शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळा असुरक्षित

By admin | Updated: July 19, 2016 23:56 IST

आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय विभागामार्फत सुरु असलेल्या जिल्ह्यातील निवासी आश्रमशाळांची परिस्थिती विदारकच आहे.

राजकीय हस्तक्षेप : स्वच्छतेचे तीनतेरा, अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण दुर्लक्षअमरावती : आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय विभागामार्फत सुरु असलेल्या जिल्ह्यातील निवासी आश्रमशाळांची परिस्थिती विदारकच आहे. या सर्व आश्रमशाळांवर राजकीय पुढाऱ्यांची मक्तेदारी आहे. भोजन कंत्राटापासून तर विद्यार्थ्यांना गणवेश पुरवठा करेपर्यत राजकीय हस्तक्षेपामुळे निकृष्ट दर्जा हा आदिवासी विद्यार्थ्यांच्या पाचवीला पुजला आहे. संरक्षण भिंतींचा अभाव, कालबाह्य इमारती, वर्षानुवर्षांपासून इमारतींची रखडलेली डागडुजी, स्वच्छतेचे तिनतेरा, जंगलाशेजारी असलेल्या इमारती, कधी मुख्याध्यापक गायब तर कधी शिक्षकांचा पत्ता नाही, अशा स्थितीत आश्रमशाळा चालविल्या जातात. जिल्ह्यात एकुण ३३ आश्रमशाळा आहेत. शासनाकडून आश्रमशाळांसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असले तरी आदिवासी व अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना फारशा सुविधा मिळत नाहीत. अनुदानित आश्रमशाळा या अपहाराचे कुरण बनल्या आहेत. जिल्ह्यात एक, दोन आश्रमशाळा वगळता अन्य आश्रमशाळांना संरक्षण भिंत नसल्याचे वास्तव आहे. आश्रमशाळांवर राजकीय पुढाऱ्यांचा वरदहस्त असल्याने त्यांना सतत अभय मिळत असल्याची माहिती आहे. बऱ्याच आश्रमशाळांना संरक्षण भिंत नसल्याने विद्यार्थी असुरक्षिततेच्या सावटात शिक्षण घेत आहेत. आश्रमशाळांमध्ये मूलभूत आणि पायाभूत सुविधांची वानवा ही नित्याचीच बाब आहे. (प्रतिनिधी)समाजकल्याणच्या १३ आश्रमशाळासमाजकल्याण विभागाच्या जिल्ह्यात १३ आश्रमशाळा आहेत. यापैकी बहुतांश आश्रमशाळा या राजकीय पुढाऱ्यांच्या आहेत. अनुदान लाटण्यासाठी जणू आश्रमशाळा सुरु असल्याचे चित्र आहे. अचलपूर, मोर्शी, तिवसा, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, चांदूरबाजार तर अमरावतीनजिकच्या बहिलोलपूर येथे आश्रमशाळा सुरु आहे. या सर्व आश्रमशाळा खासगी संस्थेमार्फत चालविल्या जातात. संरक्षण भिंती नसल्याची अनेक आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची ओरड आहे.आदिवासी विकास विभागाच्या २० आश्रमशाळाआदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना नरकयातना सहन करुन शिक्षण घ्यावे लागत असल्याचे विदारक चित्र जिल्ह्याभरात आहे. यापूर्वी २७ आश्रमशाळा सुरु होत्या. मात्र सात आश्रमशाळा बंद करण्यात आल्यात. तूर्तास आदिवासी मुला- मुलीसांठी २० आश्रमशाळा चालविल्या जातात. दुर्गम भाग तसेच जंगलाशेजारी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा चालविल्या जातात. धारणी, चिखलदरा तालुक्यात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सर्वाधिक आश्रमशाळा आहेत. अमरावती शहरात कठोरा परिसरात आश्रमशाळा सुरु आहे. चांदुररेल्वे, बिरोटी येथे सुद्धा आश्रमशाळा चालविल्या जातात.