शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

रवी राणांच्या दिलगिरीनंतर बच्चू कडूंनी आपली भूमिका केली स्पष्ट, म्हणाले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2022 15:19 IST

बच्चू कडू काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं

अमरावती : गेल्या काही काळापासून जिल्ह्यातील दोन नेते आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा यांच्यात राजकीय युद्ध सुरू होते. एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. त्यांच्यातील वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर पडदा पडला. कडू यांच्याविषयी केलेल्या विधानांबद्दल राणा यांनी दिलगिरी व्यक्त केली. यानंतर, आज प्रहारच्या कार्यकारी मेळाव्यात बच्चू कडू आपली भूमिका स्पष्ट करणार होते. याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. 

बच्चू कडू यांनी मेळाव्यात बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. पहिली वेळ म्हणून माफ केलं, परंतु, यापुढे आमच्या वाटेला गेल्यास माफ करणार नाही, असे कडू म्हणाले. यासह सहन झालं नाही तर सोडून जाऊ पण सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी कुणाचे नाव न घेता दिला. प्रहार हा काही आंडूपाडूंचा पक्ष नाही. आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही आणि गेलो तर कोथळा काढतो, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. आजचा कार्यक्रम शक्तीप्रदर्शन नाही. इथल्या गर्दीत सगळे दर्दी आहेत, असेही ते म्हणाले. 

आज अमरावतीच्या नेहरू मैदानात प्रहार संघटनेचा कार्यकारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या ठिकाणी राज्यभरातून प्रहारचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले. दरम्यान, मेळाव्याच्या ठिकाणी 'मै झुकेगा नही'च्या पोस्टरनी चर्चांना उधाण आलं. प्रहार इतर पक्षांपेक्षा वेगळा आहे. आज प्रहार उभी असले तर ती फक्त कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर उभी आहे, असे कडू म्हणाले. जिथं दु:ख, वेदना असेल तिथे नातं निर्माण करा, असे आवाहन बच्चू कडूंनी कार्यकर्त्यांना केलं. 

महाराषट्रातील एकही कोपरा सोडला नाही.

लोकांसाठी काम करताना संपूर्ण राज्यभर दौरे केले, एकही कोपरा सोडला नाही. राजकारणासाठी दिव्यांगाचा वापर केला नाही. ज्याला डोळे नाही त्यांचे डोळे होता येईल का, ज्यांना पाय नाही त्यांचे आधार होता येईल का यासाठी कार्य केलं. राजकारणासाठी त्यांचा वापर कधीच केला नाही, असेही कडू म्हणाले.

गरिबांच कार्ट अन् मोठ्यांचा साहेब

आज सगळ्या पक्षात बंडखोर आहेत आणि जे बंडखोर आहेत तेच पहिला रांगेत आहेत. निर्णय कडू असले तरी काम गोड व्हायला हवं, असं कडू म्हणाले. यासोबतचं गरिबांच ते कार्ट अन् मोठ्यांचा तो साहेब असा मिश्किल टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूPoliticsराजकारणRavi Ranaरवी राणा