शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

४२ तासांनंतर ८० गावांचा वीजपुरवठा सुरळीत

By admin | Updated: July 8, 2015 00:24 IST

वीज कंपनीच्या वीज वाहिनीवरील तांब्याची तार एकाच रात्रीतून चोरून नेल्याने ८० गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

वीज वितरण कंपनीची कसरत : नागरिकांनी घेतला सुटकेचा श्वासआसेगाव (पूर्णा) : वीज कंपनीच्या वीज वाहिनीवरील तांब्याची तार एकाच रात्रीतून चोरून नेल्याने ८० गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी वीज कंपनीने शर्तीचे प्रयत्न करून अल्पावधीत वीजपुरवठा सुरळीत केल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास घेतला आहे. आसेगाव वीज उपकेंद्राला अमरावती आणि अचलपूर या दोन ठिकाणावरून वीजपुरवठा केला जातो. या उपकेंद्रावरून आसेगाव गावठान व कृषी तसेच सावळापूर, वासनी, कोटगावंडी व चांदूरबाजार या सहा फिडरवरून भातकुली, चांदूरबाजार, अचलपूर व दर्यापूर या चार तालुक्यांतील ८० गावांना गावठान व कृषिपंपांना वीज पुरविली जाते. काही दिवसांपूर्वी मक्रमपूर ते आष्टीदरम्यान अमरावती ते आसेगाव या ३३ के. व्ही. वीज वाहिनीवरील तार चोरट्यांनी लंपास केल्याने अमरावतीकडून येणारा वीजपुरवठा बंद होता. त्यामुळे आसेगाव उपकेंद्राला एकमेव अचलपूर येथूनच वीजपुरवठा होत होता.पण अचलपूर ते आसेगाव या वीज वाहिनीवरील टाकरखेडा पूर्णा ते वासनी-मेघनाथपूरदरम्यान तीन कि. मी. लांबीची व सुमारे पाच लाख रूपये किमतीची तांब्याची तार बुधवारी रात्री चोरट्यांनी चोरून नेली. त्यामुळे ८० गावे अंधारात होती. नागरिकांना उकाड्याचा आणि डासांचा सामना करावा लागला. सिंचन, पिठगिरण्या, विजेवरील उपकरणे तसेच बँका आणि एटीएमचे कार्य दोन दिवस बंद राहिले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अमरावतीचे अधीक्षक अभियंता दिलीप भुगूल यांच्या मार्गदर्शनात अचलपूरचे उपकार्यकारी अभियंता टेंभेकर, सहायक अभियंता अजरुद्दीन, आसेगावचे कनिष्ठ अभियंता ठाकरे व त्यांचा सर्व कर्मचारी वर्ग तसेच कंत्राटदार जलील आणि त्यांच्या ५० माणसांनी युद्धस्तरावर परिश्रम घेऊन अल्पावधित वीजपुरवठा सुरू केला आणि ४२ तासांनंतर ८० गावांतील जनतेला दिलासा मिळाला. (वार्ताहर)