शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

Amravati: आदिवासींच्या प्रश्नांवर सरकार अन् आमदार, खासदारांना आता मिळाली फुरसत

By गणेश वासनिक | Updated: August 27, 2023 15:47 IST

Amravati: राष्ट्रीय जनजाती आयोगाने २०१२ च्या अहवालात सूचना केल्यानुसार जनजाती सल्लागार परिषदेच्या वर्षातून किमान ४ बैठका अन् चार वर्षात आजपर्यंत १६ बैठका व्हायला पाहिजे होत्या.

- गणेश वासनिकअमरावती - राष्ट्रीय जनजाती आयोगाने २०१२ च्या अहवालात सूचना केल्यानुसार जनजाती सल्लागार परिषदेच्या वर्षातून किमान ४ बैठका अन् चार वर्षात आजपर्यंत १६ बैठका व्हायला पाहिजे होत्या. परंतु सरकारच्या दप्तरी आदिवासींच्या समस्या व प्रश्नांना गौण स्थान असल्यामुळे चार वर्षात जनजाती सल्लागार परिषदेची पहिली बैठक मुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली ३१ ऑगस्ट रोजी मुंबई येथे होणार आहे. ५१ वी बैठक राज्यातील आदिवासी समाजाच्या समस्या आणि प्रश्न सुटावे म्हणून जनजाती सल्लागार परिषदेच्या बैठकांसाठी ‘लोकमत’ने सरकारला जागे करण्यासाठी वारंवार वृत्त प्रकाशित केले, हे विशेष.

राज्यात २५ नोव्हेंबर २०१९ मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यांच्या कार्यकाळात सरकारला आणि आदिवासी समाजाच्या आमदार, खासदारांना अजिबात फुरसत मिळाली नाही. परिणामी जनजाती सल्लागार परिषदेची एकही बैठक झाली नाही. त्यानंतर ३० जून २०२२ रोजी शिंदे-फडणवीस यांचे राज्यात सरकार आले. त्यांच्याही काळात आजपर्यंत जनजाती सल्लागार परिषदेची एकही बैठक झाले नाही. परंतु आदिवासींचा समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी आता कुठे सरकार आणि आदिवासी आमदार, खासदारांना फुरसत मिळाली आहे.

भारतीय संविधानाच्या ५ व्या अनुसूचितील भाग - ख मधील परिच्छेद ४ (१) अनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासी समाजाच्या कल्याणाच्या योजना, धोरण, कार्यक्रमाचे नियमन आणि आदिवासींच्या विकासाच्या संदर्भातील विचारलेल्या विषयांच्या बाबतीत राज्यपाल यांना सल्ला देणे याकरिता जनजाती सल्लागार परिषद अस्तित्वात आहे. १ जानेवारी २०१० पासून ते २० फेब्रुवारी २०१९ पर्यंत जनजाती सल्लागार परिषदेच्या केवळ पाच बैठका झालेल्या आहेत. परंतु गेल्या चार वर्षांत या जनजाती सल्लागार परिषदेची एकही बैठक झालेली नव्हती. या जनजाती सल्लागार परिषदेत राज्यातील २४ आदिवासी आमदार, ३ खासदार व १ आदिवासी संबंधी तज्ञ असे एकूण २८ जणांचा समावेश आहे.

उशिरा का होईना मायबाप सरकारला आदिवासींचे प्रश्न व समस्यांची आठवण झाली. राष्ट्रीय जनजाती आयोगाच्या सुचनेनुसार बैठका व्हाव्यात म्हणून 'ट्रायबल फोरम' संघटनेने मोठा पाठपुरावा केला. मात्र आता सरकार आणि आदिवासी आमदार, खासदारांनी वर्षानुवर्षे प्रलंबित आदिवासी समाजाच्या समस्या व प्रश्न सोडवावे.- महानंदा टेकाम राज्य संघटक ट्रायबल वुमेन्स फोरम

टॅग्स :Mantralayaमंत्रालयGovernmentसरकारAmravatiअमरावती