शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

विदर्भातील प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच, कुटुंबीयांचाही सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 17:48 IST

प्रकल्पग्रस्तांचा सोमवारपासून सुरू असलेला ठिय्या तिस-या दिवशीही येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरूच आहे. यामध्ये बुधवारी आंदोलनकर्त्यांच्या आई, वडिलांसह पत्नी आणि मुलांनीदेखील सहभाग नोंदविल्याने आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. प्रशासकीय स्तरावर तोडगा निघालेला नाही.

अमरावती : प्रकल्पग्रस्तांचा सोमवारपासून सुरू असलेला ठिय्या तिस-या दिवशीही येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरूच आहे. यामध्ये बुधवारी आंदोलनकर्त्यांच्या आई, वडिलांसह पत्नी आणि मुलांनीदेखील सहभाग नोंदविल्याने आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. प्रशासकीय स्तरावर तोडगा निघालेला नाही. जिल्हाधिकारी शैलेश नवाल मात्र, आयोगाच्या प्रशिक्षणाला पुण्याला गेले आहेत.विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीच्या नेतृत्वात विदर्भातील प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन येथे सुरू आहे. यापूर्वीही दोनवेळा आंदोलने झालीत. शासनाशी सातत्याने पाठपुरावा सुरू असताना आंदोलनकर्त्यांच्या मागण्या सोडविण्यासाठी शासनाने स्वारस्य दाखविलेले नाही.

त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या भावना तीव्र होत आहेत. घरधनी तीन दिवसांपासून घरी आलेला नसल्यामुळे आंदोलनकर्त्यांच्या पत्नी आता मुलांसह आंदोलनात सहभागी होऊ लागल्या आहेत. आता आरपारची लढाई लढण्याचा निर्धार या परिवारांनी व्यक्त केला.प्रकल्पासाठी जमिनीचे अधिग्रहण करताना झालेला दुजाभाव आणि कमी मोबदला देण्यात आल्यामुळे वाढीव मोबदला मिळावा, ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे. जिल्हास्तरावरच्या मागण्या सोडविण्यासाठी प्रशासन आग्रही असताना शासनस्तरवरच्या मागण्यांसाठी मात्र, पुरेसा पाठपुरावा करीत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. दरम्यान, मंगळवारची रात्र आंदोलनकर्त्यांनी उघड्यावरच काढली. स्थानिक समाजसेवकांद्वारा या आंदोलनकर्त्यांना मदत करण्यात आली. शांततेच्या मार्गाने प्रशासन जुमानत नसल्यामुळे हे आंदोलन दिवसागणिक अधिक तीव्र करण्याचा आंदोलकांचा इशारा हा प्रशासनाची परीक्षा पाहणारा ठरणार, हे निश्चित.

पालकमंत्र्यांची मध्यस्ती, आंदोलनकर्ते मात्र, ठामअमरावती विभागासह विदर्भातील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यासंदर्भात मंगळवारी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी राज्याचे  जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना पत्र देऊन आंदोलकांशी बैठक घेण्याची विनंती केली. आंदोलन माघारी घेऊन शिष्ठमंडळाने जलसंपदामंत्र्यांशी चर्चा करावी, असा प्रस्ताव आंदोलकांना देण्यात आला. मात्र, कुठल्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेणार नाही. आंदोलन सुरूच असताना मंत्र्यांनी शिष्ठमंडळाशी चर्चा, करावी व निर्णय जाहीर करावा, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांची आहे. 

टॅग्स :Vidarbhaविदर्भ