शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

अमरावती : तीन दिवसांत मागवला प्रपत्रासह संयुक्त अहवाल, विभागीय आयुक्तांना सूचना; अवकाळी, गारपिटीने शेती व फळपिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 15:50 IST

राज्यात गेल्या दोन दिवसांत अवकाळी पावसासह गारपिटीने शेती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शासनाने नुकसानाबाबत प्रपत्र व संयुक्त पंचनाम्यासह अहवाल तीन दिवसांत मागविला आहे.

अमरावती : राज्यात गेल्या दोन दिवसांत अवकाळी पावसासह गारपिटीने शेती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शासनाने नुकसानाबाबत प्रपत्र व संयुक्त पंचनाम्यासह अहवाल तीन दिवसांत मागविला आहे. महसूल विभागाचे यासंदर्भातील पत्र विभागीय आयुक्तांना सोमवारी उशिरा दिले. त्याअनुषंगाने विभागीय आयुक्तांनी सर्व जिल्हाधिका-यांना सूचना देऊन अहवाल मागविला आहे.महसूल विभागाच्या पत्रानुसार, अवेळी पाऊस व गारपिटीमुळे पिके व फळपिकांच्या नुकसानाबाबत संयुक्त पंचनामे करून प्रपत्र अ, ब, क व ड मध्ये सविस्तर प्रस्ताव जिल्ह्यांद्वारा पाठविण्यात येणार आहे. यामध्ये पिकांच्या नुकसानाबाबत ३३ ते ५० टक्के व ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या क्षेत्राची विगतवारी स्वतंत्रपणे दर्शविण्यात यावी, अशा सूचना महसूल विभागाने केल्या आहेत. या दोन्ही प्रकारांतील नुकसानाचे स्वतंत्र प्रपत्र व संयुक्त सर्वेक्षण तालुकास्तरीय समितीने करून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांकडे एकत्रित संयुक्त स्वाक्षरी अहवाल तीन दिवसांच्या आत जिल्हाधिकाºयांनी मागविले आहेत. अमरावती विभागात रविवारी सकाळी झालेल्या वादळासह गारपीट व  अवकाळी पावसामुळे ८१३ गावांमध्ये किमान ८० हजार हेक्टरमधील रबी व फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आपत्तीमध्ये वीज अंगावर पडून चार व्यक्ती व १२ गुरांचा मृत्यू झाला तसेच चार व्यक्ती जखमी झाल्या आहेत, तर सोमवारी सायंकाळी अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेती व फळपिकांचे नुकसान झाले आता या नुकसानाचे युद्धस्तरावर पंचनामे करण्यात येणार आहेत.

टॅग्स :AmravatiअमरावतीFarmerशेतकरी