शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘लम्पी’च्या पार्श्वभूमीवर व्याघ्र प्रकल्पात अलर्ट, वन्यजीवांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना

By गणेश वासनिक | Updated: September 20, 2022 19:19 IST

राज्यात सहा व्याघ्र प्रकल्पांसह अभयारण्यातील वन्यजीवांबाबतही ‘लम्पी’ या संसर्गाने शिरकाव करू नये, यासाठी वनाधिकारी, कर्मचाऱ्यांना टिप्स देण्यात आल्या आहेत.

अमरावती - राज्यात जनावरांना ‘लम्पी’ या संसर्गाने ग्रासल्यामुळे आतापर्यत हजारो पशू दगावले आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी जनावरांना युद्धस्तरावर लसीकरण दिले जात आहे. मात्र, ‘लम्पी’ हा व्याघ्र प्रकल्पात पोहोचू नये, यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. वाघ, बिबट, हरीण, काळवीट, रानगवा आदी वन्यजीवांपर्यंत हा संसर्ग पोहोचणार नाही, याबाबत मायक्रो प्लॅनिंग करण्यात आले आहे.

राज्यात सहा व्याघ्र प्रकल्पांसह अभयारण्यातील वन्यजीवांबाबतही ‘लम्पी’ या संसर्गाने शिरकाव करू नये, यासाठी वनाधिकारी, कर्मचाऱ्यांना टिप्स देण्यात आल्या आहेत. व्याघ्र प्रकल्पानजीकची गावे, खेड्यातील भटक्या श्वानांवर करडी नजर ठेवली आहे. ‘लम्पी’ या संसर्गाने दगावलेल्या पशुंच्या संपर्कातील भटकी श्वान, शेळी वा मेंढी ही व्याघ्र प्रकल्पात जाणार नाही, याबाबत व्याघ्र प्रकल्पाने दक्षता घेतली आहे. व्याघ्र प्रकल्पातील वाघ, बिबट्याच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवल्या जात आहे. 

वन्यजीवांवर त्वचा रोग वा कातडीवर वेगळे काही डाग तर नाही ना? याबाबत ट्रॅप कॅमेऱ्यातून तपासले जात आहे. त्याकरिता पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत वन विभाग घेत आहे. ताडोबा, मेळघाट, बोर, टिपेश्वर, काटेपूर्णा, पेंच, ज्ञानगंगा, सह्याद्री आदी अभयारण्यात ‘लम्पी’च्या पार्श्वभूमीवर अलर्ट करण्यात आले आहे.

भटकी श्वान, ‘लम्पी’ संसर्ग जनावरे लक्ष्य

व्याघ्र प्रकल्प असो वा अभयारण्य असो या भागात गाव, खेड्यातून येणाऱ्या भटक्या श्वानांवर वन कर्मचारी करडी नजर ठेवून आहेत. व्याघ्र प्रकल्पात कळत नकळत भटक्या श्वानांचा आतमध्ये प्रवेश होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे.  व्याघ्र प्रकल्पांच्या सीमेवर गस्त वाढविली आहे. तसेच ‘लम्पी’ संसर्गाने ग्रासलेल्या जनावरांवरही पाळत ठेवली जात आहे. 

राज्यात जनावरांना लम्पी आजाराने ग्रासले आहे. ही बाब गंभीर असून, व्याघ्र प्रकल्पात हा संसर्ग पोहोचू नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. वाघ, बिबट, हरीण, काळवीट, रानगवा यासह अन्य वन्यजीवांना बाधा होणार नाही, यासाठी वन कर्मचाऱ्यांना अलर्ट केले आहे.- सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) 

टॅग्स :Lumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोगAmravatiअमरावती