शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

अमरावती - कचरा विलगीकरणाला एप्रिलची 'डेडलाईन', अनुदानावर गंडांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 16:14 IST

नगरविकास विभागाने महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींना कचरा विलगीकरणासाठी एप्रिल २०१८ ची 'डेडेलाईन' दिली आहे

प्रदीप भाकरेअमरावती : नगरविकास विभागाने महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींना कचरा विलगीकरणासाठी एप्रिल २०१८ ची 'डेडेलाईन' दिली आहे. कचरा विलगीकरणाचे ८० टक्के उद्दिष्ट साध्य न झाल्यास प्राधान्याने देण्यात येणारे अनुदान थांबविण्याची तंबी सरकारने दिल्याने या नागरी स्थानिक संस्थांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. अवघ्या दोन महिन्यांत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे.

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत स्वच्छतेच्या दृष्टीने शासनाकडून जोरकस प्रयत्न करण्यात येत आहे. याशिवाय राज्यातील अनेक शहरे स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये सहभागी झाले आहेत. मात्र, अनेक शहरे त्यात माघारल्याने शासनाने अनुदान थांबविण्याची तंबी दिली आहे. अनुदान थांबण्याची नामुष्की टाळायची असेल तर एप्रिल २०१८ अखेरपर्यंत शहरात निर्माण होणाºया कचºयापैकी किमान ८० टक्के कचरा निर्मितीच्या जागीच विलगीकरण करणे अनिवार्य केले आहे. याशिवाय शहरात निर्माण होणाºया कचºयापैकी निर्मितीच्या जागीच विलगीकरण केलेल्या कचºयापासून एप्रिलपर्यंत विकेंद्रित अथवा केंद्रित पद्धतीने कम्पोस्ट खत तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश आहेत. अमरावतीसह बहुतांश महापालिका व नगरपालिकांमध्ये कचरा विलगीकरणाची सुविधा उपलब्ध नसल्याने या आघाडीवर स्मशानशांतता आहे. या नागरी स्थानिक संस्थांकडे कचरा विलगीकरणासाठी पुरेसे मनुष्यबळ आणि साधनसामग्री नसल्याने प्रशासकीय प्रमुखांच्या चिंतेत भर पडली आहे.

मोहीम अयशस्वी स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी), घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ अंतर्गत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १ मे २०१७ पासून घनकचरा विलगीकरण मोहीम राबविण्याचे निर्देश नगरविकास विभागाने दिले होते. त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्याची आणि मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी निश्चित करण्यात आली होती. मात्र, काही शहरांकडून त्यास म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्याचे निरीक्षण राज्य शासनाने नोंदविले.

म्हणून कचरा विलगीकरण महत्त्वाचेघनकचºयाचे विलगीकरण केल्याशिवाय घनकचºयास मूल्य प्राप्त होत नाही. विलगीकरण न करता त्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प यशस्वी होत नाहीत. हे आतापर्यंत या क्षेत्रात उभारण्यात आलेल्या विविध प्रकल्पावरून लक्षात आल्याचे निरीक्षण नगरविकास विभागाने नोंदविले. ही बाब विचारात घेऊन घनकचरा निर्मितीच्या जागीच विलगीकरणाची मोहीम प्रभावीरित्या राबविण्याचे निर्देश राज्य शासनाने महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींना दिले आहेत. या मोहिमेंतर्गत ओला, सुका व घरगुती घातक कचºयाचे निर्मितीच्या जागीच विलगीकरण करून त्याची स्वतंत्र वाहतूक करणे अपेक्षित आहे.