शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

सत्तास्थापनेबाबत अमरावती जिल्ह्यातील आमदारांच्या संमिश्र प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 16:28 IST

राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर अमरावती जिल्ह्यातील आमदारांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी या निर्णयाचे स्वागत केले तर काहींना तो रुचलेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर अमरावती जिल्ह्यातील आमदारांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी या निर्णयाचे स्वागत केले तर काहींना तो रुचलेला नाही.महाआघाडीतील मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मी आमदार आहे. आम्ही महाआघाडीतच आहोत, राहू. महाआघाडीचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, तो आम्हाला शिरोधार्य असेल.देवेंद्र भुयार, आमदार, मोर्शी मतदारसंघ

भाजपने रात्रीच्या अंधारात ज्या काही घडामोडी केल्यात. त्या निषेधार्ह आहेत. काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडीचेच सरकार स्थानापन्न होईल.बळवंत वानखडे, आमदार, दयार्पूर मतदारसंघरात्रीच्या अंधारात केलेला प्रकार घृणास्पद व धक्कादायक आहे. त्या घटनाबाह्य व असंवैधानिक कृत्याचा आम्ही निषेध करतो. सत्तेसाठी काहीही करणाऱ्या भाजपने लोकशाहीचा खून केला आहे.यशोमती ठाकूर, आमदार, तिवसामागील पाच वर्षे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वात राज्याने प्रगती केली. यंदाच्या निवडणुकीत जनतेने सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला कौल दिला. पुढील पाच वर्षे राज्याची अधिक प्रगती होईल.प्रताप अडसड, आमदार, धामणगाव रेल्वेआजची घडामोड प्रतिक्रियेबाहेरची आहे. मात्र, पाण्यात आग लागू शकते, राजकारणात काहीही होऊ शकते, त्याची प्रचिती पुन्हा आली. त्यात नवल वाटून घेण्याची गरज नाही. वैचारिक मतदानाचे पतन त्यासाठी कारणीभूत आहे.बच्चू कडू, आमदार, अचलपूरराज्यात भाजप-राष्ट्रवादीचे सरकार बनेल, असे मी पंधरवड्यापूर्वी बोललो होतो. ती भविष्यवाणी खरी ठरली. फडणवीस यांचे नेतृत्व सर्वव्यापी आहे. शिवसेनेच्या मुजोरीला जनतेने धडा शिकविला.रवि राणा, आमदार, बडनेरा

 राज्यातील जनतेने बाजप, सेनेला जनादेश दिला होता. मा. शिवसेनेद्वारा याचा अपमान करण्यात आला. याविषयी अपमानास्पद शब्ध वापरल्याने लोकशाहीचा अपमान झाला. अजित पवारांनी साथ दिली त्यांचे स्वागत.दिनेश सूर्यवंशी,भाजप जिल्हाध्यक्ष

 काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रससोबत आम्ही सरकार स्थापन करत असताना भाजपने टीका केली. आता अजित पवारांची संगत कोणत्या नैतिकतेत बसते, हे देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला सांगावे.राजेश वानखडे,जिल्हाप्रमुख, शिवसेना

देवेंद्र फडणविसांनी चोरून सरकार बनविले. हे सरकार टिकणार नाही. अजित पवारांसोबतचे आमदार आता शरद पवार यांचेकडे परतलेत. त्यामुळे राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचेच सरकार स्थापन होईल.बबलू देशमुख,जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूYashomati Thakurयशोमती ठाकूर