शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात ७२ वर्षांनंतरही काळोख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 05:00 IST

चिखलदरा तालुक्यातील हतरू हा अतिदुर्गम परिसर आहे. या परिसरातील अनेक गावे आजही विद्युत पुरवठा पोहोचला नसल्याने अंधारात चाचपडत आहेत. अनेक गावांना ये-जा करण्यासाठी रस्ता नाहीत. वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या सुविधांपासून येथील आदिवासी वंचित आहेत. या परिसरात नेमले जाणारे शासकीय कर्मचारी काळ्या पाण्याची शिक्षा म्हणून आपल्या सेवेकडे पाहतात. परिणामी त्यांच्यात सेवाभाव नसल्याने सतत मुख्यालयी बेपत्ता राहत असल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांपुढे मांडली व्यथा : वीज, पाणी, रस्ता देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : स्वातंत्र्याला ७२ वर्षे झाली तरीदेखील मेळघाटातील आदिवासींच्या नशिबी आलेला अंधार पुसला गेलेला नाही. आजही अतिदुर्गम हतरू परिसरातील अनेक गावांत वीजपुरवठा नाही. पायाभूत सुविधादेखील पोहोचलेल्या नाहीत तसेच कार्यान्वित केलेल्या नाहीत. आम्हाला सुविधा पुरवून समस्या सोडविण्याचे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच पंचायत समितीचे उपसभापती नानकराम ठाकरे यांनी घातले.चिखलदरा तालुक्यातील हतरू हा अतिदुर्गम परिसर आहे. या परिसरातील अनेक गावे आजही विद्युत पुरवठा पोहोचला नसल्याने अंधारात चाचपडत आहेत. अनेक गावांना ये-जा करण्यासाठी रस्ता नाहीत. वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या सुविधांपासून येथील आदिवासी वंचित आहेत. या परिसरात नेमले जाणारे शासकीय कर्मचारी काळ्या पाण्याची शिक्षा म्हणून आपल्या सेवेकडे पाहतात. परिणामी त्यांच्यात सेवाभाव नसल्याने सतत मुख्यालयी बेपत्ता राहत असल्याचे वास्तव आहे. तालुका किंवा जिल्हास्तरावरूनच त्यांचे कामकाज चालते. परिणामी आदिवासींना सुविधांची माहिती होत नाही. त्यांच्यापर्यंत कुठलीही योजना पोहोचत नाही. मेळघाटवर विशेष लक्ष असलेले राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथील या अतिगंभीर विषयावर लक्ष घालण्याची मागणी चिखलदरा पंचायत समितीचे उपसभापती नानकराम ठाकरे यांनी निवेदनातून केली आहे.शिक्षक करतात ये-जा; आरोग्याची ऐशीतैशीगावात रस्तेच नसल्याने दळणवळणाची साधने अत्यल्प आहेत. महामंडळाची बस आजही मेळघाटातील दोनशेपेक्षा अधिक गावांत पोहोचतच नसल्याचे सत्य आहे. परिणाम शाळेतील शिक्षक मुख्यालयी राहत नाहीत. त्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करण्यात यावी, तसेच हतरू प्राथमिक आरोग्य केंद्राला ‘१०८’ रुग्णवाहिका देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. सोबतच जिल्हा परिषदेच्या शाळा आणि जारिदा, रायपूर, हतरू, डोमा येथील आश्रमशाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आदिवासी मुलांना खेळण्यासाठी साहित्य नसल्याची व्यथा मांडण्यात आली आहे.विद्युत पुरवठ्याअभावी अंधाराचे जीवनस्वातंत्र्यापासून आतापर्यंत मेळघाटातील अनेक आदिवासी पाड्यांपर्यंत विकासकामे पोहोचल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात एसटी बस, रस्ता, वीज, आरोग्य, शिक्षण या अत्यावश्यक असलेल्या सुविधा पोहोचल्या नाहीत. तालुक्यातील सरोवरखेडा, मारिता, बिच्छुखेडा, चुनखडी, नवलगाव, माखला, रायपूर, बोराट्याखेडा, लाखेवाडा, टेम्ब्रू, पिपल्या, बोदू अशा अनेक गावांत विद्युत पुरवठा पोहोचलाच नसल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास