शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
3
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
4
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
5
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
6
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
7
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
8
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
9
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?
10
काँग्रेसच्या नेत्याने कार्यक्रमात म्हटलं बांगलादेशचं राष्ट्रगीत, भाजपा आक्रमक, काँग्रेसनं दिलं असं प्रत्युत्तर
11
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
12
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
13
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
14
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
15
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
16
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
17
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
18
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
19
"सर, ब्रेकअप झालंय" Gen Z कर्मचाऱ्यानं बॉसला पाठवला ईमेल; लगेच १० दिवसांची सुट्टी मंजूर, कारण..
20
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?

सत्तास्थापनेबाबत अमरावती जिल्ह्यातील आमदारांच्या संमिश्र प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 16:28 IST

राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर अमरावती जिल्ह्यातील आमदारांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी या निर्णयाचे स्वागत केले तर काहींना तो रुचलेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर अमरावती जिल्ह्यातील आमदारांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी या निर्णयाचे स्वागत केले तर काहींना तो रुचलेला नाही.महाआघाडीतील मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मी आमदार आहे. आम्ही महाआघाडीतच आहोत, राहू. महाआघाडीचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, तो आम्हाला शिरोधार्य असेल.देवेंद्र भुयार, आमदार, मोर्शी मतदारसंघ

भाजपने रात्रीच्या अंधारात ज्या काही घडामोडी केल्यात. त्या निषेधार्ह आहेत. काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडीचेच सरकार स्थानापन्न होईल.बळवंत वानखडे, आमदार, दयार्पूर मतदारसंघरात्रीच्या अंधारात केलेला प्रकार घृणास्पद व धक्कादायक आहे. त्या घटनाबाह्य व असंवैधानिक कृत्याचा आम्ही निषेध करतो. सत्तेसाठी काहीही करणाऱ्या भाजपने लोकशाहीचा खून केला आहे.यशोमती ठाकूर, आमदार, तिवसामागील पाच वर्षे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वात राज्याने प्रगती केली. यंदाच्या निवडणुकीत जनतेने सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला कौल दिला. पुढील पाच वर्षे राज्याची अधिक प्रगती होईल.प्रताप अडसड, आमदार, धामणगाव रेल्वेआजची घडामोड प्रतिक्रियेबाहेरची आहे. मात्र, पाण्यात आग लागू शकते, राजकारणात काहीही होऊ शकते, त्याची प्रचिती पुन्हा आली. त्यात नवल वाटून घेण्याची गरज नाही. वैचारिक मतदानाचे पतन त्यासाठी कारणीभूत आहे.बच्चू कडू, आमदार, अचलपूरराज्यात भाजप-राष्ट्रवादीचे सरकार बनेल, असे मी पंधरवड्यापूर्वी बोललो होतो. ती भविष्यवाणी खरी ठरली. फडणवीस यांचे नेतृत्व सर्वव्यापी आहे. शिवसेनेच्या मुजोरीला जनतेने धडा शिकविला.रवि राणा, आमदार, बडनेरा

 राज्यातील जनतेने बाजप, सेनेला जनादेश दिला होता. मा. शिवसेनेद्वारा याचा अपमान करण्यात आला. याविषयी अपमानास्पद शब्ध वापरल्याने लोकशाहीचा अपमान झाला. अजित पवारांनी साथ दिली त्यांचे स्वागत.दिनेश सूर्यवंशी,भाजप जिल्हाध्यक्ष

 काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रससोबत आम्ही सरकार स्थापन करत असताना भाजपने टीका केली. आता अजित पवारांची संगत कोणत्या नैतिकतेत बसते, हे देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला सांगावे.राजेश वानखडे,जिल्हाप्रमुख, शिवसेना

देवेंद्र फडणविसांनी चोरून सरकार बनविले. हे सरकार टिकणार नाही. अजित पवारांसोबतचे आमदार आता शरद पवार यांचेकडे परतलेत. त्यामुळे राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचेच सरकार स्थापन होईल.बबलू देशमुख,जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूYashomati Thakurयशोमती ठाकूर