शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

अमरावती ग्रामीणची भरती रद्द नव्हे, पावसामुळे मैदानी चाचणी पुढे ढकलली!

By प्रदीप भाकरे | Updated: June 21, 2024 20:54 IST

पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकामुळे भरती रद्द झाल्याच्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.

अमरावती: जिल्हा ग्रामीण पोलिस दलामध्ये १९ जूनपासून पोलिस भरती प्रक्रियेस सुरुवात झाली असून, त्या मालिकेत २१ जून रोजी सकाळी मैदानी चाचणीकरिता १२०० उमेदवारांना बोलाविण्यात आले होते; परंतु गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे मैदान पूर्णत: ओले झाले. त्यामुळे त्यावर २१ जून रोजी बोलावलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी घेता आली नाही. ज्या उमेदवारांची २१ जून रोजी मैदानी चाचणी होती त्यांची ती चाचणी आता १६ जुलै रोजी होणार आहे. पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्याकडून ही माहिती देण्यात आली. पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकामुळे भरती रद्द झाल्याच्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.

ग्रामीण पोलिसांच्या आस्थापनेवरील भरती प्रक्रिया २२ जून व त्यापुढे दररोज नियमितपणे सुरू राहणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी २२ जूनसह व त्यानंतर मैदानी चाचणी असेपर्यंत दररोज त्यांना नेमून दिलेल्या दिनांकास पहाटे ४:३० वाजता माल टेकडीच्या बाजूला असलेल्या जोग स्टेडियम येथे हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पावसामुळे मैदान ओले झाल्याने केवळ शुक्रवारची भरती प्रक्रिया रद्द झाली आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द झालेली नाही. त्यामुळे कृपया उमेदवारांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसAmravatiअमरावती