शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

४०४१ शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षणाचा ‘आगाज’, बक्षिसांचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2018 18:53 IST

देशभरातील ४०४१ शहरांमध्ये ४ जानेवारीपासून स्वच्छ सर्वेक्षणाला प्रारंभ करण्यात आला आहे. चार हजार गुणांच्या या परीक्षेत अव्वल येण्यासाठी शहरांमध्ये चुरस असून, सिटिझन फीडबॅकवर गुणांकन असल्याने सर्वसामान्य नागरिकच स्वत:चे शहर ‘स्वच्छ’ ठरविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.

 प्रदीप भाकरे

अमरावती - देशभरातील ४०४१ शहरांमध्ये ४ जानेवारीपासून स्वच्छ सर्वेक्षणाला प्रारंभ करण्यात आला आहे. चार हजार गुणांच्या या परीक्षेत अव्वल येण्यासाठी शहरांमध्ये चुरस असून, सिटिझन फीडबॅकवर गुणांकन असल्याने सर्वसामान्य नागरिकच स्वत:चे शहर ‘स्वच्छ’ ठरविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ सर्वेक्षणाचे हे चौथे वर्ष असून सहभागी शहरांची संख्या तब्बल ४०४१ वर पोहोचली आहे. केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या क्वालिटी काऊंन्सिल ऑफ इंडियाची त्यासाठी नेमणूक करण्यात आली असून, या ‘क्यूसीआय’ने नेमलेल्या असेसर्सच्या पाहणीनंतर अंतिम गुणांकन होणार आहे.‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ ही परीक्षा चार हजार गुणांची असून, त्यात सेवास्तर प्रगती व नागरिकांच्या अभिप्रायासाठी प्रत्येकी १४००, तर थेट निरीक्षण या विभागासाठी १२०० गुण आहेत. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये महाराष्ट्रातील सर्व शहरांची कामगिरी उच्चतम होण्यासाठी राज्य सरकारने बक्षीसही घोषित केले आहे.

समाजातील सर्व घटकांतील लोकांचा सांघिक सहभाग वाढविण्यासाठी करण्यात येत असलेल्या स्वच्छ सर्वेक्षणातील ४०४१ शहरे ‘अमृत’ व ‘नॉन अमृत’ अशा दोन गटांत विभागण्यात आले आहेत. अमृत शहरांचा गुणानुक्रम हा देशपातळीवरील ५०० शहरांमधून करण्यात येईल. यात राज्यातील ४३ शहरांचा समावेश आहे. नॉन अमृत शहरांची विभागणी पाच विभागांमध्ये करण्यात आली आहे. यात महाराष्ट्राचा समावेश पश्चिम विभागात आहे. ४ जानेवारीपासून सुरू झालेले स्वच्छ सर्वेक्षण १० मार्चपर्यंत चालणार आहे. त्यासाठी पथके नेमण्यात आली आहेत