शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अमरावती : मुद्दल वगळली, यंदा व्याजाचीच वसुली ; चाकर्दा गाव पंचायतचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2018 18:21 IST

मेळघाटातील गाव पंचायत बँकांनी यंदा वाटलेल्या कर्जाची वसुली करताना मूळ रक्कम वगळून केवळ त्यावरील व्याजाचीच रक्कम वसूल करण्याचा निर्णय चाकर्दा या गावातील पंचायतने घेतला आहे.

-श्यामकांत पाण्डेय

धारणी (अमरावती) : मेळघाटातील गाव पंचायत बँकांनी यंदा वाटलेल्या कर्जाची वसुली करताना मूळ रक्कम वगळून केवळ त्यावरील व्याजाचीच रक्कम वसूल करण्याचा निर्णय चाकर्दा या गावातील पंचायतने घेतला आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून नापिकीमुळे कर्जबाजारी झालेल्या आदिवासी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

मेळघाटातील चिखलदरा व धारणी तालुक्यांमध्ये गावपाड्यातील पंचायत व्यवस्था सर्वत्र परिचित आहे. या पंचायतींचे वार्षिक ताळेबंद पंचमीदरम्यान सादर करण्यात येत आहे. या पंचायतद्वारे वाटण्यात आलेल्या रकमेवर सवाई व्याजदराने वसुली दरवर्षी करण्यात येते. त्यामुळे पंचायतकडे जमा रकमेत दरवर्षी एक चतुर्थांश रकमेने वाढ होत जाते. मात्र, यंदा गावकºयांची आर्थिक परिस्थिती पाहता, एकूण रक्कम न वसूल करता, केवळ मूळ रकमेवरील व्याजाचीच वसुली करण्याचा निर्णय चाकर्दासह अनेक गावांतील पंचायतींनी घेतला आहे. होळी सणानंतर रोजगाराच्या रकमेतून गाव पंचायतींची रक्कम भरण्यासाठी बाहेरगावावरून आदिवासी बांधव मूळ गावी परतले आहेत. यंदा मूळ रक्कम वसूल न करण्याचा निर्णय पंचायतने घेतल्याने आदिवासींच्या होळीच्या आनंदात भरच पडली आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती