक्षण घ्यावे लागत असल्याचे विदारक चित्र जिल्ह्याभरात आहे. यापूर्वी २७ आश्रमशाळा सुरु होत्या. मात्र सात आश्रमशाळा बंद करण्यात आल्यात. तूर्तास आदिवासी मुला- मुलीसांठी २० आश्रमशाळा चालविल्या जातात. दुर्गम भाग तसेच जंगलाशेजारी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा चालविल्या जातात. धारणी, चिखलदरा तालुक्यात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सर्वाधिक आश्रमशाळा आहेत. अमरावती शहरात कठोरा परिसरात आश्रमशाळा सुरु आहे. चांदुररेल्वे, बिरोटी येथे सुद्धा आश्रमशाळा चालविल्या जातात.