शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

दुष्काळग्रस्तांना होळीपूर्वी मदत वाटप

By admin | Updated: February 25, 2015 00:26 IST

मागील वर्षातील खरीप हंगामात झालेल्या पिकांच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना जाहीर झालेल्या चार हजार आठशे तीन रुपयांच्या पॅकेजचे वाटप ७ मार्च पूर्वी ...

जिल्हाधिकाऱ्यांना प्रधान सचिवांचे आदेशअमरावती : मागील वर्षातील खरीप हंगामात झालेल्या पिकांच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना जाहीर झालेल्या चार हजार आठशे तीन रुपयांच्या पॅकेजचे वाटप ७ मार्च पूर्वी म्हणजेच होळीपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रीय यांनी घेतलेल्या २१ फेब्रुवारीच्या बैठकीत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हे आदेश देण्यात आले. ही मदत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करुन त्यातून शासकीय थकबाकीची वसुली करू नये, असेही निर्देश आहेत. शेतकऱ्यांना आता जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ही मदत कशी द्यावी, यासंदर्भातही राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. विभागीय आयुक्तांकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तहसीलदारांना निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. खात्यामध्ये मदतीची रक्कम जमा झाल्यानंतर त्यांना गरजेनुसार रक्कम काढता यावी, यासाठी सर्व बँकांना शाखांमध्ये पुरेशी रोख रक्कम उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बँकांमध्ये खाते नसलेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत बँक खाते उघडण्यास सूचित करण्यात आले आहे. मदत वाटप आढावा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने घेण्याचे निर्देशही या बैठकीत देण्यात आलेत. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी स्तरावर पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील निधी शेतकऱ्यांना वेळेवर कसा देता येईल, यावर प्रशासनाने भर द्यावा आणि ही आर्थिक मदत ७ मार्चपूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हा प्रशासनाला प्रधान सचिवांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)