शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अमरावती जिल्ह्याची नजर अंदाज ५३ पैसैवारी; जिल्हा प्रशासनाकडून अहवाल जाहीर

By जितेंद्र दखने | Updated: September 30, 2022 19:30 IST

शेतातील पीक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी महसूल विभागाची यंत्रणा पैसेवारी जाहीर करते.

सततच्या पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना जिल्हा प्रशासनाने नजर अंदाज ५३ पैसेवारी शुक्रवारी जाहीर केली. यामध्ये केवळ सहा तालुक्यांना न्याय देण्यात आला तर उर्वरित तालुक्यात पीक आलवेल असल्याचे चित्र दिसून येते. याबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. शेतातील पीक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी महसूल विभागाची यंत्रणा पैसेवारी जाहीर करते. यावरून पीक परिस्थितीचा अंदाज येतो. यासोबत रॅण्डमली पिक कापणी प्रयोग होतात. त्यावरून उत्पन्नाचा अंदाज येतो. या अंदाजानुसार केंद्र शासन शेतमालाचे आयात निर्यातीचे धोरण ठरविते. यामुळे या अहवालाला सर्वाधिक महत्त्व आहे. प्रत्यक्ष जिल्ह्याची स्थिती नाजूक असताना नजर अंदाजाच्या पैसेवारीचा प्रथम अहवाल ५३ पैसेवारीचा आला आहे. अंतिम अहवाल आल्यानंतरच जिल्ह्यातील पिक परिस्थिती कशी याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

नजर अंदाज पैसेवारी जाहीर करण्यासाठी जुलै ते सप्टेंबर अखेर पर्यतचे निरीक्षण ग्राह्य धरले जाते. महसूल विभागाची यंत्रणा याचे सर्वेक्षण करते. ही यंत्राचा सप्टेंबरला अहवाल सादर करुन तो जिल्हाधिकारी यांचेकडून मंजूर करण्यात आला आहे. या अहवालानुसार जिल्ह्यातील १९९५ गावांपैकी लागवडी योग्य असलेल्या गावांची संख्या१९५९ आहे. यात १४ तालुक्यातील ५० टक्यापेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावामध्ये ८५१ गावांचा समावेश आहे.तर ११०८ गावांची नजर अंदाज आणेवारी ही ५० टक्यापेक्षा जास्त आली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने ११५९ गावांची आणेवारी जाहीर केली आहेत.

यात सन २०२२-२३ ची नजर अंदाज आणेवारी ही ५३ पैसेवारी आली आहे. जिल्ह्यातील ९० महसुली मंडळाकडून महसूल विभागाचे यंत्रणेचा पहिला नजर पैसेवारीचा अहवाल आला आहे.या अहवालात काही तालुक्यातील काही गावांची स्थिती चिंताजनक आहे. मात्र काही तालुक्यातील गावांची पिक पैसेवारी ५० टक्याच्या आत तर काही तालुक्याची पैसेवारी ही ५३ पैसेवारीपर्यत आली आहे. अतिवृष्टीने संपूर्ण जिल्ह्यातील पिकांना मोठा फटका बसला. पिकाची वाढ खुंटली, शेत शिवारात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतात तण वाढले अशी परिस्थिती असताना नजर पैसेवारी ५० टक्क्यापेक्षा जास्त आली आल्याने शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे.तालुकानिहाय ५० टक्याच्या आतील व वरील पैसेवारीसन २०२२-२३ च्या खरीप पिकांची नजर अंदाज पैसेवारी मध्ये ५० टक्याच्या आता मध्ये असलेल्या तालुके व पैसेवारी यामध्ये चांदूर रेल्वे ४७,धामनगांव रेल्वे ४६,मोर्शी ४१,वरूड ४३,अचलपूर ४८,चांदूर बाजार ४६ या सहा तालुक्याची पैसेवारी ही ५० पैसेवारीच्या आत आहे.तर ५० पेक्षा जास्त आणेवारी असलेल्या तालुक्यामध्ये अमरावती ५४,भातकुली ६४,तिवसा ५५,नांदगाव खंडेश्वर ५४,दर्यापूर ६४,अंजनगाव सुजी ५७,धारणी ६२,चिखलदरा ५४ अशा आठ तालुक्याची आणेवारी ही ५३ पैसेवारी हून अधिक आहे.

टॅग्स :Amravatiअमरावतीfloodपूर