शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

४०४१ शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षणाचा ‘आगाज’, बक्षिसांचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2018 18:53 IST

देशभरातील ४०४१ शहरांमध्ये ४ जानेवारीपासून स्वच्छ सर्वेक्षणाला प्रारंभ करण्यात आला आहे. चार हजार गुणांच्या या परीक्षेत अव्वल येण्यासाठी शहरांमध्ये चुरस असून, सिटिझन फीडबॅकवर गुणांकन असल्याने सर्वसामान्य नागरिकच स्वत:चे शहर ‘स्वच्छ’ ठरविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.

 प्रदीप भाकरे

अमरावती - देशभरातील ४०४१ शहरांमध्ये ४ जानेवारीपासून स्वच्छ सर्वेक्षणाला प्रारंभ करण्यात आला आहे. चार हजार गुणांच्या या परीक्षेत अव्वल येण्यासाठी शहरांमध्ये चुरस असून, सिटिझन फीडबॅकवर गुणांकन असल्याने सर्वसामान्य नागरिकच स्वत:चे शहर ‘स्वच्छ’ ठरविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ सर्वेक्षणाचे हे चौथे वर्ष असून सहभागी शहरांची संख्या तब्बल ४०४१ वर पोहोचली आहे. केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या क्वालिटी काऊंन्सिल ऑफ इंडियाची त्यासाठी नेमणूक करण्यात आली असून, या ‘क्यूसीआय’ने नेमलेल्या असेसर्सच्या पाहणीनंतर अंतिम गुणांकन होणार आहे.‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ ही परीक्षा चार हजार गुणांची असून, त्यात सेवास्तर प्रगती व नागरिकांच्या अभिप्रायासाठी प्रत्येकी १४००, तर थेट निरीक्षण या विभागासाठी १२०० गुण आहेत. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये महाराष्ट्रातील सर्व शहरांची कामगिरी उच्चतम होण्यासाठी राज्य सरकारने बक्षीसही घोषित केले आहे.

समाजातील सर्व घटकांतील लोकांचा सांघिक सहभाग वाढविण्यासाठी करण्यात येत असलेल्या स्वच्छ सर्वेक्षणातील ४०४१ शहरे ‘अमृत’ व ‘नॉन अमृत’ अशा दोन गटांत विभागण्यात आले आहेत. अमृत शहरांचा गुणानुक्रम हा देशपातळीवरील ५०० शहरांमधून करण्यात येईल. यात राज्यातील ४३ शहरांचा समावेश आहे. नॉन अमृत शहरांची विभागणी पाच विभागांमध्ये करण्यात आली आहे. यात महाराष्ट्राचा समावेश पश्चिम विभागात आहे. ४ जानेवारीपासून सुरू झालेले स्वच्छ सर्वेक्षण १० मार्चपर्यंत चालणार आहे. त्यासाठी पथके नेमण्यात आली आहेत