शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

परीक्षांचा तारखांत बदल करा; अमरावती विद्यापीठात विधी विद्यार्थ्यांचा एल्गार

By गणेश वासनिक | Updated: May 12, 2023 14:43 IST

विधी विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप, दोन महिन्यांतच द्वितीय सत्राचा परीक्षा

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने दोन महिन्यात सलग दुसऱ्यांदा परीक्षांचे नियोजन केले असून, अभ्यास केव्हा, कसा करावा आणि परीक्षा कशाप्रकारे द्यावी, असा प्रश्न उपस्थित करीत शुक्रवारी विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठात धडक दिली. परीक्षांच्या तारखात बदल करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी करीत परीक्षा संचालक, कुलसचिवांकडे साकडे घालण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार, विधी शाखेतील पहिल्या सत्राच्या परीक्षा २७ मार्च २०२३ रोजी संपन्न झाल्या आहे. त्यानंतर आता ६ जून रोजी विद्यापीठाने विद्यार्थ्यांचा विचार न करता द्वितीय सत्राच्या परीक्षा जाहीर केल्या आहेत.

नवलाची बाब म्हणजे विद्यापीठाच्या नियमानुसार दोन परीक्षा सत्रांमधील कालावधी हा निदान ९० दिवसाचा असणे बंधनकारक होते. तरी तो नियम मोडीत काढत विद्यापीठाने मर्जीनुसार परीक्षा जाहीर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर १५ ते ३० मे दरम्यान प्रथम सत्रातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी परीक्षांचे नियोजन केले आहे. आणि लगेच ५ दिवसाच्या अंतरावर द्वितीय सत्राच्या परीक्षा नियोजन केले आहे. यावर विधी शाखेतील एलएलबी ३ वर्ष व ५ वर्षाच्या विद्यार्थ्यांनी १० मे रोजी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले व परीक्षा नियंत्रक मोनाली तोटे यांच्या समक्ष निवेदन सादर केले असता विद्यार्थ्याचे म्हणणे न ऐकून घेता परीक्षा नियोजन बदलणार नाही. तुम्ही इथे कितीही निवेदन दिले तर फायदा नाही. तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत आहे असे विधी शाखेतील विद्यार्थ्यांना खडसावले. सध्याचा विद्यापीठाचा तानाशाहीचा स्वभाव पाहता दिवंगत कुलगुरू दिलीप मालखेडे यांची आणि त्यांच्या लोकशाही कारभाराच्या पद्धतीची उणीव आज जाणवत असल्याची भावना विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी पायऱ्यांवर निदर्शने करीत न्याय देण्याची मागणी रेटून धरली.

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थीAmravatiअमरावती