शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आगडोंब.... आक्रोश अन् आकांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 01:13 IST

वलगाव स्थित बाजारपुऱ्यातील आगडोंब उडाल्याने ग्रामस्थांचा एकच आक्रोश, आकांत व आक्रमकता पाहायला मिळाली. अन्नधान्यांसह लाखोंची रोख, दागदागिने व घरगुती साहित्य, असे सर्वच आगीने विळख्यात घेतले.  घामाघूम झालेल्या रहिवाशांच्या चेहºयावरील आक्रोश व आक्रमकता पाहून समाजमन सुन्न झाले. 

ठळक मुद्देहादरले समाजमन३७ कुटुंबीयांचे संसार उघड्यावरआगग्रस्त परिवाराला उर्दू शाळेत आश्रयआयुष्याची पुंजी गमावल्याची व्यथा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वलगाव स्थित बाजारपुऱ्यातील आगडोंब उडाल्याने ग्रामस्थांचा एकच आक्रोश, आकांत व आक्रमकता पाहायला मिळाली. अन्नधान्यांसह लाखोंची रोख, दागदागिने व घरगुती साहित्य, असे सर्वच आगीने विळख्यात घेतले.  घामाघूम झालेल्या रहिवाशांच्या चेहऱ्यावरील आक्रोश व आक्रमकता पाहून समाजमन सुन्न झाले. आगीचे रौद्ररुप पाहून रहिवाशांना आपल्या घरातील मूलभूत साहित्यांसह  मौल्यवान वस्तूदेखील वाचविता आले नाही. गॅस सिलिंडर, रोख, दागदागिने, अन्नधान्यांसह घरगुती साहित्य आगीत जळताना पाहून रहिवाशांनी आकांततांडव केला. महिलांच्या डोळ्यातून अश्रुधारा, तर पुरुषांच्या चेहºयावर आक्रमकता दिसून आली. संसार उघड्यावर आल्याने नागरिकांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला. काही कुटुंबांत मुला-मुलींच्या लग्नाची, तर काहींच्या साक्षगंधाच्या सोहळ्याची तयारी सुरू असतानाच आगीचे हे मोठे विघ्न आले. हा थरार तेथील आगग्रस्त उघड्या डोळ्याने पाहत होते. परंतु ते कसे वाचविणार, प्रश्न त्यांना पडला होता. त्यामुळे आयुष्यात कमावलेल्या पुंजीचे काय होणार, अशी भीती काहीकाळ निर्माण झाली. राखरांगोळी झालेल्या घरातील साहित्यांकडे पाहून अक्षरश: रहिवासी ओक्साबोक्सा रडत होते. कुटुंबातील सदस्य एकमेकांचे सांत्वन करीत जळालेल्या साहित्यांना न्याहाळत होते. बाजारपुºयातील ही भयावह स्थिती पाहून शासकीय अधिकारी व राजकीय नेत्यांचीही भंबेरी उडाली होती. आग लागल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांना मिळताच त्यांनी घटनास्थळाला भेट दिली.  आजीचे किराणा दुकानही जळालेपोटाची खळगी भरण्याकरिता पुनर्वसनासाठी परिसरात राहत असलेल्या कुटंबीयांकरिता प्रेमीका पंजाबराव करगेड या वृद्धाने किराणा दुकान थाटले होते. यावर तिच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालत होता. अचानक आग लागल्याने आजीच्या दुकानातील एक लाखांचा किरणा जळून खाक झाला. हे सर्व उघड्या डोळ्याने पाहताना त्यांचे डोळे पणावले. आता जगायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला होता.  या कुटुंबीयांची जळाली घरेआगीच्या भक्षस्थानी सापडलेल्या कुटुंबीयांमध्ये रामाजी दशरथ वानखडे, विनोद पंजाब खोरगडे, शाम जयराज सोळंके, निस्सार अली मुजफर अली, बाळू शिवरामजी आठवले, गणेश मारोती उगले, चंदू लक्ष्मण भगत, शिवदास काशीराम साबळे, माधव चंपत माहाखेडे, धर्मपाल मेश्राम व गंगुबाई मेश्राम, पंचफुला व्यंकटराव गडलिंग, रमेश रामकृष्ण गवई, अश्विन अशोक वानखडे, गणेश रामकृष्ण गवई, निर्मला किरण डोंगरे, कंचन रामदास नन्नावरे, प्रकाश नामदेव सिरसाट, मनोज साहेब वाघमारे, राजाराम गणेश चौधरी, गजानन देविदास तलवारे, नरेश दशरथ वानखडे, हिराचंद शेखर निचड, बाबाराव मारोती उगले, सैय्यद अब्दुल सैय्यद वकील, सिंदुबाई देविदास तलवारे, सुलोचना व्यकंटराव अवर, दिलीप प्रल्हाद मुंडे, लिलाबाई हरिदास गंडलिग, वच्छलाबाई प्रल्हाद मुंडे, वंदना जितेंद्र ऊर्फ मच्छिंद्र गडलिंग, शोभा देविदास डोंगरे, रचना विजय चोरपगारे, रामदास वामन गायकवाड यांचा समावेश आहे. अन्नधान्यांसह लाखोंची रोख, दागिने आगीच्या भक्ष्यस्थानीबाजारपुऱ्यातील ३७ कुटुंबीयांपैकी काहींनी घरातील रोख व दागदागिने वाचविण्यात यश मिळविले. मात्र, राजकन्या वानखडे यांच्या घरातील ६० हजारांची रोख, मुलीच्या साक्षगंधासाठी गोळा केलेले सोन्याचे दागिने जळाले. तसेच शहाना बानो इस्सार अली यांच्या घरातील लग्नाचे सोन्या-चांदीचे दागिने व भिसीचे दोन लाख रुपये आगीत खाक झाले. हीच स्थिती त्या ३७ कुटुंबातील अनेकांची आहे. 

टॅग्स :fireआग