शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
5
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
6
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
7
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
8
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
9
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
10
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
11
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
12
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
13
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
14
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
15
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
16
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
17
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
18
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
19
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
20
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

अमरावती जिल्ह्यात १,५४६ गावांनी वेशीवरच रोखला कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 11:45 AM

अमरावती : जिल्ह्यात १,५४६ गावांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रभावी अंमल करून कोरोनाचा संसर्ग गाव वेशीवर रोखला असल्याची सुखद वार्ता आहे.

ठळक मुद्दे१४१ गावांत आढळले ७७३ रूग्ण४३८ जणांची कोरोनावर मातग्रामीण भागात २९ जणांचा मृत्यू

जितेंद्र दखने।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात १३१ दिवसांत ३ हजार ४६७ कोरोना संक्रमितांची नोंद झाली. महापालिका क्षेत्रासह जिल्ह्याच्या १४१ गावांमध्ये कोरोनाग्रस्त निष्पन्न झाले आहेत. मात्र, १,५४६ गावांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रभावी अंमल करून कोरोनाचा संसर्ग गाव वेशीवर रोखला असल्याची सुखद वार्ता आहे.

अमरावती महापालिका क्षेत्रात हाथीपुरा भागात ४ एप्रिलला जिल्ह्यातील पहिल्या कोरोना संक्रमित रुग्णाची नोंद झाली होती. त्यानंतर ग्रामीण भागात शिराळा येथे २ मे रोजी संक्रमित रुग्णाची नोंद करण्यात आली. जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, ग्रामीण भागात बुधवारपर्यंत १४१ गावांत ७७३ कोरोना संक्रमितांची नोंद झाली. त्यापैकी ३०६ जणांवर कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. ४३८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ग्रामीण भागात २९ संक्रमितांचे मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष शैलेश नवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अमोल येडगे यांच्या नेतृत्वात ‘अमरावतीकर, मात करूया कोरोनावर’ या मोहिमेंतर्गत , १४ पंचायत समिती, १० नगर परिषद, चार नगरपंचायतींमध्ये गाव व वॉर्डनिहाय वैद्यकीय अधिकारी, आशा, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून चार वेळा सर्वेक्षण करण्यात आले. गावात बाहेरून आलेल्या व्यक्ती तसेच सर्दी, ताप, खोकला, श्वसनाचा त्रास असलेल्या व्यक्तीचा नोंदी घेण्यात आल्यात. बाहेरून आलेल्या व्यक्तींना सक्तीने स्थानिक शाळा, वसतिगृह इमारतींमध्ये १४ दिवस क्वारंटाईन करून आजारी व्यक्तीशी वारंवार संपर्क साधण्यात आला. आवश्यक तेव्हा तालुका वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रांशी संपर्क साधून संबंधित व्यक्तींची तपासणी तसेच त्यापैकी आजारी व्यक्तींना आवश्कयतेनुसार स्वॅब टेस्टकरिता रेफर करणे यांसारख्या उपाययोजना गावोगावी करण्यात आल्याने जिल्ह्यातील १३ आॅगस्टपर्यत दीड हजार गावे कोरोनामुक्त आहेत. गावकऱ्यांची सकारात्मक वृत्ती, त्याला प्रशासनाची समर्थ अशी साथ मिळाल्याने जिल्हा ग्रामीणमध्ये कोरोना संसर्ग रोखण्यास मदत झाली.

नेमके काय केले?१४ तालुक्यांतील प्रत्येक गावात १६ मार्चपासून कोरोना सनियंत्रण व दक्षता समितीची स्थापना करण्यात आली.ग्रामस्तरीय कोरोना संनियंत्रण समितीद्वारे गावोगावी ’डोअर टू डोअर’ सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली.निर्जंतुकीरण करण्यासाठी धुरळणी व सोडियम हायपोक्लोराईडची नियमित फवारणी करण्यात आलीकोविड १९ चा संसर्ग गावात होऊ नये, याकरीता बाहेरील व्यक्तींना गावात प्रवेश करु नये यासाठी नाकाबंदी.प्रत्येक व्यक्तीने नियमित हात धुणे, सॅनिटायझर, साबण तसेच चेहºयाला मास्क लावणे सक्तीचे करण्यात आले.संसर्गापासून बचावासाठी जाहीर मुनादी, प्रसिध्दी पत्रक व ध्वनिक्षेपकाद्वारे प्रबोधन केले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या