शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

अमरावतीत ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण; आठ पोलिसांसह १५ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 18:41 IST

वाहनांची तोडफोड, लाठीचार्ज, अश्रुधुराचा वापर, विभागीय आयुक्तालयाचे गेट तोडले

अमरावती : पांढरी खानमपूर येथील प्रवेशद्वाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीवरून ७ मार्चपासून अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर सुरू असलेल्या  ठिय्या आंदोलनाला सोमवारी सायंकाळी ५ वाजता हिंसक वळण लागले. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिलेले पत्र अमान्य करीत जमावाने पोलिसांवर दगडफेक केली, त्यामुळे जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या,पाण्याचा मारा केला. तरीही आंदोलनकर्ते थांबले नाहीत अन्‌ पोलिस वाहनांची तोडफोड केली. दरम्यान, आठ पोलिसांसह १५ जण जखमी झाल्याची माहिती आहे.

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर गावच्या प्रवेशद्वाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी पांढरी खानमपूर येथील सर्व बौद्ध बांधवांनी गावातून लाँग मार्च काढून गुरुवारी विभागीय आयुक्त कार्यालय गाठले. विभागीय आयुक्तांनी तीन दिवसांचा अवधी मागितला होता. त्यामुळे सर्व आंदोलनकर्त्यांनी तेथेच ठिय्या आंदोलन सुरू केले. गावातील एका गटाने प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, ही मागणी लावून धरली आहे. त्यावर शनिवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही महापुरुषांची नावे प्रवेशद्वाराला द्यावी, प्रवेशद्वार उभारणीसाठी शासन निधी उपलब्ध करून देईल, असा तोडगा सूचविला होता. मात्र प्रशासनाने लेखी पत्र द्यावे, यावर आंदोलक ठाम होते. दरम्यान सोमवारी विभागीय आयुक्तांकडे कमलताई गवई यांच्यासह पांढरीतील दहा महिला-पुरुषांचे शिष्टमंडळासोबत प्रदीर्घ बैठक झाली व आंदोलनकर्त्यांना पत्र देण्यात आले. मात्र प्रशासनाचे पत्र काहींना अमान्य असल्याने आंदोलकांमध्ये धुसफूस वाढली व तणाव निर्माण झाल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागले. 

पत्र अमान्य असल्याने वाढला तणावमंगळवारी जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त व जि.प.च्या सीईओ हे पांढरीला भेट देतील व दोन्ही गटाची गावात बैठक घेऊन तोडगा काढतील, अशा आशयाचे पत्र शिष्ठमंडळाला दिले. मात्र, हे पत्र अमान्य असल्याने काही आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. विभागीय आयुक्त कार्यालयाचे गेटही तोडले व आतील वाहनांची तोडफोड केली. 

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोलीस बंदोबस्त तैनात होता. आत शिष्टमंडळासोबत चर्चा सुरू आहे, असे आंदोलनकर्त्यांना वारंवार पोलीस अधिकारी सांगत होते. दरम्यान काही जणांनी गेटच्या आत प्रवेश केला. पोलिसांवर दगडफेक केली. वाहनांची तोडफोड केली. जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर करावा लागला. पसरत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये. शहरात ठिकठिकाणी चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. - नवीनचंद्र रेड्डीपोलीस आयुक्त, अमरावती

टॅग्स :Amravatiअमरावती