शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

अमरावती जिल्ह्याची नजर अंदाज ५३ पैसैवारी; जिल्हा प्रशासनाकडून अहवाल जाहीर

By जितेंद्र दखने | Updated: September 30, 2022 19:30 IST

शेतातील पीक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी महसूल विभागाची यंत्रणा पैसेवारी जाहीर करते.

सततच्या पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना जिल्हा प्रशासनाने नजर अंदाज ५३ पैसेवारी शुक्रवारी जाहीर केली. यामध्ये केवळ सहा तालुक्यांना न्याय देण्यात आला तर उर्वरित तालुक्यात पीक आलवेल असल्याचे चित्र दिसून येते. याबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. शेतातील पीक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी महसूल विभागाची यंत्रणा पैसेवारी जाहीर करते. यावरून पीक परिस्थितीचा अंदाज येतो. यासोबत रॅण्डमली पिक कापणी प्रयोग होतात. त्यावरून उत्पन्नाचा अंदाज येतो. या अंदाजानुसार केंद्र शासन शेतमालाचे आयात निर्यातीचे धोरण ठरविते. यामुळे या अहवालाला सर्वाधिक महत्त्व आहे. प्रत्यक्ष जिल्ह्याची स्थिती नाजूक असताना नजर अंदाजाच्या पैसेवारीचा प्रथम अहवाल ५३ पैसेवारीचा आला आहे. अंतिम अहवाल आल्यानंतरच जिल्ह्यातील पिक परिस्थिती कशी याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

नजर अंदाज पैसेवारी जाहीर करण्यासाठी जुलै ते सप्टेंबर अखेर पर्यतचे निरीक्षण ग्राह्य धरले जाते. महसूल विभागाची यंत्रणा याचे सर्वेक्षण करते. ही यंत्राचा सप्टेंबरला अहवाल सादर करुन तो जिल्हाधिकारी यांचेकडून मंजूर करण्यात आला आहे. या अहवालानुसार जिल्ह्यातील १९९५ गावांपैकी लागवडी योग्य असलेल्या गावांची संख्या१९५९ आहे. यात १४ तालुक्यातील ५० टक्यापेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावामध्ये ८५१ गावांचा समावेश आहे.तर ११०८ गावांची नजर अंदाज आणेवारी ही ५० टक्यापेक्षा जास्त आली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने ११५९ गावांची आणेवारी जाहीर केली आहेत.

यात सन २०२२-२३ ची नजर अंदाज आणेवारी ही ५३ पैसेवारी आली आहे. जिल्ह्यातील ९० महसुली मंडळाकडून महसूल विभागाचे यंत्रणेचा पहिला नजर पैसेवारीचा अहवाल आला आहे.या अहवालात काही तालुक्यातील काही गावांची स्थिती चिंताजनक आहे. मात्र काही तालुक्यातील गावांची पिक पैसेवारी ५० टक्याच्या आत तर काही तालुक्याची पैसेवारी ही ५३ पैसेवारीपर्यत आली आहे. अतिवृष्टीने संपूर्ण जिल्ह्यातील पिकांना मोठा फटका बसला. पिकाची वाढ खुंटली, शेत शिवारात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतात तण वाढले अशी परिस्थिती असताना नजर पैसेवारी ५० टक्क्यापेक्षा जास्त आली आल्याने शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे.तालुकानिहाय ५० टक्याच्या आतील व वरील पैसेवारीसन २०२२-२३ च्या खरीप पिकांची नजर अंदाज पैसेवारी मध्ये ५० टक्याच्या आता मध्ये असलेल्या तालुके व पैसेवारी यामध्ये चांदूर रेल्वे ४७,धामनगांव रेल्वे ४६,मोर्शी ४१,वरूड ४३,अचलपूर ४८,चांदूर बाजार ४६ या सहा तालुक्याची पैसेवारी ही ५० पैसेवारीच्या आत आहे.तर ५० पेक्षा जास्त आणेवारी असलेल्या तालुक्यामध्ये अमरावती ५४,भातकुली ६४,तिवसा ५५,नांदगाव खंडेश्वर ५४,दर्यापूर ६४,अंजनगाव सुजी ५७,धारणी ६२,चिखलदरा ५४ अशा आठ तालुक्याची आणेवारी ही ५३ पैसेवारी हून अधिक आहे.

टॅग्स :Amravatiअमरावतीfloodपूर