शहरं
Join us  
Trending Stories
1
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
2
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
3
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
4
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
5
"कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय?
6
BMC Elections: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
7
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
8
जागा शिंदेसेनेला सुटली, धनुष्यबाणावर लढण्याची ऑफरही आली, पण..., भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्तीने घेतला मोठा निर्णय  
9
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? सावधान! सेबीने दिला इशारा; तुमचे पैसे अडकण्याची भीती
10
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
11
सोलापुरात अभूतपूर्व गोंधळ! भाजपाचे एबी फॉर्म वेळेत न पोहचल्याने संताप, विरोधकांचा दारातच ठिय्या
12
Anjel Chakma : खळबळजनक! बर्थडे पार्टी, शिवीगाळ अन्... एंजेल चकमा हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
13
सौदी अरेबियानं UAE च्या जहाजांना का केले उद्ध्वस्त?; २४ तासांचा अल्टिमेटम, २ मित्र बनले शत्रू
14
सावधान! 'हॅप्पी न्यू इयर' म्हणण्यापूर्वी १० वेळा विचार करा; एका क्लिकमुळे बँक खातं होईल रिकामं
15
निष्ठवंतांनंतर संभाजीनगर भाजप कार्यालयात रिपाइंचा 'रुद्रावतार'! कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
16
काका-पुतण्याची आघाडी; परभणीत राष्ट्रवादी अ.प. ५७ तर राष्ट्रवादी श.प. ८ जागा लढणार
17
Pisces Yearly Horoscope 2026: मीन राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रेमाचे आणि प्रगतीचे वर्ष; परदेश प्रवासासह उत्पन्नात होणार मोठी वाढ!
18
पत्नी असावी तर अशी! BMC निवडणूक लढवणाऱ्या समाधान सरवणकरांना तेजस्विनीची साथ, अभिनेत्रीचं होतंय कौतुक
19
‘मुंबई मनपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष पूर्ण क्षमतेने आणि ताकदीने उमेदवार उतरवणार’, सुनिल तटकरे यांची घोषणा
20
लक्ष्मी नारायण विपरीत राजयोग: ‘या’ राशी ठरतील लकी, मनासारखे घडेल; सुबत्ता-कल्याण-मंगळ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती ते मुंबई एअर अलायन्सची विमानसेवा ठप्प ; हैदराबादचीही काही दिवस राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 13:17 IST

Amravati : 'ऑपरेशन इश्श्यू'च्या नावाखाली विमानसेवा थांबली, प्रवाशांचे नियोजन कोलमडले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत सुरू झालेली अमरावती ते मुंबई एअर अलायन्सची विमानसेवा तूर्तास बंद झाली आहे. विमानात तांत्रिक बिघाड आल्यामुळे अमरावतीसह हैदराबादचीही विमानसेवा बंद करण्यात आल्याची माहिती आहे. १ किंवा १५ सप्टेंबर २०२५ पासून एअर अलायन्स सेवा सुरू होईल, अशी सूत्रांची माहिती आहे.

अमरावती विमानतळाहून १६ एप्रिल २०२५ रोजी एअर अलायन्सचे मुंबईकडे पहिले प्रवासी विमान झेपावले होते. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे आठवड्यातून तीन दिवस मुंबई-अमरावती- मुंबई ही विमानसेवा सुरू आहे. मध्यंतरी वातावरण खराब झाल्यामुळे अमरावती ते मुंबईदरम्यान काही विमानफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. मात्र, २१ ऑगस्टपासून अमरावती-मुंबई एअर अलायन्सची विमानसेवा बंद झाली आहे.

एअर अलायन्सच्या विमानात तांत्रिक बिघाडाची युद्धस्तरावर दुरुस्ती सुरू आहे. एअर अलायन्सचे हैदराबाद ते मुंबई ही विमानसेवा तूर्तास रद्द करण्यात आली आहे. मात्र, २१ ऑगस्टपासून विमानप्रवास करणाऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. 'ऑपरेशन इश्श्यू'च्या नावाखाली विमानसेवा थांबली असली तरी एअर अलायन्सच्या विमानात मोठा बिघाड झाल्याची माहिती आहे. मुंबई ते अमरावती, मुंबई ते हैदराबाद या विमानफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. या संदर्भात अमरावतीच्या विमानतळ अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता 'नो कॉमेंट्स' असे उत्तर मिळाले, हे विशेष.

मुंबईकडे ५० ते ६० प्रवाशांचे बुकिंगएअर अलायन्स विमानाने अमरावती ते मुंबईकडे ये-जा करणाऱ्यांची संख्या ५० ते ६० एवढी असते. साधारणतः विमान बुकिंगची अशीच आकडेवारी आहे. त्यामुळे मुंबई-अमरावती विमानसेवा सुरळीत सुरू असल्याचे चित्र आहे. ७२ एटीआर ही विमानसेवा असून ३५०० ते ४००० यादरम्यान प्रतिप्रवासी तिकीट दर आकारले जाते. मात्र, विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे १० दिवस विमानसेवेला ब्रेक लागणार आहे.

"मुंबई-अमरावती-मुंबई ही एअर अलायन्सची विमानसेवा सुरळीत व्हावी, यासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजारापु राममोहन नायडू यांना २८ ऑगस्ट रोजी पत्रवजा मेल पाठविला आहे. हे एकच विमान आठवड्यातून तीन फेऱ्या करते. त्यामुळे या हवाईमार्गावर सुसज्ज आणि नवीन विमान मिळावे, अशी मागणी केली आहे."- बळवंत वानखडे, खासदार, अमरावती

टॅग्स :AmravatiअमरावतीMumbaiमुंबई