शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
4
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
5
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
6
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
7
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
8
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
9
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
10
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
11
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
12
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
13
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
14
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
15
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
16
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
17
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
18
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
19
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
20
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर

दुष्काळग्रस्तांना होळीपूर्वी मदत वाटप

By admin | Updated: February 25, 2015 00:26 IST

मागील वर्षातील खरीप हंगामात झालेल्या पिकांच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना जाहीर झालेल्या चार हजार आठशे तीन रुपयांच्या पॅकेजचे वाटप ७ मार्च पूर्वी ...

जिल्हाधिकाऱ्यांना प्रधान सचिवांचे आदेशअमरावती : मागील वर्षातील खरीप हंगामात झालेल्या पिकांच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना जाहीर झालेल्या चार हजार आठशे तीन रुपयांच्या पॅकेजचे वाटप ७ मार्च पूर्वी म्हणजेच होळीपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रीय यांनी घेतलेल्या २१ फेब्रुवारीच्या बैठकीत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हे आदेश देण्यात आले. ही मदत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करुन त्यातून शासकीय थकबाकीची वसुली करू नये, असेही निर्देश आहेत. शेतकऱ्यांना आता जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ही मदत कशी द्यावी, यासंदर्भातही राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. विभागीय आयुक्तांकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तहसीलदारांना निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. खात्यामध्ये मदतीची रक्कम जमा झाल्यानंतर त्यांना गरजेनुसार रक्कम काढता यावी, यासाठी सर्व बँकांना शाखांमध्ये पुरेशी रोख रक्कम उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बँकांमध्ये खाते नसलेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत बँक खाते उघडण्यास सूचित करण्यात आले आहे. मदत वाटप आढावा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने घेण्याचे निर्देशही या बैठकीत देण्यात आलेत. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी स्तरावर पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील निधी शेतकऱ्यांना वेळेवर कसा देता येईल, यावर प्रशासनाने भर द्यावा आणि ही आर्थिक मदत ७ मार्चपूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हा प्रशासनाला प्रधान सचिवांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)