शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
2
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
3
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...
4
Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
5
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
6
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
7
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले
8
षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; ५०० रूपयांत दहशतवादी मसूद अजहरची बहीण चालवतेय कोर्स
9
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
10
तब्बल ५५०० किलो सोन्यातून उजळले भगवान बुद्ध; एका चुकीने उलगडलं कित्येक दशक दडलेले 'रहस्य'?
11
"अक्षय कुमार सध्या डिप्रेशनमध्ये आहे, कारण..."; 'हेरा फेरी'चे दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा मोठा खुलासा
12
शौक बड़ी चीज है! दृष्टी गमावताच डोळ्यात बसवला २ कॅरेटचा हिरा, रंगली तुफान चर्चा
13
‘निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आमदारांना निधीच्या रूपात वाटली जातेय खैरात’, काँग्रेसचा आरोप
14
मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
15
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
16
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
17
अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
18
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
19
फ्रान्सच्या संग्रहालयात 'धूम' स्टाईल चोरी; ८०० कोटींचे दागिने घेऊन चोर फरार; ७ मिनिटांत झाला 'गेम'
20
आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...

भंगार बसेसमुळे वायुप्रदूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 01:33 IST

काळा गडद धूर ओकत धावणाऱ्या नादुरुस्त बसेसमुळे शहरात मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण होत आहे. नादुरुस्त बसेस रस्त्यावर धावत असल्याने निघणाºया काळ्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा बसेसवर नियंत्रण कुणाचे, असा सवाल नागरिकांचा आहे.

ठळक मुद्देनागरिकांचे आरोग्य धोक्यात : प्रशासनाला केव्हा येणार जाग?

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : काळा गडद धूर ओकत धावणाऱ्या नादुरुस्त बसेसमुळे शहरात मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण होत आहे. नादुरुस्त बसेस रस्त्यावर धावत असल्याने निघणाºया काळ्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा बसेसवर नियंत्रण कुणाचे, असा सवाल नागरिकांचा आहे.जड वाहने, ट्रक, इतर खासगी वाहनांतून वायूप्रदूषण होत आहे. परंतु १५ वर्षे सतत चाललेल्या परिवहन महामंडळाच्या नादुरुस्त व भंगार बसेस स्क्रॅप करायला हव्या आहेत. तसा नियमदेखील आहे. मात्र, १० लाख किमी अंतर कापल्यानंतरही त्या बसेस रस्त्यावर चालविण्याचा प्रताप महामंडळ प्रशासन करीत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे शहरातील प्रदूषण थांबविण्याकरिता कचरा जाळण्यावर दंडात्मक कारवाईची तरतूद असताना दुसरीकडे या भंगार बसेस राजरोस काळा धूर सोडून शहरातील वातावरण दूषित करीत आहे. याकडे प्रशासनाची नजर का जाऊ नये, असा सवाल नागरिकांचा आहे. काळा धूर आरोग्यास घातक आहे. यातून श्वसनलिकेसंदर्भातील आजार उद्भवत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. जिल्ह्यात एकूण ४५० बसेस सेवेत आहेत. त्यापैकी ५० ते ६० बसेस भंगार झाल्या आहेत. त्या बसेसच्या फेºया मध्यवर्ती आगारातून होत असल्याने काळा धूर ओकत त्यांचा प्रवास सुरू आहे. सोमवारी सकाळी १०.३० वाजता दरम्यान परतवाडा आगाराची एमएच ०७ सी ७१४० क्रमांकाची बस गाडगेनगर चौकातून अमरावती आगारात जात असताना काळा धूर ओकत राजरोजसपणे धावत होती. सायलन्सरमधून निघणाºया काळ्या धुरामुळे वातावरण दूषित होत होते. रोज अशा अनेक बसेस धावत असताना प्रशासन कारवाई केव्हा करणार? व भंगार बसेस रस्त्यावर धावणे केव्हा थांबणार, असा सवाल जिल्ह्यातील नागरिकांचा आहे.प्रत्येक बसेसची तपासणीराज्य महामार्ग परिवहन विभागाच्या प्रत्येक बसेस पासिंगसाठी आरटीओत आणल्या जातात. अ‍ॅटोमॅटिक यंत्राव्दारे तपासणी केली जाते. पीयूसी, ब्रेक, लाईट, इंडिकेटर,इंजीनची तपासणी केली जाते तरही भंगार बसेस धूर ओकत रस्त्यावर धावतात कशा, असा सवाल नागरिकांचा आहे.श्वसनाच्या आजारात वाढवायूप्रदूषणामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे श्वसनाचा आजार बळावतो. प्रदूषणामुळे व्यक्तींच्या संपूर्ण शरीरावर व मनावर विपरीत परिणाम होतो. याची लक्ष्णे स्पष्ट दिसत नसली तरी त्याचा परिणाम कित्येक वर्षे हळूहळू होत राहतो, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :state transportएसटीpollutionप्रदूषण