शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मरण यातनाढोक कुटुंबाची व्यथा : तीन मुलींच्या संगोपनाचा पत्नीसमोर प्रश्न

By admin | Updated: April 26, 2015 00:20 IST

रात्रीचा दिवस करून श्रम केले, कर्ज घेतले. पीक उगवेल आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागेल, ...

संजय खासबागे वरुडरात्रीचा दिवस करून श्रम केले, कर्ज घेतले. पीक उगवेल आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागेल, अशी आशा होती. परंतु निसर्ग रूष्ट झाला आणि सारी स्वप्ने मातीमोल झाली. ऋणदात्यांचा तगादा सुरू झाला. शेवटी हतबल झालेल्या ‘त्या’ बळीराजाने आत्महत्येचा मार्ग पत्करला. संसाराच्या रहाटगाडग्यातून त्याची मुक्तता झाली. पण, मागे राहिलेल्या तीन मुली आणि पत्नीच्या दुर्देवाचे दशावतार आता सुरू झाले आहेत. वरूड तालुक्यातील खानापूर येथील शिवहरी वामनराव ढोक या े(४५) वर्षीय शेतकऱ्याने हातचे पीक गेल्याने ५ एप्रिल रोजी आपली जीवनयात्रा संपविली. शिवहरीच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर कुठाराघात झाला. त्यांच्यावर अवलंबून असलेल्या असलेल्या तीन मुली आणि पत्नीची मात्र वाताहत सुरू आहे. घरातील कर्त्या पुरूषाच्या मृत्यूनंतर हे अख्खे कुटुंब वाऱ्यावर आले आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे या चौघी मायलेकींजवळ हक्काचा निवारादेखील नाही. ज्या घरात सध्या त्यांचे वास्तव्य आहे ते घर रिकामे करण्याचा तगादा घरमालकाने लावला आहे. या कुटुंबातील अन्नधान्याला केव्हाचे बूड लागले आहे. मात्र, शासकीय अधिकाऱ्यांनी या कुटुंबाला भेटी देऊन केवळ तांदूळ आणि गहू देऊन त्यांची बोळवण केली. घरधनी गेला, आता तीन मुलींचा सांभाळ कसा करावा, असा प्रश्न शिवहरींच्या विधवा पत्नी रमाबाई यांच्यापुढे उभा ठाकला आहे. शिवहरींच्या मृत्यूला महिना लोटत आला तरी मदत मिळण्याचे संकेत नाहीत. शिवहरी ढोक यांची मोठी मुलगी डिंपल बीएला तर श्वेता इयत्ता १० वीत आणि संपदा ६ वीत शिकत आहे. नापिकीमुळे घरात अठराविश्वे दारिद्र्य आहे. याच काळजीपोटी आणि खासगी फायनान्स संस्थांचे कर्ज कसे फेडावे? या विचारातून आलेल्या नैराश्यातून शिवहरींनी मृत्यूला कवटाळले. त्यांचे स्वत:चे राहते घर पावसाळयात जमीनदोस्त झाले. दुसऱ्याच्या घरात संसार थाटला, त्यांच्याकडे केवळ अडीच एकर कोरडवाहू शेती. यामध्ये कपाशी आणि तूर पेरली. मात्र, निसर्गाने साथ दिली नाही. कपाशी बुडाली. कुटुंबाच्या डोक्यावर छप्पर असावे, म्हणून घरबांधणीसाठी त्यांनी फायनान्स कंपनीचे कर्ज घेतले. नापिकीमुळे हे कर्ज त्यांना फेडता आले नाही. शासनाकडून नापिकीची रक्कम मिळाली तीदेखील अवघी दोन हजार ४०० रुपये. यामुळे ते नैराश्यात गेले आणि त्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला. शिवहरी गेले. पण, त्यांच्या अंत्यसंस्काराची सोयदेखील त्यांच्या कुटुंबीयांजवळ नव्हती. शेजाऱ्यांच्या आणि नातलगांच्या मदतीतून अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर शासनाच्या बड्या अधिकाऱ्यांनी ढोक कुटुंबाचे सांत्वन करुन ५० किलो गहू आणि तांदूळ दिले. त्यानंतर आतापर्यंत या कुुटुंबाला कोणतीच मदत मिळालेली नाही. मृत शिवहरी ढोक यांच्याकडे कर्ज वसुलीकरिता रात्री-बेरात्री चकरा मारणाऱ्या फायनान्स कंपनीच्या वसुली प्रतिनिधीने नाकी नऊ आणले होते. त्या फायनान्स कंपनीविरुध्द अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली, याची माहिती नाही. खासदारांनी दिली अवघ्या पाच हजारांची मदत वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामदास तडस यांनी ढोक कुटुंबाला अवघ्या पाच हजारांची मदत देऊन सांत्वन केले. या कुटुंबातील मृताची पत्नी आणि तीन मुलींची विदारक अवस्था पाहून पाच हजारांची मदत केली. जायन्टस ग्रुपने घेतली मुलीच्या शिक्षणाची जबाबदारीवरूडच्या जायन्ट्स ग्रुपचे अध्यक्ष मनोहर आंडे यांनी ढोक कुटुंबाची झालेली दयनीय अवस्था पाहून रोख दहा हजार रुपयांची मदत केली. एका मुलीच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली. यामुळे तूर्तास या कुटुंबाला दिलासा मिळाला असला तरी शासनाची मदत अद्यापही प्राप्त झालेली नाही, ही शोकांतिका आहे. शासनाकडून शेतकरी आत्महत्येचा अहवाल पाठविण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री निधीतूनही मदतीकरिता अहवाल सादर करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात हे प्रकरण प्रविष्ठ आहे. समितीची बैठक झाल्यानंतर ढोक कुटुंबाला मदत प्राप्त होईल. - ललितकुमार वऱ्हाडे, उपविभागीय अधिकारी.