शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती : तीन दिवसांत मागवला प्रपत्रासह संयुक्त अहवाल, विभागीय आयुक्तांना सूचना; अवकाळी, गारपिटीने शेती व फळपिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 15:50 IST

राज्यात गेल्या दोन दिवसांत अवकाळी पावसासह गारपिटीने शेती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शासनाने नुकसानाबाबत प्रपत्र व संयुक्त पंचनाम्यासह अहवाल तीन दिवसांत मागविला आहे.

अमरावती : राज्यात गेल्या दोन दिवसांत अवकाळी पावसासह गारपिटीने शेती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शासनाने नुकसानाबाबत प्रपत्र व संयुक्त पंचनाम्यासह अहवाल तीन दिवसांत मागविला आहे. महसूल विभागाचे यासंदर्भातील पत्र विभागीय आयुक्तांना सोमवारी उशिरा दिले. त्याअनुषंगाने विभागीय आयुक्तांनी सर्व जिल्हाधिका-यांना सूचना देऊन अहवाल मागविला आहे.महसूल विभागाच्या पत्रानुसार, अवेळी पाऊस व गारपिटीमुळे पिके व फळपिकांच्या नुकसानाबाबत संयुक्त पंचनामे करून प्रपत्र अ, ब, क व ड मध्ये सविस्तर प्रस्ताव जिल्ह्यांद्वारा पाठविण्यात येणार आहे. यामध्ये पिकांच्या नुकसानाबाबत ३३ ते ५० टक्के व ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या क्षेत्राची विगतवारी स्वतंत्रपणे दर्शविण्यात यावी, अशा सूचना महसूल विभागाने केल्या आहेत. या दोन्ही प्रकारांतील नुकसानाचे स्वतंत्र प्रपत्र व संयुक्त सर्वेक्षण तालुकास्तरीय समितीने करून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांकडे एकत्रित संयुक्त स्वाक्षरी अहवाल तीन दिवसांच्या आत जिल्हाधिकाºयांनी मागविले आहेत. अमरावती विभागात रविवारी सकाळी झालेल्या वादळासह गारपीट व  अवकाळी पावसामुळे ८१३ गावांमध्ये किमान ८० हजार हेक्टरमधील रबी व फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आपत्तीमध्ये वीज अंगावर पडून चार व्यक्ती व १२ गुरांचा मृत्यू झाला तसेच चार व्यक्ती जखमी झाल्या आहेत, तर सोमवारी सायंकाळी अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेती व फळपिकांचे नुकसान झाले आता या नुकसानाचे युद्धस्तरावर पंचनामे करण्यात येणार आहेत.

टॅग्स :AmravatiअमरावतीFarmerशेतकरी