शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

Amravati: वन विभागात प्रादेशिकमध्ये ७० रेंज अधिकाऱ्यांविनाच; वने, वन्यजीव वाऱ्यावर

By गणेश वासनिक | Updated: October 4, 2024 21:04 IST

Amravati News: राज्य निवडणूक आयोगाच्या दणक्यानंतर वन विभागाने १७९ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्या काही दिवसांपूर्वी केल्या आहेत. मात्र, अद्यापही प्रादेशिक उपविभागात ७० रेंज रिक्त असून, वन परिक्षेत्राधिकारी कार्यरत नाही

- गणेश वासनिक अमरावती - राज्य निवडणूक आयोगाच्या दणक्यानंतर वन विभागाने १७९ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्या काही दिवसांपूर्वी केल्या आहेत. मात्र, अद्यापही प्रादेशिक उपविभागात ७० रेंज रिक्त असून, वन परिक्षेत्राधिकारी कार्यरत नाही, तर दुसरीकडे वन विभाग हा संवेदनशील म्हणून गणला जात असताना मंत्रालयात आरएएफओंच्या विनंती बदल्या का करत नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.

निवडणूक आयोगाने विधानसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सर्वच विभागांत पात्र अधिकारी-कर्मचाऱ्याच्या बदल्या करण्याचे निर्देश दिले आहे. परंतु, गत दीड महिन्यापासून विनंती बदलीसाठी आवश्यक कागदपत्रानिशी आरएफओंनी मंत्रालयात प्रस्ताव दिले असताना त्यावर सचिव अथवा अन्य अधिकारी लक्ष देत नसल्याची ओरड आहे. राज्यात ७० रेंजसाठी सुमारे ४०० पेक्षा जास्त आरएफओंचे अर्ज मंत्रालयात प्रलंबित आहेत, तर प्रादेशिक टू प्रादेशिक बदलीसाठी ३५ अर्ज सादर असल्याची माहिती आहे. मंत्रालयात आरएफओंच्या बदलींची फाइल सांभाळणारे ‘जाकरेकर’ यांचा तोरा अधिकच आहे. प्रशासकीय बदल्यांमध्ये अन्याय झाला किमान विनंती बदल्यांमध्ये न्याय मिळेल, या आशेने अनेक आरएफओ मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवून थकले आहे. विनंती बदलीसाठी कौटुंबिक अथवा आराेग्य विषयक ठोस कारण दिले असताना सुद्धा मंत्रालयातील बाबुगिरीच्या अफलातून कारभारामुळे पात्र आरएफओंच्या बदल्या होत नसल्याचे वास्तव आहे. ‘अर्थ’पूर्ण व्यवहार झाले, पण बदली होईनावन विभागात प्रादेशिकच्या मलईदार रेंज मिळावी, यासाठी काही आरएफओंनी लोकप्रतिनिधी, राजकीय पुढाऱ्यांच्या माध्यमातून‘अर्थ’पूर्ण केले. मात्र, विनंती बदलीचा पत्ता नाही, अशीच स्थिती आहे. येत्या आठवड्यात राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे झालेल्या ‘अर्थ’पूर्ण व्यवहाराचे काय होईल, या विवंचनेत आरएफओ आले आहेत.

प्रादेशिक उपविभागाच्या रेंज रिक्त कशासाठी?वन विभागामध्ये नियमांना धाब्यावर बसून यापूर्वी बदल्या करण्यात आल्या आहेत. वशीलेबाजीने प्रादेशिक टू प्रादेशिक अशा बदल्यादेखील करण्यात आल्या आहेत. यात अर्थकारणाला मोठा वाव मिळाल्याची शंका उपस्थित होत आहे. तर अनेकांनी मंत्रालयात बदलीसाठी रक्कम मोजल्यानंतरही ठरविलेल्या निश्चित ठिकाणी बदली झाली नाही. आता व्यवहाराची रक्कम परत मिळावी, यासाठी काहीजण मंत्रालयात येरझारा मारत आहे. तर ‘त्या’ अधिकाऱ्यांनी आरएफओंचे मोबाईल ‘ब्लॉक’केले आहे. प्रशासकीय बदल्यांसाठी अगोदर १२ ते १५ लाखांचे व्यवहार झाल्याची माहिती आहे.

टॅग्स :Amravatiअमरावतीwildlifeवन्यजीवforest departmentवनविभाग