शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

‘लम्पी’च्या पार्श्वभूमीवर व्याघ्र प्रकल्पात अलर्ट; संसर्ग टाळण्यासाठी लगतच्या खेड्यातील श्वानांवर करडी नजर

By गणेश वासनिक | Updated: September 21, 2022 14:08 IST

वन्यजीवांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना

अमरावती : राज्यात ‘लम्पी’च्या संसर्गाने ग्रासल्यामुळे आतापर्यंत हजारो जनावरे दगावली आहेत. संसर्ग रोखण्यासाठी जनावरांना युद्धस्तरावर लसीकरण केले जात आहे. वाघांची सुरक्षाही ऐरणीवर आली आहे. ‘लम्पी’ हा आजार व्याघ्र प्रकल्पात पोहोचू नये, यासाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाघ, बिबट, हरिण, काळवीट, रानगवा आदी वन्यजीवांपर्यंत हा संसर्ग पोहोचणार नाही, याबाबत मायक्रो प्लॅनिंग करण्यात आले आहे.

राज्यात सहा व्याघ्र प्रकल्पांसह अभयारण्यातील वन्यजीवांना ‘लम्पी’चा संसर्ग होऊ नये, यासाठी वनाधिकारी, कर्मचाऱ्यांना टिप्स देण्यात आल्या आहेत. व्याघ्र प्रकल्पानजीकची गावे, खेड्यातील भटक्या श्वानांवर करडी नजर ठेवली आहे. ‘लम्पी’ने दगावलेल्या पशूंच्या संपर्कातील भटके श्वान, शेळी वा मेंढी ही व्याघ्र प्रकल्पात जाणार नाही, याबाबत व्याघ्र प्रकल्पाने दक्षता घेतली आहे. व्याघ्र प्रकल्पातील वाघ, बिबट्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

वन्यजीवांवर त्वचारोग वा कातडीवर वेगळे काही डाग तर नाही ना? याबाबत ट्रॅप कॅमेऱ्यातून तपासले जात आहे. त्याकरिता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत वनविभाग घेत आहे. ताडोबा, मेळघाट, बोर, टिपेश्वर, काटेपूर्णा, पेंच, ज्ञानगंगा, सह्याद्री आदी अभयारण्यात ‘लम्पी’च्या पार्श्वभूमीवर अलर्ट करण्यात आले आहे.

राज्यात जनावरांना लम्पी आजाराने ग्रासले आहे. ही बाब गंभीर असून, व्याघ्र प्रकल्पात हा संसर्ग पोहोचू नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. वाघ, बिबट, हरीण, काळवीट, रानगवा यांसह अन्य वन्यजीवांना बाधा होणार नाही, यासाठी वन कर्मचाऱ्यांना अलर्ट केले आहे.

- सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

टॅग्स :Lumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोगenvironmentपर्यावरण