शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

‘लम्पी’च्या पार्श्वभूमीवर व्याघ्र प्रकल्पात अलर्ट; संसर्ग टाळण्यासाठी लगतच्या खेड्यातील श्वानांवर करडी नजर

By गणेश वासनिक | Updated: September 21, 2022 14:08 IST

वन्यजीवांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना

अमरावती : राज्यात ‘लम्पी’च्या संसर्गाने ग्रासल्यामुळे आतापर्यंत हजारो जनावरे दगावली आहेत. संसर्ग रोखण्यासाठी जनावरांना युद्धस्तरावर लसीकरण केले जात आहे. वाघांची सुरक्षाही ऐरणीवर आली आहे. ‘लम्पी’ हा आजार व्याघ्र प्रकल्पात पोहोचू नये, यासाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाघ, बिबट, हरिण, काळवीट, रानगवा आदी वन्यजीवांपर्यंत हा संसर्ग पोहोचणार नाही, याबाबत मायक्रो प्लॅनिंग करण्यात आले आहे.

राज्यात सहा व्याघ्र प्रकल्पांसह अभयारण्यातील वन्यजीवांना ‘लम्पी’चा संसर्ग होऊ नये, यासाठी वनाधिकारी, कर्मचाऱ्यांना टिप्स देण्यात आल्या आहेत. व्याघ्र प्रकल्पानजीकची गावे, खेड्यातील भटक्या श्वानांवर करडी नजर ठेवली आहे. ‘लम्पी’ने दगावलेल्या पशूंच्या संपर्कातील भटके श्वान, शेळी वा मेंढी ही व्याघ्र प्रकल्पात जाणार नाही, याबाबत व्याघ्र प्रकल्पाने दक्षता घेतली आहे. व्याघ्र प्रकल्पातील वाघ, बिबट्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

वन्यजीवांवर त्वचारोग वा कातडीवर वेगळे काही डाग तर नाही ना? याबाबत ट्रॅप कॅमेऱ्यातून तपासले जात आहे. त्याकरिता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत वनविभाग घेत आहे. ताडोबा, मेळघाट, बोर, टिपेश्वर, काटेपूर्णा, पेंच, ज्ञानगंगा, सह्याद्री आदी अभयारण्यात ‘लम्पी’च्या पार्श्वभूमीवर अलर्ट करण्यात आले आहे.

राज्यात जनावरांना लम्पी आजाराने ग्रासले आहे. ही बाब गंभीर असून, व्याघ्र प्रकल्पात हा संसर्ग पोहोचू नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. वाघ, बिबट, हरीण, काळवीट, रानगवा यांसह अन्य वन्यजीवांना बाधा होणार नाही, यासाठी वन कर्मचाऱ्यांना अलर्ट केले आहे.

- सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

टॅग्स :Lumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोगenvironmentपर्यावरण