शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Amravati: आदिवासींच्या प्रश्नांवर सरकार अन् आमदार, खासदारांना आता मिळाली फुरसत

By गणेश वासनिक | Updated: August 27, 2023 15:47 IST

Amravati: राष्ट्रीय जनजाती आयोगाने २०१२ च्या अहवालात सूचना केल्यानुसार जनजाती सल्लागार परिषदेच्या वर्षातून किमान ४ बैठका अन् चार वर्षात आजपर्यंत १६ बैठका व्हायला पाहिजे होत्या.

- गणेश वासनिकअमरावती - राष्ट्रीय जनजाती आयोगाने २०१२ च्या अहवालात सूचना केल्यानुसार जनजाती सल्लागार परिषदेच्या वर्षातून किमान ४ बैठका अन् चार वर्षात आजपर्यंत १६ बैठका व्हायला पाहिजे होत्या. परंतु सरकारच्या दप्तरी आदिवासींच्या समस्या व प्रश्नांना गौण स्थान असल्यामुळे चार वर्षात जनजाती सल्लागार परिषदेची पहिली बैठक मुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली ३१ ऑगस्ट रोजी मुंबई येथे होणार आहे. ५१ वी बैठक राज्यातील आदिवासी समाजाच्या समस्या आणि प्रश्न सुटावे म्हणून जनजाती सल्लागार परिषदेच्या बैठकांसाठी ‘लोकमत’ने सरकारला जागे करण्यासाठी वारंवार वृत्त प्रकाशित केले, हे विशेष.

राज्यात २५ नोव्हेंबर २०१९ मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यांच्या कार्यकाळात सरकारला आणि आदिवासी समाजाच्या आमदार, खासदारांना अजिबात फुरसत मिळाली नाही. परिणामी जनजाती सल्लागार परिषदेची एकही बैठक झाली नाही. त्यानंतर ३० जून २०२२ रोजी शिंदे-फडणवीस यांचे राज्यात सरकार आले. त्यांच्याही काळात आजपर्यंत जनजाती सल्लागार परिषदेची एकही बैठक झाले नाही. परंतु आदिवासींचा समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी आता कुठे सरकार आणि आदिवासी आमदार, खासदारांना फुरसत मिळाली आहे.

भारतीय संविधानाच्या ५ व्या अनुसूचितील भाग - ख मधील परिच्छेद ४ (१) अनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासी समाजाच्या कल्याणाच्या योजना, धोरण, कार्यक्रमाचे नियमन आणि आदिवासींच्या विकासाच्या संदर्भातील विचारलेल्या विषयांच्या बाबतीत राज्यपाल यांना सल्ला देणे याकरिता जनजाती सल्लागार परिषद अस्तित्वात आहे. १ जानेवारी २०१० पासून ते २० फेब्रुवारी २०१९ पर्यंत जनजाती सल्लागार परिषदेच्या केवळ पाच बैठका झालेल्या आहेत. परंतु गेल्या चार वर्षांत या जनजाती सल्लागार परिषदेची एकही बैठक झालेली नव्हती. या जनजाती सल्लागार परिषदेत राज्यातील २४ आदिवासी आमदार, ३ खासदार व १ आदिवासी संबंधी तज्ञ असे एकूण २८ जणांचा समावेश आहे.

उशिरा का होईना मायबाप सरकारला आदिवासींचे प्रश्न व समस्यांची आठवण झाली. राष्ट्रीय जनजाती आयोगाच्या सुचनेनुसार बैठका व्हाव्यात म्हणून 'ट्रायबल फोरम' संघटनेने मोठा पाठपुरावा केला. मात्र आता सरकार आणि आदिवासी आमदार, खासदारांनी वर्षानुवर्षे प्रलंबित आदिवासी समाजाच्या समस्या व प्रश्न सोडवावे.- महानंदा टेकाम राज्य संघटक ट्रायबल वुमेन्स फोरम

टॅग्स :Mantralayaमंत्रालयGovernmentसरकारAmravatiअमरावती