शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

अन् आसमंतात विरल्या त्यांच्या किंकाळ्या !

By admin | Updated: May 21, 2016 00:09 IST

हसते खेळते कुटुंब....झोपडी असली तरी घरात गोकुळ नांदत असलेले. पती-पत्नी, दोन चिमुरडे आणि म्हातारी आजी. असे त्यांचे पंचकोनी कुटुंब.

मदत मिळालीच नाही : मार्कंड्यातील वाघमारे कुटुंबाची राखरांगोळीसंदीप मानकर अमरावतीहसते खेळते कुटुंब....झोपडी असली तरी घरात गोकुळ नांदत असलेले. पती-पत्नी, दोन चिमुरडे आणि म्हातारी आजी. असे त्यांचे पंचकोनी कुटुंब. रोजच्या सारखाच दिवस उगवला. पण, काळाच्या मनात काही औरच होते. नेहमीप्रमाणे स्वयंपाक करून चिल्या-पिल्यांसह जेवण करावे आणि दुपारी वामकुक्षी घ्यावी, असा तिचा विचार असावा. पण, क्षणात होत्याचे नव्हते झाले आणि अख्खे कुटुंब काळाचा घास ठरले. तालुक्यातील मार्कंडा येथे घडलेल्या अग्निकांडाच्या खाणाखुणा अंगावर शहारे आणत होत्या. काडी-काडी करून जमवलेल्या संसाराच्या चिंधड्या उडाल्या होत्या. वस्तू सोडाच पण, काही वेळापूर्वी किलबिल करणारी चिमुकली अग्निच्या भक्ष्यस्थानी पडली होती. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करताना धडपडणारी ‘ती’ आई देखील कोळसा झाली होती. गावकरी हतप्रभ होऊन डोळ्यांसमोर घडलेला अग्निचा विनाश पाहात होते. कर्ताही मृत्यूला शरण गेला!अमरावती : अग्नीच्या विळख्यात कसाबसा तग धरून राहिलेला कुटुंंबातील कर्तादेखील काही तासांनी मृत्यूला शरण गेला. तालुक्यातील हजार लोकवस्तीचे मार्कंडा गाव. गावातील दलित वस्ती. सध्या सूर्य कोपलाय. त्यामुळे लोक दुपारी घराबाहेर पडण्याचे टाळतात. शुक्रवारीदेखील असाच दिवस उगवला.वाघमारे कुटुंबातील चंदाबाई गुरूवारी रात्रीच माहेरहून परतल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांच्या सासूबाई कमलाबाईदेखील गेल्या होत्या. पण, त्या काही कारणास्तव तिथेच राहिल्या. दुसऱ्या दिवशी चंदाबाई नेहमीप्रमाणे पहाटेची कामे आटोपून दुपारच्या जेवणाची तयारी करीत होत्या. झोपडीवजा लहानसे घर. ओसरीत चूल मांडलेली. मुले समृध्दी आणि सार्थक पिता नीलेशसह आतल्या खोलीत निजलेले. सगळे काही सुरळीत. चंदाबार्इंनी चूल पेटविली आणि कशी कोण जाणे, एक ठिणगी उडाली. घरातील वस्तुंनी बेमालूमपणे पेट घेतला. चंदाबाई कामात व्यग्र. काही काळ त्यांना कळलेच नाही. थोड्या वेळात घर धगधगू लागले. शेजारचे लोकही उन्हामुळे आपापल्या घरात दडलेले. घर पेटल्याचे लक्षात येताच चंदाबाई सर्वप्रथम चिमुरड्यांना वाचविण्यासाठी आत धावल्या. मात्र, तोवर आग चांगलीच भडकली होती. क्षणात छतावरचे टीन खाली कोसळले आणि त्यांचा बाहेर पडण्याचा मार्ग अवरूद्ध झाला. तोवर मुलांना आणि पतीलाही जाग आलेली. आगीच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठीचा त्यांचा आकांत सुरू. पण, उन्हापासून बचावासाठी घरात दडलेल्या गावकऱ्यांना काही कळलेच नाही. दरम्यान शेजारच्या एका लहान मुलाला हा प्रकार लक्षात आला. त्याने आरडाओरडा केला. गावकरी गोळा झाले. पण, तोवर आगीने रौद्र रूप धारण केले होते. पेटत्या घरात शिरून कोणालाही बाहेर काढणे शक्य नव्हते. त्यामुळे गावकरी हतबल होऊन पाहात राहिले. चार जिवांचा आकांत सुरूच होता. हळूहळू तो शांत झाला. आगीची झळ आसपासच्या घरांना लागून अधिक हानी होऊ नये म्हणून गावकऱ्यांनी गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचा पाईप आणून आणि मिळेल त्या साधनाने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. पण, तोवर तीन जिवांचा कोळसा झाला होता. तर आगीत भयंकररीत्या होरपळलेला कर्ता अंतिम घटका मोजत होता. गावकऱ्यांनी नीलेश याला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. तहसीलदार राहुल तायडे शनिवारी पाहणी करणार आहेत. (प्रतिनिधी)