शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
4
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
5
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
6
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
7
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
8
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
9
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
10
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
11
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
12
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
13
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
14
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
15
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
16
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
17
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
18
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
19
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
20
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली

विदर्भातील प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच, कुटुंबीयांचाही सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 17:48 IST

प्रकल्पग्रस्तांचा सोमवारपासून सुरू असलेला ठिय्या तिस-या दिवशीही येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरूच आहे. यामध्ये बुधवारी आंदोलनकर्त्यांच्या आई, वडिलांसह पत्नी आणि मुलांनीदेखील सहभाग नोंदविल्याने आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. प्रशासकीय स्तरावर तोडगा निघालेला नाही.

अमरावती : प्रकल्पग्रस्तांचा सोमवारपासून सुरू असलेला ठिय्या तिस-या दिवशीही येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरूच आहे. यामध्ये बुधवारी आंदोलनकर्त्यांच्या आई, वडिलांसह पत्नी आणि मुलांनीदेखील सहभाग नोंदविल्याने आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. प्रशासकीय स्तरावर तोडगा निघालेला नाही. जिल्हाधिकारी शैलेश नवाल मात्र, आयोगाच्या प्रशिक्षणाला पुण्याला गेले आहेत.विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीच्या नेतृत्वात विदर्भातील प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन येथे सुरू आहे. यापूर्वीही दोनवेळा आंदोलने झालीत. शासनाशी सातत्याने पाठपुरावा सुरू असताना आंदोलनकर्त्यांच्या मागण्या सोडविण्यासाठी शासनाने स्वारस्य दाखविलेले नाही.

त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या भावना तीव्र होत आहेत. घरधनी तीन दिवसांपासून घरी आलेला नसल्यामुळे आंदोलनकर्त्यांच्या पत्नी आता मुलांसह आंदोलनात सहभागी होऊ लागल्या आहेत. आता आरपारची लढाई लढण्याचा निर्धार या परिवारांनी व्यक्त केला.प्रकल्पासाठी जमिनीचे अधिग्रहण करताना झालेला दुजाभाव आणि कमी मोबदला देण्यात आल्यामुळे वाढीव मोबदला मिळावा, ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे. जिल्हास्तरावरच्या मागण्या सोडविण्यासाठी प्रशासन आग्रही असताना शासनस्तरवरच्या मागण्यांसाठी मात्र, पुरेसा पाठपुरावा करीत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. दरम्यान, मंगळवारची रात्र आंदोलनकर्त्यांनी उघड्यावरच काढली. स्थानिक समाजसेवकांद्वारा या आंदोलनकर्त्यांना मदत करण्यात आली. शांततेच्या मार्गाने प्रशासन जुमानत नसल्यामुळे हे आंदोलन दिवसागणिक अधिक तीव्र करण्याचा आंदोलकांचा इशारा हा प्रशासनाची परीक्षा पाहणारा ठरणार, हे निश्चित.

पालकमंत्र्यांची मध्यस्ती, आंदोलनकर्ते मात्र, ठामअमरावती विभागासह विदर्भातील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यासंदर्भात मंगळवारी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी राज्याचे  जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना पत्र देऊन आंदोलकांशी बैठक घेण्याची विनंती केली. आंदोलन माघारी घेऊन शिष्ठमंडळाने जलसंपदामंत्र्यांशी चर्चा करावी, असा प्रस्ताव आंदोलकांना देण्यात आला. मात्र, कुठल्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेणार नाही. आंदोलन सुरूच असताना मंत्र्यांनी शिष्ठमंडळाशी चर्चा, करावी व निर्णय जाहीर करावा, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांची आहे. 

टॅग्स :Vidarbhaविदर्भ