शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

४२ तासांनंतर ८० गावांचा वीजपुरवठा सुरळीत

By admin | Updated: July 8, 2015 00:24 IST

वीज कंपनीच्या वीज वाहिनीवरील तांब्याची तार एकाच रात्रीतून चोरून नेल्याने ८० गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

वीज वितरण कंपनीची कसरत : नागरिकांनी घेतला सुटकेचा श्वासआसेगाव (पूर्णा) : वीज कंपनीच्या वीज वाहिनीवरील तांब्याची तार एकाच रात्रीतून चोरून नेल्याने ८० गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी वीज कंपनीने शर्तीचे प्रयत्न करून अल्पावधीत वीजपुरवठा सुरळीत केल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास घेतला आहे. आसेगाव वीज उपकेंद्राला अमरावती आणि अचलपूर या दोन ठिकाणावरून वीजपुरवठा केला जातो. या उपकेंद्रावरून आसेगाव गावठान व कृषी तसेच सावळापूर, वासनी, कोटगावंडी व चांदूरबाजार या सहा फिडरवरून भातकुली, चांदूरबाजार, अचलपूर व दर्यापूर या चार तालुक्यांतील ८० गावांना गावठान व कृषिपंपांना वीज पुरविली जाते. काही दिवसांपूर्वी मक्रमपूर ते आष्टीदरम्यान अमरावती ते आसेगाव या ३३ के. व्ही. वीज वाहिनीवरील तार चोरट्यांनी लंपास केल्याने अमरावतीकडून येणारा वीजपुरवठा बंद होता. त्यामुळे आसेगाव उपकेंद्राला एकमेव अचलपूर येथूनच वीजपुरवठा होत होता.पण अचलपूर ते आसेगाव या वीज वाहिनीवरील टाकरखेडा पूर्णा ते वासनी-मेघनाथपूरदरम्यान तीन कि. मी. लांबीची व सुमारे पाच लाख रूपये किमतीची तांब्याची तार बुधवारी रात्री चोरट्यांनी चोरून नेली. त्यामुळे ८० गावे अंधारात होती. नागरिकांना उकाड्याचा आणि डासांचा सामना करावा लागला. सिंचन, पिठगिरण्या, विजेवरील उपकरणे तसेच बँका आणि एटीएमचे कार्य दोन दिवस बंद राहिले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अमरावतीचे अधीक्षक अभियंता दिलीप भुगूल यांच्या मार्गदर्शनात अचलपूरचे उपकार्यकारी अभियंता टेंभेकर, सहायक अभियंता अजरुद्दीन, आसेगावचे कनिष्ठ अभियंता ठाकरे व त्यांचा सर्व कर्मचारी वर्ग तसेच कंत्राटदार जलील आणि त्यांच्या ५० माणसांनी युद्धस्तरावर परिश्रम घेऊन अल्पावधित वीजपुरवठा सुरू केला आणि ४२ तासांनंतर ८० गावांतील जनतेला दिलासा मिळाला. (वार्ताहर)