शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

सत्तास्थापनेबाबत अमरावती जिल्ह्यातील आमदारांच्या संमिश्र प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 16:28 IST

राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर अमरावती जिल्ह्यातील आमदारांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी या निर्णयाचे स्वागत केले तर काहींना तो रुचलेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर अमरावती जिल्ह्यातील आमदारांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी या निर्णयाचे स्वागत केले तर काहींना तो रुचलेला नाही.महाआघाडीतील मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मी आमदार आहे. आम्ही महाआघाडीतच आहोत, राहू. महाआघाडीचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, तो आम्हाला शिरोधार्य असेल.देवेंद्र भुयार, आमदार, मोर्शी मतदारसंघ

भाजपने रात्रीच्या अंधारात ज्या काही घडामोडी केल्यात. त्या निषेधार्ह आहेत. काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडीचेच सरकार स्थानापन्न होईल.बळवंत वानखडे, आमदार, दयार्पूर मतदारसंघरात्रीच्या अंधारात केलेला प्रकार घृणास्पद व धक्कादायक आहे. त्या घटनाबाह्य व असंवैधानिक कृत्याचा आम्ही निषेध करतो. सत्तेसाठी काहीही करणाऱ्या भाजपने लोकशाहीचा खून केला आहे.यशोमती ठाकूर, आमदार, तिवसामागील पाच वर्षे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वात राज्याने प्रगती केली. यंदाच्या निवडणुकीत जनतेने सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला कौल दिला. पुढील पाच वर्षे राज्याची अधिक प्रगती होईल.प्रताप अडसड, आमदार, धामणगाव रेल्वेआजची घडामोड प्रतिक्रियेबाहेरची आहे. मात्र, पाण्यात आग लागू शकते, राजकारणात काहीही होऊ शकते, त्याची प्रचिती पुन्हा आली. त्यात नवल वाटून घेण्याची गरज नाही. वैचारिक मतदानाचे पतन त्यासाठी कारणीभूत आहे.बच्चू कडू, आमदार, अचलपूरराज्यात भाजप-राष्ट्रवादीचे सरकार बनेल, असे मी पंधरवड्यापूर्वी बोललो होतो. ती भविष्यवाणी खरी ठरली. फडणवीस यांचे नेतृत्व सर्वव्यापी आहे. शिवसेनेच्या मुजोरीला जनतेने धडा शिकविला.रवि राणा, आमदार, बडनेरा

 राज्यातील जनतेने बाजप, सेनेला जनादेश दिला होता. मा. शिवसेनेद्वारा याचा अपमान करण्यात आला. याविषयी अपमानास्पद शब्ध वापरल्याने लोकशाहीचा अपमान झाला. अजित पवारांनी साथ दिली त्यांचे स्वागत.दिनेश सूर्यवंशी,भाजप जिल्हाध्यक्ष

 काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रससोबत आम्ही सरकार स्थापन करत असताना भाजपने टीका केली. आता अजित पवारांची संगत कोणत्या नैतिकतेत बसते, हे देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला सांगावे.राजेश वानखडे,जिल्हाप्रमुख, शिवसेना

देवेंद्र फडणविसांनी चोरून सरकार बनविले. हे सरकार टिकणार नाही. अजित पवारांसोबतचे आमदार आता शरद पवार यांचेकडे परतलेत. त्यामुळे राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचेच सरकार स्थापन होईल.बबलू देशमुख,जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूYashomati Thakurयशोमती ठाकूर