शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Raj Thackeray: अमरावतीतला प्रकार पुन्हा महाराष्ट्रात घडला तर यांना सोडायचं नाही; राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 12:00 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अमरावती दौऱ्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना केलेल्या विधानानं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

अमरावती-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अमरावती दौऱ्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना केलेल्या विधानानं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अमरावतीसारखा प्रकार पुन्हा महाराष्ट्रात घडला तर यांना सोडायचं नाही, असं विधान राज ठाकरे यांनी केलं आहे. राज ठाकरेंच्या या विधानानंतर सभागृहात कार्यकर्त्यांकडून 'जय श्री राम'च्या जोरदार घोषणा सुरू होत्या. राज ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यात ते विविध ठिकाणी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेऊन पुढील निवडणुकीसाठी जोमानं तयारीला लागण्याच्या सूचना करत आहेत. 

पुण्यात पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे अमरावतीला रवाना झाले होते. यावेळी अमरावतीत राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आक्रमक भाषण केलं. "अमरावतीमध्ये जो प्रयत्न झाला तो प्रयत्न जर पुन्हा महाराष्ट्रात झाला तर यांना सोडायचं नाही. आता इथून परत जेव्हा घरी जाल त्यावेळी प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला सांगायचं आपल्या घरावर आणि घराच्या चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा फडकला पाहिजे. नवीन वर्षापासून धुमधडाका सुरू करू", असं राज ठाकरे म्हणाले. 

त्रिपुरातील हिंसाचाराच्या घटनेचे पडसाद अमरावतीत उमटले होते आणि हिंसाचार घडला होता. त्यामुळे शहरात संचारबंदी लागू करण्याची वेळ आली होती. तसंच इंटरनेट सेवा देखील खंडित करण्यात आली होती. हजारोंच्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरले होते आणि तोडफोड करण्यात आली होती. हिंसाचारत पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस जखमी झाले होते. नागपूर, अकोला, यवतमाळ, वाशिम येथून अतिरिक्त पोलीस कुमक बोलवावी लागली होती. याच हिंसाचाराच्या घटनेचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी अमरावतीच्या दौऱ्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांना रोखठोक सूचना केल्या आहेत. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेAmravatiअमरावती