शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

मेळघाटात ७२ वर्षांनंतरही काळोख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 05:00 IST

चिखलदरा तालुक्यातील हतरू हा अतिदुर्गम परिसर आहे. या परिसरातील अनेक गावे आजही विद्युत पुरवठा पोहोचला नसल्याने अंधारात चाचपडत आहेत. अनेक गावांना ये-जा करण्यासाठी रस्ता नाहीत. वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या सुविधांपासून येथील आदिवासी वंचित आहेत. या परिसरात नेमले जाणारे शासकीय कर्मचारी काळ्या पाण्याची शिक्षा म्हणून आपल्या सेवेकडे पाहतात. परिणामी त्यांच्यात सेवाभाव नसल्याने सतत मुख्यालयी बेपत्ता राहत असल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांपुढे मांडली व्यथा : वीज, पाणी, रस्ता देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : स्वातंत्र्याला ७२ वर्षे झाली तरीदेखील मेळघाटातील आदिवासींच्या नशिबी आलेला अंधार पुसला गेलेला नाही. आजही अतिदुर्गम हतरू परिसरातील अनेक गावांत वीजपुरवठा नाही. पायाभूत सुविधादेखील पोहोचलेल्या नाहीत तसेच कार्यान्वित केलेल्या नाहीत. आम्हाला सुविधा पुरवून समस्या सोडविण्याचे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच पंचायत समितीचे उपसभापती नानकराम ठाकरे यांनी घातले.चिखलदरा तालुक्यातील हतरू हा अतिदुर्गम परिसर आहे. या परिसरातील अनेक गावे आजही विद्युत पुरवठा पोहोचला नसल्याने अंधारात चाचपडत आहेत. अनेक गावांना ये-जा करण्यासाठी रस्ता नाहीत. वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या सुविधांपासून येथील आदिवासी वंचित आहेत. या परिसरात नेमले जाणारे शासकीय कर्मचारी काळ्या पाण्याची शिक्षा म्हणून आपल्या सेवेकडे पाहतात. परिणामी त्यांच्यात सेवाभाव नसल्याने सतत मुख्यालयी बेपत्ता राहत असल्याचे वास्तव आहे. तालुका किंवा जिल्हास्तरावरूनच त्यांचे कामकाज चालते. परिणामी आदिवासींना सुविधांची माहिती होत नाही. त्यांच्यापर्यंत कुठलीही योजना पोहोचत नाही. मेळघाटवर विशेष लक्ष असलेले राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथील या अतिगंभीर विषयावर लक्ष घालण्याची मागणी चिखलदरा पंचायत समितीचे उपसभापती नानकराम ठाकरे यांनी निवेदनातून केली आहे.शिक्षक करतात ये-जा; आरोग्याची ऐशीतैशीगावात रस्तेच नसल्याने दळणवळणाची साधने अत्यल्प आहेत. महामंडळाची बस आजही मेळघाटातील दोनशेपेक्षा अधिक गावांत पोहोचतच नसल्याचे सत्य आहे. परिणाम शाळेतील शिक्षक मुख्यालयी राहत नाहीत. त्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करण्यात यावी, तसेच हतरू प्राथमिक आरोग्य केंद्राला ‘१०८’ रुग्णवाहिका देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. सोबतच जिल्हा परिषदेच्या शाळा आणि जारिदा, रायपूर, हतरू, डोमा येथील आश्रमशाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आदिवासी मुलांना खेळण्यासाठी साहित्य नसल्याची व्यथा मांडण्यात आली आहे.विद्युत पुरवठ्याअभावी अंधाराचे जीवनस्वातंत्र्यापासून आतापर्यंत मेळघाटातील अनेक आदिवासी पाड्यांपर्यंत विकासकामे पोहोचल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात एसटी बस, रस्ता, वीज, आरोग्य, शिक्षण या अत्यावश्यक असलेल्या सुविधा पोहोचल्या नाहीत. तालुक्यातील सरोवरखेडा, मारिता, बिच्छुखेडा, चुनखडी, नवलगाव, माखला, रायपूर, बोराट्याखेडा, लाखेवाडा, टेम्ब्रू, पिपल्या, बोदू अशा अनेक गावांत विद्युत पुरवठा पोहोचलाच नसल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास