शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

अमरावती विभागाचा दहावीचा निकाल ९५.५८ टक्के; वाशिम विभागातून अव्वल, अकोला दुसऱ्या स्थानी

By गणेश वासनिक | Updated: May 27, 2024 14:36 IST

नऊ विभागीय मंडळांमध्ये गेल्या वर्षी ९३.२२ टक्के निकालासह अमरावती विभाग राज्यात सहाव्या स्थानी होता. यावेळी क्रमवारीत पाचव्या स्थानी सुधारणा झाली आहे.

अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. अमरावती विभागाचा निकाल ९५.५८ टक्के लागला आहे. नऊ विभागीय मंडळांमध्ये गेल्या वर्षी ९३.२२ टक्के निकालासह अमरावती विभाग राज्यात सहाव्या स्थानी होता. यावेळी क्रमवारीत पाचव्या स्थानी सुधारणा झाली आहे.

अमरावती विभागातून एकूण १ लाख ६१ हजार ४९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षेला १ लाख ५९ हजार ६८४ विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यापैकी १ लाख ५२ हजार ६३१ विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले. अमरावती विभागाची उत्तीर्णतेची टक्केवारी ही ९५.५८ आहे. विभागात निकालाच्या टक्केवारीत वाशीम जिल्हा अव्वलस्थानी आहे.जिल्हानिहाय निकालाची टक्केवारीवाशीम: ९६.७१ टक्केअकोला ९६.४५ टक्के,बुलढाणा ९५.९५ टक्के,यवतमाळ ९५.०० टक्केअमरावती : ९४.६१ टक्केमुलींचाच वरचष्मादरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात मुलांपेक्षा सरस असल्याचे दाखवून दिले आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही ९७.१६ टक्के तर मुलांची ९४.१८ टक्के आहे. विभागातून ८४ हजार ८९१ मुलांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी ७९ हजार ९५७ मुले, तर ७४ हजार ७९३ मुलींपैकी ७२ हजार ६७४ मुली उत्तीर्ण झाल्या.प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी सर्वाधिकअमरावती विभागात उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थ्यांपैकी प्रावीण्यासह प्रथम श्रेणी म्हणजे ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्याविद्यार्थ्यांची संख्या ६० हजार २२५ इतकी आहे. प्रथम श्रेणी म्हणजे ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे ५२ हजार ९७६, द्वितीय श्रेणी म्हणजे ४५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे ३२ हजार १०२ तर काठावर ३५ टक्क्यांहून पुढे गुण मिळवणाऱ्याया विद्यार्थ्यांची संख्या ही ७ हजार ३२८ इतकी आहे. 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल