शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

दीड महिन्यानंतर शाळेत शिजली पोषण आहाराची खिचडी

By जितेंद्र दखने | Updated: March 25, 2023 12:55 IST

तांदळाचा पुरवठा : २,३८८ शाळांत पोहोचला आहार

अमरावती : इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिला जाणारा पोषण आहाराचा पुरवठा करार संपल्यामुळे विद्यार्थ्यांना पोषण आहारात दिली जाणारी खिचडी शिजणे बंद झाले होते. अखेर दीड महिन्यानंतर जिल्ह्यातील २ हजार ३८८ शाळांमध्ये पोषण आहाराचा शिधा पोहोचल्याने पोषण आहारातील खिचडी शिजू लागली आहे.

जिल्ह्यातील २ हजार ३८८ शाळांना गत १ फेब्रुवारीपासून तर १५ मार्चपर्यत आहाराकरिता तांदळाचा पुरवठाच झाला नव्हता. त्यामुळे याबाबतचा शाळांनी जिल्हा परिषदेला पाठविला होता. याकरिता शिक्षण विभागाचाही शासनस्तरावर पाठपुरावा सुरू होता. अखेर आता पुरवठादारासोबत करार झाल्यामुळे १६ मार्चपासून जिल्हाभरातील शाळांमध्ये पोषण आहाराकरिता तांदळाचा पुरवठा झाला आहे.

त्यामुळे २३८८ शाळांमध्ये पुन्हा दीड महिन्याच्या अवकाशानंतर पोषण आहाराची खिचडी शिजू लागली आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या १,५७३, नगरपरिषद, मनपाच्या १६१ आणि खासगी अनुदानित ६४९ अशा २,३८८ शाळांचा समावेश आहे. या शाळांतील सुमारे दोन लाख ४६ हजार ४५६ विद्यार्थ्यांच्या खिचडीचा आस्वाद आता बहुप्रतीक्षेनंतर मिळू लागला आहे.या विद्यार्थ्यांना मिळतो पोषण आहार

राज्य सरकारच्या शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या जिल्हा परिषद, नगरपरिषद, महानगपालिका आणि खासगी अनुदानित शाळांना पोषण आहार वाटप केला जातो. या शाळांमध्ये जिल्ह्यात पहिली ते पाचवीची पटसंख्या एक लाख ४३ हजार २२३, तर सहावी ते आठवीचा पटसंख्या एक लाख तीन हजार २३३ अशा एकूण दोन लाख ४६ हजार ४५६ विद्यार्थ्यांना पोषण आहार वाटपाचे नियोजन शिक्षण विभागाकडून दर महिन्यात केले जाते. त्यानुसार विद्यार्थ्यांना आहार दिला जातो.

दृष्टिक्षेपात संख्या

एकूण शाळा- २,३८८जिल्हा परिषद शाळा- १,५७३न.प., मनपा- १६१शासकीय शाळा- ०५खासगी अनुदानित- ६४९पहिली ते पाचवी विद्यार्थी- १,४३,२२३सहावी ते आठवी विद्यार्थी- १०३२३३

शालेय पोषण आहारासाठी जिल्ह्यातील २३८८ शाळांना तांदळाचा पुरवठा झालेला आहे. त्यामुळे शाळांमध्ये पोषण आहार पोहोचता केलेला आहे. परिणामी पोषण आहाराचेही वितरण सुरळीत झालेले आहे.

- स्वप्नील सुपासे, लेखा अधिकारी, शालेय पोषण आहार

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाfoodअन्नAmravatiअमरावतीSchoolशाळा